शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
2
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
3
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
4
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
5
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद 
6
४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
7
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
8
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
9
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
10
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
11
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
12
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
13
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
14
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
15
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
16
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
17
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
18
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
19
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीसाठी रंगली घरातच हमरा-तुमरी, मनधरणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 17:25 IST

gram panchayat Election Ratnagiri - रत्नागिरी जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुका जाहीर होताच सर्व राजकीय पक्षातील इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मिळण्यासाठी आपल वजन वापरण्यास सुरूवात केली आहे. अनेकांनी पक्षातील वरिष्ठांची मनधरणी करण्यास सुरूवात केली असून, उमेदवारीवरून घरातच दोन गट पडून भावकीतच कंदाल झाल्याचा प्रकार शहराजवळच्या एका ग्रामपंचायतीच्या हद्दीत घडला.

ठळक मुद्देउमेदवारीसाठी रंगली घरातच हमरा-तुमरी, मनधरणी सुरू काका -पुतणे भिडले एकमेकांना, कोणाला तिकीट मिळणार? राजकीय बैठकांना सुरूवात

अरुण आडिवरेकररत्नागिरी : जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुका जाहीर होताच सर्व राजकीय पक्षातील इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मिळण्यासाठी आपल वजन वापरण्यास सुरूवात केली आहे. अनेकांनी पक्षातील वरिष्ठांची मनधरणी करण्यास सुरूवात केली असून, उमेदवारीवरून घरातच दोन गट पडून भावकीतच कंदाल झाल्याचा प्रकार शहराजवळच्या एका ग्रामपंचायतीच्या हद्दीत घडला.जिल्ह्यात शिवसेनाच मोठा पक्ष ठरला आहे. जिल्ह्यात शिवसेनेची पकड अधिक असल्याने पक्षातील इच्छुकांची संख्याही अधिक आहे. निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमदेवारांनी स्थानिक पातळीवरील शिवसेनेच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे. उमेदवार निवडीचे सर्व अधिकार याच नेत्यांकडे असल्याने त्यांच्याकडे जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. मात्र, सध्या ग्रामपंचायतीच्या उमेदवारीवरून घरातच वाद होण्याचे प्रसंग घडू लागले आहेत.शहराजवळच्या शिवसेनेचे वजन असलेल्या एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्याच्या वडिलांनी पुन्हा मुलासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांच्या मुलाला उमेदवारी दिल्याचेही सांगण्यात आले. मात्र, घरी येताच त्याच्या भावाला तिकीट दिल्याचे वृत्त येऊन धडकले. त्यामुळे दोन भावातच जुंपली.

एवढ्यावरच न थांबत काका - पुतणेही एकमेकांसमोर उभे ठाकले. या प्रकारामुळे आता घरातच दोन गट निर्माण झाले आहेत. विद्यमान सदस्याच्या गळ्यात सरपंच पदाची माळ घालण्यासाठी वडील उत्सुक आहेत. तर दुसरीकडे पुतण्याही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे घरातूनच आता घमासान सुरु झाले आहे.आरक्षणाकडे लक्षजिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. मात्र, सरपंच पदाचे आरक्षण उशिराने पडणार असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. सरपंचपदाच्या आरक्षणाकडे डोळा ठेवून असलेले इच्छुक उमेदवार अडचणीत सापडले आहेत. मनासारखे आरक्षण पडले नाहीत तर काय करायचे, असा प्रश्न सतावत आहे. त्यातच महिला आरक्षण पडले तर काय? निवडणुकीत स्वत: उभे राहावे की घरातील महिलेला तिकीट द्यावे हा संभ्रमच आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकRatnagiriरत्नागिरी