शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

Ratnagiri: यंदा पावसाळ्यात गारवा नाही; उकाडाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 16:52 IST

बंगालच्या उपसागरात जून महिन्यात कमी दाबाचे पट्टे निर्माण न झाल्याने विचित्र अनुभव

रत्नागिरी : पावसाळ्याचा दीड महिना संपत आला तरी अजून पावसाने म्हणावा तसा जोर घेतलेला नाही. वातावरणातील बदलामुळे पावसाचा लहरीपणा वाढला आहे. जून महिन्यात बंगालच्या उपसागरात दर १० ते १२ दिवसांनी कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात. यंदा ते झालेच नसल्याने पावसाचे आगमन अजूनही लांबलेलेच आहे. दरम्यान, पावसाची विश्रांती आणि वाढलेली आर्द्रता यामुळे यंदा पावसाळ्यात गारवा गायब; पण उकाडा कमालीचा वाढला आहे.जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे चार महिने पावसाचे मानले जातात. त्यापैकी जून आणि जुलै या दोन महिन्यांत पाऊस मुसळधार पडतो. ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धापासून पावसाचे प्रमाण कमी होऊ लागते. जिल्ह्यात साधारणत: या चार महिन्यांत ३३६४ मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो. यापैकी जून महिन्यात ८१८ आणि जुलै महिन्यात १२४६ मिलिमीटर म्हणजे साधारणत: २००० मिलिमीटर पाऊस या दोन महिन्यांत पडतो.यंदा जून महिन्याची आकडेवारीही पावसाने ओलांडलेली नाही. जुलै महिन्याचेही दहा दिवस संपले तरीही केवळ हलक्या सरीच पडत आहेत. ऐन पावसाळ्यात कडक ऊन पडू लागले आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू झाल्यासारखे वाटत आहे.सध्या कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअस आहे. आर्द्रता ७८ ते ८३ टक्के वाढल्याने घामाच्या धारांसह उकाड्याने हैराण केले आहे. कोकणात साधारणत: १० ते १२ जूननंतर नियमित होणारा पाऊस अगदी जुलै महिन्यापर्यंत संततधारेने अधूनमधून कोसळत असतो. मात्र, यंदा निम्मा जुलै महिना संपत आला तरीही पाऊस नियमित होण्याची चिन्हे दिसत नाहीत.हवामान खात्याचे अंदाजही पाऊस जुमानेसा झाला आहे. १२ रोजी जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा, तसेच १३ आणि १४ रेाजी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.