शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कृषी महाविद्यालय, फणस संशोधन केंद्राच्या प्रस्तावांना लवकर मान्यता; उदय सामंत यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 13:51 IST

कोकण कृषी विद्यापीठाला १ कोटी देणार

लांजा : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा झाली असून, कृषी महाविद्यालय आणि फणस संशोधन केंद्रांचा प्रस्ताव लवकरच शासनाकडून मान्य करून दिले जातील, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच, दोन कम्युनिटी रेडिओ केंद्रांसाठी सिंधुरत्न योजनेमधून कोकण कृषी विद्यापीठाला १ कोटी दिले जातील, अशी घोषणाही त्यांनी केली.गवाणे (ता. लांजा) येथे डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, भारतीय कृषी अनुसंधान परिषद पुरस्कृत कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन रविवारी करण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी कुलगुरू डाॅ. संजय भावे, संचालक डाॅ. प्रमोद सावंत, डाॅ. प्रशांत बोडके, डाॅ. प्रकाश शिनगारे, तहसीलदार प्रमाेद कदम, नगराध्यक्ष मनोहर बाईत, सरपंच भीमराज कांबळे उपस्थित होते.मंत्री सामंत पुढे म्हणाले की, कृषी विज्ञान केंद्राच्या जमिनीचा उपयोग शेतकऱ्यांसाठीच झाला पाहिजे. आधुनिक युगात अत्याधुनिक सुविधा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हा या केंद्राचा उद्देश आहे. रेशीम उद्योगाबाबत लवकरच बैठक आयोजित केली जाईल. महिला, युवकांना या उद्योगाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले. यावेळी कृषी महाविद्यालय आणि फणस संशोधन केंद्रासाठी ५० एकर जागा देण्याची जबाबदारी माझी आहे, असेही ते म्हणाले. कुलगुरू डॉ. भावे म्हणाले की, आजचा शेतकरी हा अभ्यासू असून, बांबू उद्याेगावर काम होणे आवश्यक आहे. १० हेक्टर जागा बांबूसाठी वापरली तर आयात करायची आवश्यकता भासणार नाही, असे त्यांनी सांगितले.प्रास्ताविक डॉ. प्रमाेद सावंत यांनी केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. आनंद हनमंते यांनी आभार मानले. यावेळी त्यांनी कृषी प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली.नावाप्रमाणे चांगले काम कराकोकण कृषी विद्यापीठाने नावाप्रमाणे चांगले काम करावे. संशोधनात्मक काम करून शेतकऱ्यांपर्यंत त्याची माहिती पोहोचवावी. त्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना कर्जमुक्त बनवावे. कोकण कृषी विद्यापीठ हे शेतकऱ्यांची मातृसंस्था आहे. त्याच मायेने शेतकऱ्यांना लाभ मिळावेत, असेही मंत्री सामंत म्हणाले.विद्यापीठाला ‘डाेस’आपल्या विद्यापीठाचे नाव मोठे आहे. तुमच्याकडे आलेला विद्यार्थी चांगला शास्त्रज्ञ, शेतकरी बनू शकतो, असा विश्वास प्रत्येकाच्या मनात आहे. नाव चांगले आहे म्हणून नावासाठी विद्यार्थी येतात. प्रवेश घेतल्यानंतर आम्हाला काहीच मिळत नाही म्हणून दुसऱ्या विद्यापीठाचे मार्ग स्वीकारतात असे हाेणार नाही याची काळजी घ्या, असे सामंत म्हणाले.दापोली, लांजात रेडिओ कम्युनिटी सेंटरसध्याच्या वातावरणातील बदलामुळे कोकणातील आंबा, काजूसह भात, नाचणी, आदी विविध पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या बदलत्या वातावरणाची माहिती शेतकऱ्यांना अगोदरच मिळावी या दृष्टीने रेडिओ कम्युनिटी सेंटर सुरू करण्यात येणार आहे. लांजा आणि दापोली कृषी विद्यापीठात हे सेंटर सुरू करण्यात येणार आहे, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत