शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

८० हजार राजकारण्यांवरील गुन्हे प्रलंबित, ॲड. असिम सरोदे यांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 16:44 IST

राजकीय शुद्धतेची गरज

चिपळूण : राजकारणात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वृत्तीचा शिरकाव होत आहे. महाराष्ट्रातील १८३ न्यायालयांमध्ये ४४७ राजकीय नेत्यांवर गुन्हे दाखल आहेत. राजकीय गुन्हे प्रलंबित राहण्याचे प्रमाण आता ३५ टक्क्यांवर पोहोचले आहे. देशात सध्या २५१ खासदारांवर गुन्हे दाखल असून, त्यात १७० खासदारांवर गंभीर स्वरूपात गुन्हे दाखल आहेत. देशभरात ८० हजार ६६५ राजकीय नेत्यांवर गुन्हे प्रलंबित राहिले आहेत. राजकीय शुद्धता आणण्यासाठी गुन्हेगारी वृत्तीला चाप बसायला हवा, असे मत ॲड. असिम सरोदे यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.उद्धव सेनेचे माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांना २०१६ मध्ये झालेल्या मारहाणप्रकरणी ॲड. सरोदे सोमवारी चिपळुणात आले होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, सध्या राजकारणात गुन्हेगारी वृत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कायदा मोडणारेच कायदा करण्यासाठी बसल्याची स्थिती आहे. केवळ महाराष्ट्रात ४४५ राजकारण्यांवरील गुन्हे प्रलंबित आहेत.यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ६ प्रकरणांचा समावेश आहे. गुन्हा करूनही मोकाट फिरणाऱ्या राजकारण्यांकडून फिर्यादी, साक्षीदारांवर मोठ्या प्रमाणात दबाव येतो. सद्य:स्थितीत देशभरात ८० हजार ६६५ राजकीय गुन्हेगारांचे खटले प्रलंबित आहेत. पोलिस, ईडी, आदी शासकीय विभागातील अधिकाऱ्यांमध्ये समन्वयचा अभाव आहे. केवळ गुन्हे दाखल करण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते. राजकारणातील वाढत्या गुन्हेगारी वृत्तीवर सर्वोच्च न्यायालयानेही चिंता व्यक्त केलेली आहे.

एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला दोन वर्षांची शिक्षा झाली, तर त्याला तत्काळ सेवेतून बडतर्फ केले जाते. परंतु, जे राजकारणी गुन्हेगारी वृत्तीचे आहेत, ज्यांच्यावर खटले चालू आहेत. ते मात्र शासकीय पदांवर, मंत्रीपदावर कार्यरत आहेत. गुन्हा सिद्ध न झाल्याचा फायदा त्यांच्याकडून घेतला जातो.राजकीय नेत्यांना २ वर्षांची शिक्षा झाली, तर त्यांना ६ वर्षे निवडणूक लढवता येत नाही. अशी शिक्षा झालेल्या राजकारण्यांना कायमस्वरूपी निवडणूक लढवण्यावर बंदी घालायला हवी. कायद्यात समानता असायला हवी, तरच राजकारणात शुद्धता येईल, असेही सरोदे म्हणाले.