शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

कचरा समस्येवर कंपोस्टिंगचा उतारा,  रत्नागिरी नगर परिषदेचा उपक्रम, स्वच्छ सर्वेक्षणद्वारे कचऱ्याचे वर्गीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 16:49 IST

रत्नागिरी नगर परिषदेतर्फे गेल्या काही महिन्यांपासून शहरातील कचऱ्याची समस्या सोडविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. स्वच्छ भारत सर्वेक्षण योजनेअंतर्गत ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करूनच नागरिकांकडून घेतला जात आहे. यातील ओेल्या कचऱ्यांचे शहरातील विविध भागात कंपोस्टिंग केले जाणार आहे.

ठळक मुद्दे १६ उद्यानांमध्ये कंपोस्टिंग, आधी कचराकुंडी आता त्या जागी रांगोळीस्वच्छ भारत सर्वेक्षण योजनेअंतर्गत ओला, सुका कचरा असे वर्गीकरणरत्नागिरी शहर स्मार्ट बनविण्याचा प्रयत्न सुरू

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेतर्फे गेल्या काही महिन्यांपासून शहरातील कचऱ्याची समस्या सोडविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. स्वच्छ भारत सर्वेक्षण योजनेअंतर्गत ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करूनच नागरिकांकडून घेतला जात आहे. यातील ओेल्या कचऱ्यांचे शहरातील विविध भागात कंपोस्टिंग केले जाणार आहे.

शहरातील ३६पैकी १६ उद्यानांमध्ये ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट खतात रुपांतर करण्याचे छोटे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. नगर परिषदेच्या या प्रयत्नांमुळे कचऱ्याची समस्या अंशत: सोडविण्यात रत्नागिरी नगर परिषदेला यश आले आहे.गेल्या महिनाभरापासून शहरात स्वच्छ सर्वेक्षण ही शासनाची योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार रत्नागिरी शहर स्मार्ट बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या योजनेनुसार शहरातील सर्व ३० वॉर्डमध्ये टप्प्याटप्प्याने हे सर्वेक्षण सुरू होणार आहे.

जून २०१८पर्यंत ही सर्वेक्षण योजना सुरू राहणार असून, त्याद्वारे शहरातील कचऱ्याचे योग्य नियोजन कसे करावे, संकलन कसे करावे, याबाबतची घडी बसवली जाणार आहे. सध्या ७, ८, १४ व अन्य काही वॉर्डमध्ये स्वच्छ सर्वेक्षण योजनेनुसार घंटागाड्यांवर ओला व सुका कचरा असे नागरिकांकडूनच वर्गीकरण केलेला कचरा स्वीकारला जात आहे.आतापर्यंत ज्या वॉर्डमध्ये स्वच्छ सर्वेक्षण योजना राबवली आहे त्यानुसार तेथील ७० टक्के नागरिकांनी ओला व सुका कचरा वर्गीकरण करून व्यवस्थितरित्या कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांवर देण्यास सुरूवात केली आहे. या योजनेचे रत्नागिरी शहराचे काम कार्पे या पुण्यातील एजन्सीकडे देण्यात आले असून, त्यांचे ३० कर्मचारी ही योजना योग्यरित्या राबविण्यासाठी शहरात कार्यरत आहेत.रत्नागिरी शहरात २०१७मध्ये भाजपचे तत्कालिन नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी नगर परिषदेजवळील मोकळ्या जागेत ओल्या कचऱ्याचे कंंपोस्ट खत बनविण्याचा उपक्रम सुरू केला होता. त्यानंतर आता शहरातील ३६पैकी १६ उद्यानांमध्ये नगर परिषदेतर्फे ओल्या कचऱ्यावर प्रक्रियेसाठी कंपोस्ट खताचे प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

हे प्रकल्प छोटे असले तरी ओल्या कचऱ्यांबाबतची समस्या तरी काहीअंशी सुटण्यास मदत झाली आहे. कचऱ्याची समस्या सोडविणे व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगर परिषदेतर्फे स्वच्छता अ‍ॅपही देण्यात आले असून, ते सुमारे २२०० नागरिकांनी डाऊनलोड केले आहे. त्यावर आलेल्या १६५ तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात आले आहे.कचराकुंड्या उचलण्यात आल्यानंतर त्या कुंड्यांच्या जागी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात होता. त्यामुळे अशा ठिकाणी कचरा टाकला जाऊ नये, यासाठी सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविण्यात आले. त्यानंतर कचरा टाकण्याचे प्रमाण घटले. अशा जागेवर कचरा टाकणे पूर्णत: बंद व्हावे, यासाठी आता त्या जागांवर नगर परिषदेतर्फे रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे तेथे कचरा टाकणे बंद झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान