शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कृषी महाविद्यालय, फणस संशोधन केंद्राच्या प्रस्तावांना लवकर मान्यता; उदय सामंत यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 13:51 IST

कोकण कृषी विद्यापीठाला १ कोटी देणार

लांजा : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा झाली असून, कृषी महाविद्यालय आणि फणस संशोधन केंद्रांचा प्रस्ताव लवकरच शासनाकडून मान्य करून दिले जातील, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच, दोन कम्युनिटी रेडिओ केंद्रांसाठी सिंधुरत्न योजनेमधून कोकण कृषी विद्यापीठाला १ कोटी दिले जातील, अशी घोषणाही त्यांनी केली.गवाणे (ता. लांजा) येथे डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, भारतीय कृषी अनुसंधान परिषद पुरस्कृत कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन रविवारी करण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी कुलगुरू डाॅ. संजय भावे, संचालक डाॅ. प्रमोद सावंत, डाॅ. प्रशांत बोडके, डाॅ. प्रकाश शिनगारे, तहसीलदार प्रमाेद कदम, नगराध्यक्ष मनोहर बाईत, सरपंच भीमराज कांबळे उपस्थित होते.मंत्री सामंत पुढे म्हणाले की, कृषी विज्ञान केंद्राच्या जमिनीचा उपयोग शेतकऱ्यांसाठीच झाला पाहिजे. आधुनिक युगात अत्याधुनिक सुविधा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हा या केंद्राचा उद्देश आहे. रेशीम उद्योगाबाबत लवकरच बैठक आयोजित केली जाईल. महिला, युवकांना या उद्योगाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले. यावेळी कृषी महाविद्यालय आणि फणस संशोधन केंद्रासाठी ५० एकर जागा देण्याची जबाबदारी माझी आहे, असेही ते म्हणाले. कुलगुरू डॉ. भावे म्हणाले की, आजचा शेतकरी हा अभ्यासू असून, बांबू उद्याेगावर काम होणे आवश्यक आहे. १० हेक्टर जागा बांबूसाठी वापरली तर आयात करायची आवश्यकता भासणार नाही, असे त्यांनी सांगितले.प्रास्ताविक डॉ. प्रमाेद सावंत यांनी केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. आनंद हनमंते यांनी आभार मानले. यावेळी त्यांनी कृषी प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली.नावाप्रमाणे चांगले काम कराकोकण कृषी विद्यापीठाने नावाप्रमाणे चांगले काम करावे. संशोधनात्मक काम करून शेतकऱ्यांपर्यंत त्याची माहिती पोहोचवावी. त्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना कर्जमुक्त बनवावे. कोकण कृषी विद्यापीठ हे शेतकऱ्यांची मातृसंस्था आहे. त्याच मायेने शेतकऱ्यांना लाभ मिळावेत, असेही मंत्री सामंत म्हणाले.विद्यापीठाला ‘डाेस’आपल्या विद्यापीठाचे नाव मोठे आहे. तुमच्याकडे आलेला विद्यार्थी चांगला शास्त्रज्ञ, शेतकरी बनू शकतो, असा विश्वास प्रत्येकाच्या मनात आहे. नाव चांगले आहे म्हणून नावासाठी विद्यार्थी येतात. प्रवेश घेतल्यानंतर आम्हाला काहीच मिळत नाही म्हणून दुसऱ्या विद्यापीठाचे मार्ग स्वीकारतात असे हाेणार नाही याची काळजी घ्या, असे सामंत म्हणाले.दापोली, लांजात रेडिओ कम्युनिटी सेंटरसध्याच्या वातावरणातील बदलामुळे कोकणातील आंबा, काजूसह भात, नाचणी, आदी विविध पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या बदलत्या वातावरणाची माहिती शेतकऱ्यांना अगोदरच मिळावी या दृष्टीने रेडिओ कम्युनिटी सेंटर सुरू करण्यात येणार आहे. लांजा आणि दापोली कृषी विद्यापीठात हे सेंटर सुरू करण्यात येणार आहे, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत