शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘स्मार्ट’ खासगीकरणामुळे सर्वसामान्यांचे ‘मीटर’ बिघडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 18:07 IST

खासगीकरणाची नांदी असल्याने आणि भविष्यात त्यामुळे सर्वसामान्यांना वीज दरात मिळणारी सवलत बंद होण्याची भीती

रत्नागिरी : महावितरणतर्फे सध्या राज्यात सर्वत्र आधुनिक स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. स्मार्ट मीटरमुळे अचूक रिडींग घेतले जाणार असले तरी हे मीटर बसवण्याच्या कामाचा ठेका खासगी कंपनीला देण्यात आला आहे. ही एकूणच खासगीकरणाची नांदी असल्याने आणि भविष्यात त्यामुळे सर्वसामान्यांना वीज दरात मिळणारी सवलत बंद होण्याची भीती आहे. यामुळेच आता लोकांकडून स्मार्ट मीटरला विरोध वाढू लागला आहे.स्मार्ट मीटर बसवण्याचा ठेका कोणी घेतला आहे, यावरुनच सध्या राजकारण सुरू आहे. मात्र ठेका कोणीही घेतला तरी हे खासगीकरणाचे पहिले पाऊल मानले जात आहे. त्यामुळे भविष्यात ते अधिक त्रासदायक होणार आहे. सध्या महावितरणचे कामकाज ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर सुरू आहे. वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडून आकारल्या जाणाऱ्या दरातून घरगुती आणि कृषी ग्राहकांना सवलती दिल्या जातात. मात्र खासगीकरणाचे पुढचे पाऊल उचलले गेले तर या सवलतींवर गदा येण्याची मोठी भीती आहे. वीज निर्मितीमध्ये आताच अनेक खासगी कंपन्या आहेत. काही ठराविक ठिकाणे वगळता वितरण अजून खासगी कंपन्यांकडे नाही. मात्र स्मार्ट मीटरचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर छोट्या मोठ्या सगळ्याच ठिकाणांची वितरण व्यवस्थाही खासगी कंपनीकडे जाईल. असे झाल्यास घरगुती आणि कृषी वीज ग्राहकांना मिळणाऱ्या सुविधा बंद होतील, असे मानले जात आहे.

महावितरणला होणारे फायदे

  • वीज चोरीला आळा बसेल.
  • वीज मीटर वाचन अचूक होईल.
  • येणारा भार (लोड) किती आहे, याची अचूक माहिती मिळेल.

ग्राहकांना होणारे फायदे

  • दैनंदिन वीज वापराचे नियोजन करता येणार आहे. पर्यायाने विजेची बचत करता येणार आहे.
  • या नियोजनामुळे आकस्मिकरित्या वाढीव येणाऱ्या वीज बिलावर अटकाव लागेल.
  • मीटरमध्ये काही बिघाड असल्यास त्याची महा विद्युत ॲपमध्ये माहिती मिळणार आहे.
  • टाईम ऑफ डे या प्रकाराचा नवीन दर आदेशामधील (Teriff order ) चा फायदा ग्राहकांना घेता येणार आहे.

स्मार्ट मीटर बसविण्याचे कारण?

  • वीज यंत्रणेचे सक्षमीकरण, विस्तारीकरण व अचूक वीज वापर नोंद या कारणामुळे महावितरणकडून अद्यावत, स्मार्ट टाईम ऑफ डे (टीओडी) मीटर बसविण्यात येणार आहेत. दिवसाला किती वापर विजेचा झाला हे या मीटरमुळे कळणार आहे.

ग्राहकांचा संभाव्य त्रास

  • महावितरणचा मीटर असेल आणि बिल थकित राहिले तर ते पुढील महिन्याच्या बिलात वाढून येते. पण स्मार्ट मीटरला ते बिल सुरक्षा अनामत रकमेतून कापून घेतले जाते.
  • स्मार्ट मीटरची बिले ग्राहकांपर्यंत नेऊन देण्याबाबत अजून महावितरणकडे व्यवस्था नाही. महावितरणच्या मीटरचे बिल वितरित करणाऱ्यांनी स्मार्ट मीटरचे बिल वितरित करण्यास नकार दिला आहे.
  • खासगीकरणाचे हे पहिले पाऊस यशस्वी झाल्यास वितरण आणि बिल वसुलीची जबाबदारीही खासगी कंपन्यांकडे दिली जाण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम घरगुती आणि कृषी वीज बिलांच्या दरावर होऊ शकतो.