शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

उमेदवारीसाठी रंगली घरातच हमरा-तुमरी, मनधरणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 17:25 IST

gram panchayat Election Ratnagiri - रत्नागिरी जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुका जाहीर होताच सर्व राजकीय पक्षातील इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मिळण्यासाठी आपल वजन वापरण्यास सुरूवात केली आहे. अनेकांनी पक्षातील वरिष्ठांची मनधरणी करण्यास सुरूवात केली असून, उमेदवारीवरून घरातच दोन गट पडून भावकीतच कंदाल झाल्याचा प्रकार शहराजवळच्या एका ग्रामपंचायतीच्या हद्दीत घडला.

ठळक मुद्देउमेदवारीसाठी रंगली घरातच हमरा-तुमरी, मनधरणी सुरू काका -पुतणे भिडले एकमेकांना, कोणाला तिकीट मिळणार? राजकीय बैठकांना सुरूवात

अरुण आडिवरेकररत्नागिरी : जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुका जाहीर होताच सर्व राजकीय पक्षातील इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मिळण्यासाठी आपल वजन वापरण्यास सुरूवात केली आहे. अनेकांनी पक्षातील वरिष्ठांची मनधरणी करण्यास सुरूवात केली असून, उमेदवारीवरून घरातच दोन गट पडून भावकीतच कंदाल झाल्याचा प्रकार शहराजवळच्या एका ग्रामपंचायतीच्या हद्दीत घडला.जिल्ह्यात शिवसेनाच मोठा पक्ष ठरला आहे. जिल्ह्यात शिवसेनेची पकड अधिक असल्याने पक्षातील इच्छुकांची संख्याही अधिक आहे. निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमदेवारांनी स्थानिक पातळीवरील शिवसेनेच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे. उमेदवार निवडीचे सर्व अधिकार याच नेत्यांकडे असल्याने त्यांच्याकडे जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. मात्र, सध्या ग्रामपंचायतीच्या उमेदवारीवरून घरातच वाद होण्याचे प्रसंग घडू लागले आहेत.शहराजवळच्या शिवसेनेचे वजन असलेल्या एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्याच्या वडिलांनी पुन्हा मुलासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांच्या मुलाला उमेदवारी दिल्याचेही सांगण्यात आले. मात्र, घरी येताच त्याच्या भावाला तिकीट दिल्याचे वृत्त येऊन धडकले. त्यामुळे दोन भावातच जुंपली.

एवढ्यावरच न थांबत काका - पुतणेही एकमेकांसमोर उभे ठाकले. या प्रकारामुळे आता घरातच दोन गट निर्माण झाले आहेत. विद्यमान सदस्याच्या गळ्यात सरपंच पदाची माळ घालण्यासाठी वडील उत्सुक आहेत. तर दुसरीकडे पुतण्याही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे घरातूनच आता घमासान सुरु झाले आहे.आरक्षणाकडे लक्षजिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. मात्र, सरपंच पदाचे आरक्षण उशिराने पडणार असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. सरपंचपदाच्या आरक्षणाकडे डोळा ठेवून असलेले इच्छुक उमेदवार अडचणीत सापडले आहेत. मनासारखे आरक्षण पडले नाहीत तर काय करायचे, असा प्रश्न सतावत आहे. त्यातच महिला आरक्षण पडले तर काय? निवडणुकीत स्वत: उभे राहावे की घरातील महिलेला तिकीट द्यावे हा संभ्रमच आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकRatnagiriरत्नागिरी