शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

‘स्मार्ट’ खासगीकरणामुळे सर्वसामान्यांचे ‘मीटर’ बिघडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 18:07 IST

खासगीकरणाची नांदी असल्याने आणि भविष्यात त्यामुळे सर्वसामान्यांना वीज दरात मिळणारी सवलत बंद होण्याची भीती

रत्नागिरी : महावितरणतर्फे सध्या राज्यात सर्वत्र आधुनिक स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. स्मार्ट मीटरमुळे अचूक रिडींग घेतले जाणार असले तरी हे मीटर बसवण्याच्या कामाचा ठेका खासगी कंपनीला देण्यात आला आहे. ही एकूणच खासगीकरणाची नांदी असल्याने आणि भविष्यात त्यामुळे सर्वसामान्यांना वीज दरात मिळणारी सवलत बंद होण्याची भीती आहे. यामुळेच आता लोकांकडून स्मार्ट मीटरला विरोध वाढू लागला आहे.स्मार्ट मीटर बसवण्याचा ठेका कोणी घेतला आहे, यावरुनच सध्या राजकारण सुरू आहे. मात्र ठेका कोणीही घेतला तरी हे खासगीकरणाचे पहिले पाऊल मानले जात आहे. त्यामुळे भविष्यात ते अधिक त्रासदायक होणार आहे. सध्या महावितरणचे कामकाज ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर सुरू आहे. वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडून आकारल्या जाणाऱ्या दरातून घरगुती आणि कृषी ग्राहकांना सवलती दिल्या जातात. मात्र खासगीकरणाचे पुढचे पाऊल उचलले गेले तर या सवलतींवर गदा येण्याची मोठी भीती आहे. वीज निर्मितीमध्ये आताच अनेक खासगी कंपन्या आहेत. काही ठराविक ठिकाणे वगळता वितरण अजून खासगी कंपन्यांकडे नाही. मात्र स्मार्ट मीटरचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर छोट्या मोठ्या सगळ्याच ठिकाणांची वितरण व्यवस्थाही खासगी कंपनीकडे जाईल. असे झाल्यास घरगुती आणि कृषी वीज ग्राहकांना मिळणाऱ्या सुविधा बंद होतील, असे मानले जात आहे.

महावितरणला होणारे फायदे

  • वीज चोरीला आळा बसेल.
  • वीज मीटर वाचन अचूक होईल.
  • येणारा भार (लोड) किती आहे, याची अचूक माहिती मिळेल.

ग्राहकांना होणारे फायदे

  • दैनंदिन वीज वापराचे नियोजन करता येणार आहे. पर्यायाने विजेची बचत करता येणार आहे.
  • या नियोजनामुळे आकस्मिकरित्या वाढीव येणाऱ्या वीज बिलावर अटकाव लागेल.
  • मीटरमध्ये काही बिघाड असल्यास त्याची महा विद्युत ॲपमध्ये माहिती मिळणार आहे.
  • टाईम ऑफ डे या प्रकाराचा नवीन दर आदेशामधील (Teriff order ) चा फायदा ग्राहकांना घेता येणार आहे.

स्मार्ट मीटर बसविण्याचे कारण?

  • वीज यंत्रणेचे सक्षमीकरण, विस्तारीकरण व अचूक वीज वापर नोंद या कारणामुळे महावितरणकडून अद्यावत, स्मार्ट टाईम ऑफ डे (टीओडी) मीटर बसविण्यात येणार आहेत. दिवसाला किती वापर विजेचा झाला हे या मीटरमुळे कळणार आहे.

ग्राहकांचा संभाव्य त्रास

  • महावितरणचा मीटर असेल आणि बिल थकित राहिले तर ते पुढील महिन्याच्या बिलात वाढून येते. पण स्मार्ट मीटरला ते बिल सुरक्षा अनामत रकमेतून कापून घेतले जाते.
  • स्मार्ट मीटरची बिले ग्राहकांपर्यंत नेऊन देण्याबाबत अजून महावितरणकडे व्यवस्था नाही. महावितरणच्या मीटरचे बिल वितरित करणाऱ्यांनी स्मार्ट मीटरचे बिल वितरित करण्यास नकार दिला आहे.
  • खासगीकरणाचे हे पहिले पाऊस यशस्वी झाल्यास वितरण आणि बिल वसुलीची जबाबदारीही खासगी कंपन्यांकडे दिली जाण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम घरगुती आणि कृषी वीज बिलांच्या दरावर होऊ शकतो.