शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
2
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
4
छांगूर बाबाची हुशारी, मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन नाही
5
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
6
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
7
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
8
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
9
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
10
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
11
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
12
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
13
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
14
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
15
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
16
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
17
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
18
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
19
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
20
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?

Ratnagiri: यंदा पावसाळ्यात गारवा नाही; उकाडाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 16:52 IST

बंगालच्या उपसागरात जून महिन्यात कमी दाबाचे पट्टे निर्माण न झाल्याने विचित्र अनुभव

रत्नागिरी : पावसाळ्याचा दीड महिना संपत आला तरी अजून पावसाने म्हणावा तसा जोर घेतलेला नाही. वातावरणातील बदलामुळे पावसाचा लहरीपणा वाढला आहे. जून महिन्यात बंगालच्या उपसागरात दर १० ते १२ दिवसांनी कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात. यंदा ते झालेच नसल्याने पावसाचे आगमन अजूनही लांबलेलेच आहे. दरम्यान, पावसाची विश्रांती आणि वाढलेली आर्द्रता यामुळे यंदा पावसाळ्यात गारवा गायब; पण उकाडा कमालीचा वाढला आहे.जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे चार महिने पावसाचे मानले जातात. त्यापैकी जून आणि जुलै या दोन महिन्यांत पाऊस मुसळधार पडतो. ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धापासून पावसाचे प्रमाण कमी होऊ लागते. जिल्ह्यात साधारणत: या चार महिन्यांत ३३६४ मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो. यापैकी जून महिन्यात ८१८ आणि जुलै महिन्यात १२४६ मिलिमीटर म्हणजे साधारणत: २००० मिलिमीटर पाऊस या दोन महिन्यांत पडतो.यंदा जून महिन्याची आकडेवारीही पावसाने ओलांडलेली नाही. जुलै महिन्याचेही दहा दिवस संपले तरीही केवळ हलक्या सरीच पडत आहेत. ऐन पावसाळ्यात कडक ऊन पडू लागले आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू झाल्यासारखे वाटत आहे.सध्या कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअस आहे. आर्द्रता ७८ ते ८३ टक्के वाढल्याने घामाच्या धारांसह उकाड्याने हैराण केले आहे. कोकणात साधारणत: १० ते १२ जूननंतर नियमित होणारा पाऊस अगदी जुलै महिन्यापर्यंत संततधारेने अधूनमधून कोसळत असतो. मात्र, यंदा निम्मा जुलै महिना संपत आला तरीही पाऊस नियमित होण्याची चिन्हे दिसत नाहीत.हवामान खात्याचे अंदाजही पाऊस जुमानेसा झाला आहे. १२ रोजी जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा, तसेच १३ आणि १४ रेाजी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.