शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

रात्री अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् शिवसेना आमदार राजन साळवी गहिरवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 12:39 IST

Uddhav Thackeray Rajan Salvi ShivSena Ratnagiri: लगेच उद्धव ठाकरे यांचे पुढचे वाक्य होते. अरे मी काही नाही. तुझ्यासारखे शिवसैनिक हीच माझी ताकद, त्यामुळेच हे माझ्याकडून होत आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचा फोन आला अन् राजन साळवी गहिवरलेथेट रस्त्यावर उतरून काम

रत्नागिरी : 'राजन' मतदारसंघात काय परिस्थिती ? वादळाचा परिणाम किती ? नुकसान कुठपर्यंत ? कोरोनाची परिस्थिती काय ? असा आढावा घेतानाच 'राजन स्वतःची काळजी घेऊन काम कर, किती फिरतोस रे राजा', अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार राजन साळवी यांच्याशी थेट संवाद साधला तेव्हा आमदार राजन साळवी यांचे डोळे पाणावले !कोरोनाचे संकट धुमाकूळ घालत असतानाच चक्रीवादळाचे आगमन झाले.१४ मे रोजीच वादळाने परिणाम दाखवण्यास सुरुवात केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यानंतर हे वादळ पहिले राजापूरमध्ये धडकले. त्याचवेळी आमदार राजन साळवी यांनी थेट रस्त्यावर उतरून कामाला सुरुवात केली.अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन ते सतत उपाययोजनासाठी मार्गदर्शन करत होते.

प्रत्यक्ष वादळाचा तडाखा बसल्यानंतर भूक तहान विसरून त्यांनी पूर्ण मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला.ज्या-ज्या ठिकाणी नुकसान झाले त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानग्रस्तांना धीर देत स्वतः शक्य तितकी मदत केली. तसेच प्रशासनाला योग्य ते आदेश देखील दिले.या कामाची तत्काळ दखल शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. आणि बुधवारी रात्री अचानक राजन साळवी यांचा फोन खणखणला... समोरून चक्क उद्धव ठाकरे यांचा आवाज आला.....'राजन कसा आहेस ? वादळाचे परिणाम कुठपर्यंत ?किती नुकसान झाले ? मच्छीमार बांधवांचे किती नुकसान ? जीवितहानी नाही ना? असा संपूर्ण आढावा घेतल्यानंतर कोरोना परिस्थितीची माहितीही त्यांनी घेतली.पुढचे वाक्य तर राजन साळवी यांना सदगदित करणारे होते. किती फिरतोस रे 'राजा' स्वतःची काळजी घेऊन काम कर, मी लवकरच तुमच्या भेटीसाठी येतोय. हे वाक्य कानावर पडताच राजध साळवी अक्षरशः गहिवरले. डोळे पाणावले. सदगदीत स्वरात म्हणाले 'साहेब तुमच्या कामातूनच प्रेरणा आणि ताकद मिळते आहे.

लगेच उद्धव ठाकरे यांचे पुढचे वाक्य होते. अरे मी काही नाही. तुझ्यासारखे शिवसैनिक हीच माझी ताकद, त्यामुळेच हे माझ्याकडून होत आहे. या शब्दाने तर आमदार राजन साळवी यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. साहेब स्वतःची काळजी घ्या, इतकेच शब्द त्यांच्या तोंडातून निघाले.

उद्धव ठाकरे यांनीही पुन्हा तू काळजी घे म्हणत संवाद थांबवला. कित्येक मिनिटे आमदार राजन साळवी शांत आणि स्तब्ध होते. पक्षप्रमुख आणि राज्याच्या प्रमुखाने केलेली ही विचारपूस आणि आपुलकी घेऊन ते पुन्हा मतदारसंघात पुढच्या भेटीसाठी रवाना झाले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेRajan Salviराजन साळवीRatnagiriरत्नागिरीTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळ