शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
3
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
4
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
5
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
6
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
7
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
8
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
9
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
10
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
11
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
12
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
13
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
14
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
15
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
16
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
17
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
18
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
19
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
20
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 

Ratnagiri: परशुराम घाटातील गॅबियन वॉलच्या रचनेत होणार बदल, पावसाळ्यानंतरच कामाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 13:16 IST

लोखंडी जाळी बसवण्याचे काम सुरूच असून, ते अंतिम टप्प्यात आले

चिपळूण (जि. रत्नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटातील धोकादायक ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या गॅबियन वॉलचे काम पावसामुळे थांबविण्यात आले आहे. पावसाळ्यानंतरच या कामाला सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी या गॅबियन वॉलच्या रचनेत काही बदल करण्याचे प्रयत्न राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून केले जात आहेत. मात्र, लोखंडी जाळी बसवण्याचे काम सुरूच असून, ते अंतिम टप्प्यात आले आहे.परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम मार्गी लागल्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात धोकादायक ठिकाणी संरक्षक लोखंडी जाळ्या आणि उताराच्या बाजूस गॅबियन वॉल उभारण्यात येत आहे. गतवेळच्या पावसाळ्यात येथील गॅबियन वॉल कोसळली होती. त्यानंतर, सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेत काम करण्यात आले. मात्र, पहिल्याच पावसात गॅबियन वॉल ढासळली. त्यामुळे पायथ्यालगत असलेल्या वस्तीला धोका निर्माण झाल्याने तातडीने हे काम थांबवण्यात आले. त्याशिवाय गॅबियन वॉल कोसळू नये, तसेच तेथून पाण्यासोबत माती वाहू जाऊ नये, यासाठी तेथे प्लास्टिक टाकण्यात आले आहे. मात्र, तरीही तेथील माती पाण्यासोबत लोकवस्तीत येत आहे.पेढे येथील लोकवस्तीत व शेतात चिखल साचल्याने गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यानंतर, राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदार कंपनीकडून ग्रामस्थांच्या शेतात आणि घर परिसरात साचलेला चिखल जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आला. यापूर्वी परशुराम घाटात डोंगर कटाई करताना घाटातील भले मोठे दगड लोकवस्तीत येऊन घराला तडे गेले होते, तर २०२१च्या अतिवृष्टीत घाटातील दरड खाली येऊन एक घर उद्ध्वस्त हाेऊन दोघांना जीव गमवावा लागला होता.या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाने खबरदारीची उपाययोजना म्हणून गॅबियन वॉलचे काम तातडीने थांबवले आहे. पावसाळा संपेपर्यंत या कामावर केवळ देखरेख ठेवली जाणार आहे. पावसाळ्यानंतर गॅबियन वॉलच्या रचनेत तांत्रिकदृष्ट्या काही बदल प्रस्तावित केले जात आहेत. या नवीन रचनेनुसार गॅबियन वॉलचे काम केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग, महाड विभागाचे शाखा अभियंता पंकज गोसावी यांनी दिली.