शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

आंबा बागायतदारांना दिलासा, निर्यातीसाठीचा माल प्रथमच जागेवर विकला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 13:25 IST

आंबा विक्रीसाठी स्थानिक पातळीवर मोठी यंत्रणा नाही. बागायतदार आंबा मुंबईला पाठवतात आणि तेथील दलाल तो परदेशात पाठवतात.

रत्नागिरी : देशाच्या कानाकोपऱ्यात आंबा पोहोचवण्याबरोबरच विविध देशांमध्ये आंब्याची निर्यात करण्यासाठी एक कंपनी पुढे आली आहे. रत्नागिरीमध्येचआंबा खरेदी करण्याची तयारी या कंपनीने दाखवली असल्याने आंबा बागायतदारांचा निर्यातीसाठीचा माल प्रथमच जागेवर विकला जाणार आहे.  

आंबा विक्रीसाठी स्थानिक पातळीवर मोठी यंत्रणा नाही. बागायतदार आंबा मुंबईला पाठवतात आणि तेथील दलाल तो परदेशात पाठवतात. त्याला किती दर मिळेल, किती दर मिळाला, नेमका किती आंबा परदेशात गेला, याची माहिती बागायतदारांना मिळत नाही. यात त्यांचे नुकसान होते. त्यामुळेच स्थानिक पातळीवर निर्यातीसाठीचा आंबा खरेदी केला जाणे, ही बागायदारांसाठी सुवर्णसंधीच ठरणार आहे.

या कंपनीच्या प्रतिनिधीने स्थानिक बागायतदारांशी चर्चा केली. यावेळी तुकाराम घवाळी, राजेंद्र कदम, राजू पावसकर यांच्यासह बहुसंख्य बागायतदार उपस्थित होते. बागायतदारांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यासाठी आता इच्छुक विक्रेत्यांची नावनोंदणी होणार आहे. वाशी, अहमदाबाद, पुणे, सुरत अशा बाजारपेठांमध्ये असलेल्या दराप्रमाणे रत्नागिरीतील केंद्रांवर हापूस खरेदी करण्यात येणार आहे. या कंपनीने जागेवरच आंबा खरेदी करून रोखीत व्यवहार करण्याची तयारी दर्शवली आहे. दिनांक १० मार्चपासून रत्नागिरीत ही खरेदी सुरु होईल.

आंबा खरेदीसाठी रत्नागिरी तालुक्यात तीन, तर अन्य ठिकाणी सहा केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. दराबाबत एक दिवस आधी सूचना देण्यात येणार आहे. जास्त माल असेल तर तो संबंधित शेतकऱ्याच्या बागेमध्ये जाऊन आणण्याची तयारीही कंपनीने दर्शवली आहे. मात्र, कमी पेट्या असतील तर बागायतदाराला केंद्रापर्यंत आणून द्याव्या लागणार आहेत. दर्जाप्रमाणे दर आणि जागेवरच पैसे मिळणार आहेत.

डागाळलेला आंबा

डाग पडलेला आंबा दलालांकडून फेकून दिला जातो. त्याची विक्री होत नसल्याने तो दलालांकडे पाठवलाच जात नाही. अशा मालाबाबत बागायतदार राजेंद्र कदम यांनी प्रश्न केला असता, कंपनीने तोही आंबा किलोच्या दराने खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे.

खर्च वाचेल

 

 

आंब्याची जागेवरच खरेदी केली गेली तर आंबापेटी आणि वाहतूक हे बागायदारांचे दोन मोठे खर्च वाचतील. त्यामुळे बागायतदारांसाठी ते अधिक फायदेशीर ठरणार आहे. हे दोन खर्च सोसून वाशीला पाठवलेल्या आंब्याला दर किती मिळेल, याची खात्री नसल्याने बागायदार या नव्या पर्याबाबत अधिक सकारात्मक आहेत.

आंबा बागायतदारांची संस्था तयार करण्याचे काम चालू असून मॅगोनेट जीआय मानांकन असेल तर उपयुक्त ठरणार आहे. या व्यतिरिक्त सर्व प्रकारचा आंबा कंपनी खरेदी करणार आहे. बागायतदारांचे नुकसान होणार नाही, याबाबतही काळजी घेण्यात येणार आहे. - दीपक बन्सल, प्रतिनिधी 

वाशी मार्केटप्रमाणे जागेवर दर देण्यात आला तर वाहतुकीचा खर्च वाचणार आहे. तसेच कंपनीला पाहिजे त्या वर्गवारीचा आंबा देण्यात येणार आहे. मात्र कंपनीने दरात फरक करुन बागायतदारांचे नुकसान टाळावे - राजन कदम, आंबा बागायतदार

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबा