शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रात्री अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् शिवसेना आमदार राजन साळवी गहिरवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 12:39 IST

Uddhav Thackeray Rajan Salvi ShivSena Ratnagiri: लगेच उद्धव ठाकरे यांचे पुढचे वाक्य होते. अरे मी काही नाही. तुझ्यासारखे शिवसैनिक हीच माझी ताकद, त्यामुळेच हे माझ्याकडून होत आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचा फोन आला अन् राजन साळवी गहिवरलेथेट रस्त्यावर उतरून काम

रत्नागिरी : 'राजन' मतदारसंघात काय परिस्थिती ? वादळाचा परिणाम किती ? नुकसान कुठपर्यंत ? कोरोनाची परिस्थिती काय ? असा आढावा घेतानाच 'राजन स्वतःची काळजी घेऊन काम कर, किती फिरतोस रे राजा', अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार राजन साळवी यांच्याशी थेट संवाद साधला तेव्हा आमदार राजन साळवी यांचे डोळे पाणावले !कोरोनाचे संकट धुमाकूळ घालत असतानाच चक्रीवादळाचे आगमन झाले.१४ मे रोजीच वादळाने परिणाम दाखवण्यास सुरुवात केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यानंतर हे वादळ पहिले राजापूरमध्ये धडकले. त्याचवेळी आमदार राजन साळवी यांनी थेट रस्त्यावर उतरून कामाला सुरुवात केली.अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन ते सतत उपाययोजनासाठी मार्गदर्शन करत होते.

प्रत्यक्ष वादळाचा तडाखा बसल्यानंतर भूक तहान विसरून त्यांनी पूर्ण मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला.ज्या-ज्या ठिकाणी नुकसान झाले त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानग्रस्तांना धीर देत स्वतः शक्य तितकी मदत केली. तसेच प्रशासनाला योग्य ते आदेश देखील दिले.या कामाची तत्काळ दखल शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. आणि बुधवारी रात्री अचानक राजन साळवी यांचा फोन खणखणला... समोरून चक्क उद्धव ठाकरे यांचा आवाज आला.....'राजन कसा आहेस ? वादळाचे परिणाम कुठपर्यंत ?किती नुकसान झाले ? मच्छीमार बांधवांचे किती नुकसान ? जीवितहानी नाही ना? असा संपूर्ण आढावा घेतल्यानंतर कोरोना परिस्थितीची माहितीही त्यांनी घेतली.पुढचे वाक्य तर राजन साळवी यांना सदगदित करणारे होते. किती फिरतोस रे 'राजा' स्वतःची काळजी घेऊन काम कर, मी लवकरच तुमच्या भेटीसाठी येतोय. हे वाक्य कानावर पडताच राजध साळवी अक्षरशः गहिवरले. डोळे पाणावले. सदगदीत स्वरात म्हणाले 'साहेब तुमच्या कामातूनच प्रेरणा आणि ताकद मिळते आहे.

लगेच उद्धव ठाकरे यांचे पुढचे वाक्य होते. अरे मी काही नाही. तुझ्यासारखे शिवसैनिक हीच माझी ताकद, त्यामुळेच हे माझ्याकडून होत आहे. या शब्दाने तर आमदार राजन साळवी यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. साहेब स्वतःची काळजी घ्या, इतकेच शब्द त्यांच्या तोंडातून निघाले.

उद्धव ठाकरे यांनीही पुन्हा तू काळजी घे म्हणत संवाद थांबवला. कित्येक मिनिटे आमदार राजन साळवी शांत आणि स्तब्ध होते. पक्षप्रमुख आणि राज्याच्या प्रमुखाने केलेली ही विचारपूस आणि आपुलकी घेऊन ते पुन्हा मतदारसंघात पुढच्या भेटीसाठी रवाना झाले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेRajan Salviराजन साळवीRatnagiriरत्नागिरीTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळ