शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

गतवर्षीच्या तुलनेत आवक निम्म्याने घसरली, सिंधुदुर्गातील हापूस अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 13:50 IST

वाशी मार्केटमध्ये कोकणातून नवीन हंगामातील आंबा पाठविण्यास सुरूवात झाली आहे. दिवसाला सात ते आठ हजार पेट्या विक्रीला पाठविण्यात येत असल्या तरी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निम्मीच आवक आहे. आंबा कमी असला तरी दर मात्र घसरलेले आहेत. दोन ते पाच हजार रूपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे. वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी जाणाऱ्या आंब्यापैकी ६० टक्के आंबा आखाती प्रदेशात निर्यात होत आहे.

ठळक मुद्देगतवर्षीच्या तुलनेत आवक निम्म्याने घसरली, सिंधुदुर्गातील हापूस अधिकदर मात्र घसरलेलेच : वाशीत दिवसाला सात हजार पेट्यांची आवक

रत्नागिरी : वाशी मार्केटमध्ये कोकणातून नवीन हंगामातील आंबा पाठविण्यास सुरूवात झाली आहे. दिवसाला सात ते आठ हजार पेट्या विक्रीला पाठविण्यात येत असल्या तरी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निम्मीच आवक आहे. आंबा कमी असला तरी दर मात्र घसरलेले आहेत. दोन ते पाच हजार रूपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे. वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी जाणाऱ्या आंब्यापैकी ६० टक्के आंबा आखाती प्रदेशात निर्यात होत आहे.फेब्रुवारीपासून आंब्याची आवक किरकोळ स्वरूपात सुरू झाली आहे. सध्या वाशी मार्केटमध्ये कोकणातून दररोज पाच ते सात हजार पेट्या विक्रीला जात आहेत. रत्नागिरी, रायगड जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पेट्यांची संख्या अधिक आहे.यावर्षीच्या हंगामातील विविध संकटांचा सामना करीत वाशी मार्केटमध्ये सुरूवातीचा आंबा दाखल झाला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत आंब्याचे प्रमाण अल्प तर आहेच शिवाय दरही खालावलेले आहेत. २००० ते ४००० रूपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे. शेतकरी सहा ते चार डझनच्या आंबा पेट्या भरून पाठवित असून, पेटीमागे मिळणाऱ्या दरात मात्र हजार रूपयांचा फरक पडत आहे. आतापर्यंत खत व्यवस्थापनापासून कीटकनाशक फवारणीपर्यंत केलेला खर्च विचारात घेता पेटीला मिळणारा दर फारच कमी आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आंबा कमी आहे. मात्र, दर सारखेच आहेत. वास्तविक दर वाढण्याची आवश्यकता आहे.थ्रीप्स, तुडतुड्याबरोबर बदलत्या हवामानामुळे कीडरोगाचा परिणाम झाला. हापूसवर फवारल्या जाणाऱ्या कीटकनाशकांबाबबत युरोपिय देशांपाठोपाठ आता यावर्षीपासून आखाती देशांनीही घेतलेल्या कडक निर्बंधांमुळे शेतकरी बांधवांना खबरदारी घ्यावी लागली.होळीनंतर आंबा बाजारपेठेत वाढेल. मात्र, यावर्षी मे महिन्यात आंबा कमी असण्याची शक्यता आहे.

हवामानात बदल होऊ लागला असून, उष्णता वाढत आहे. त्यामुळे दि. १५ मार्चनंतर येणारा आंबा नक्कीच चांगला, मधुर चवीचा असणार आहे. शिवाय आवकही त्यावेळी वाढेल. होळीनंतर उत्तरप्रदेशातील लोक मुंबईत दाखल होतात. मुंबई उपनगरात विक्री मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे आवक वाढली तरी दर बऱ्यापैकी स्थिर राहण्याची शक्यता आहे. हापूसने उशिरा का होईना, दिमाखात आगमन केल्याने खवैय्ये सुखावले आहेत. 

यावर्षी शेतकऱ्यांना थ्रीप्ससारख्या संकटाचा सामना करावा लागला आहे. थंडीमुळे फुलोरा झाला. परंतु त्या तुलनेत फळधारणा झाली नाही. शिवाय थ्रीप्स आटोक्यात न आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आंबा कमी असताना दर चांगले असणे अपेक्षित आहे. महागाई ज्या पटीने वाढत आहे, त्यापटीत दर वाढत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दर स्थिर राहणे गरजेचे आहे.- राजन कदम,बागायतदार, शीळ-मजगाव.कोकणातून आंब्याची आवक सुरू झाली असली तरी प्रमाण कमी आहे. २५ मार्चनंतर प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. कोकणाबरोबर कर्नाटक हापूस, बदामी, तोतापुरी, लालबाग आंब्याची आवक सुरू झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत आंब्याचे प्रमाण निम्मे असतानाही दर मात्र सारखेच आहेत. आवक आंब्यापैकी ६० टक्के आंबा आखाती प्रदेशात निर्यात होत आहे. उर्वरित ४० टक्के आंबा मुंबई उपनगरातून विकला जात आहे. होळीनंतर आंब्याची आवक वाढेल.- संजय पानसरे,संचालक, बाजार समिती, वाशी.

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी