शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

पांढरा समुद्र ते मिऱ्या बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 17:24 IST

पांढरा समुद्र ते मिऱ्या मोरटेंभे बंधाऱ्याचे काम करत असताना येथील पूर्ण भागाचे संरक्षण होईल, यातून येथील पर्यटनाचा विकास होऊन रोजगार निर्मिती होईल, याचा विचार करुन या बंधाऱ्याचे काम करा. तसेच ते लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी दिले.

ठळक मुद्देपांढरा समुद्र ते मिऱ्या बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करापर्यटनाचा विकास होऊन रोजगार निर्मिती होईल-मंत्री उदय सामंत यांची बैठकीत सूचना

रत्नागिरी : पांढरा समुद्र ते मिऱ्या मोरटेंभे बंधाऱ्याचे काम करत असताना येथील पूर्ण भागाचे संरक्षण होईल, यातून येथील पर्यटनाचा विकास होऊन रोजगार निर्मिती होईल, याचा विचार करुन या बंधाऱ्याचे काम करा. तसेच ते लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी दिले.अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे पांढरा समुद्र ते मिऱ्या मोरटेंभे बंधाराबाबतच्या येथील ग्रामस्थ आणि संबंधित अधिकारी यांच्यासमवेत सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी बोलत होते.

यावेळी रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती महेश म्हाप, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, प्रांताधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी, पतनचे कार्यकारी अभियंता एस्. ए. हुनरेकर, सहाय्यक अभियंता एस्. ए. चौधरी, मत्स्यविभागाचे देसाई यांच्यासह मुरुगवाडा, मिऱ्या, सडामिऱ्या येथील ग्रामस्थ उपस्थित होते.पांढरा समुद्र ते मिऱ्या मोरटेंभे हा साडेतीन किलोमीटरचा बंधारा असून, महाराष्ट्रातील मोठा धूप प्रतिबंध प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम उत्तम गुणवत्तेसोबत जिल्ह्याच्या निसर्ग सौंदर्यात व पर्यटन विकासात भर टाकणारा आहे.

या प्रकल्पाचे काम दिमाखदार झाले पाहिजे. या कामामध्ये लागणाऱ्या वेगवेगळ्या परवानग्यांसाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असेही यावेळी सामंत म्हणाले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरीMirkarwada Bandarमिरकरवाडा बंदर