शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

आंबा बागायतदारांना दिलासा, निर्यातीसाठीचा माल प्रथमच जागेवर विकला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 13:25 IST

आंबा विक्रीसाठी स्थानिक पातळीवर मोठी यंत्रणा नाही. बागायतदार आंबा मुंबईला पाठवतात आणि तेथील दलाल तो परदेशात पाठवतात.

रत्नागिरी : देशाच्या कानाकोपऱ्यात आंबा पोहोचवण्याबरोबरच विविध देशांमध्ये आंब्याची निर्यात करण्यासाठी एक कंपनी पुढे आली आहे. रत्नागिरीमध्येचआंबा खरेदी करण्याची तयारी या कंपनीने दाखवली असल्याने आंबा बागायतदारांचा निर्यातीसाठीचा माल प्रथमच जागेवर विकला जाणार आहे.  

आंबा विक्रीसाठी स्थानिक पातळीवर मोठी यंत्रणा नाही. बागायतदार आंबा मुंबईला पाठवतात आणि तेथील दलाल तो परदेशात पाठवतात. त्याला किती दर मिळेल, किती दर मिळाला, नेमका किती आंबा परदेशात गेला, याची माहिती बागायतदारांना मिळत नाही. यात त्यांचे नुकसान होते. त्यामुळेच स्थानिक पातळीवर निर्यातीसाठीचा आंबा खरेदी केला जाणे, ही बागायदारांसाठी सुवर्णसंधीच ठरणार आहे.

या कंपनीच्या प्रतिनिधीने स्थानिक बागायतदारांशी चर्चा केली. यावेळी तुकाराम घवाळी, राजेंद्र कदम, राजू पावसकर यांच्यासह बहुसंख्य बागायतदार उपस्थित होते. बागायतदारांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यासाठी आता इच्छुक विक्रेत्यांची नावनोंदणी होणार आहे. वाशी, अहमदाबाद, पुणे, सुरत अशा बाजारपेठांमध्ये असलेल्या दराप्रमाणे रत्नागिरीतील केंद्रांवर हापूस खरेदी करण्यात येणार आहे. या कंपनीने जागेवरच आंबा खरेदी करून रोखीत व्यवहार करण्याची तयारी दर्शवली आहे. दिनांक १० मार्चपासून रत्नागिरीत ही खरेदी सुरु होईल.

आंबा खरेदीसाठी रत्नागिरी तालुक्यात तीन, तर अन्य ठिकाणी सहा केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. दराबाबत एक दिवस आधी सूचना देण्यात येणार आहे. जास्त माल असेल तर तो संबंधित शेतकऱ्याच्या बागेमध्ये जाऊन आणण्याची तयारीही कंपनीने दर्शवली आहे. मात्र, कमी पेट्या असतील तर बागायतदाराला केंद्रापर्यंत आणून द्याव्या लागणार आहेत. दर्जाप्रमाणे दर आणि जागेवरच पैसे मिळणार आहेत.

डागाळलेला आंबा

डाग पडलेला आंबा दलालांकडून फेकून दिला जातो. त्याची विक्री होत नसल्याने तो दलालांकडे पाठवलाच जात नाही. अशा मालाबाबत बागायतदार राजेंद्र कदम यांनी प्रश्न केला असता, कंपनीने तोही आंबा किलोच्या दराने खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे.

खर्च वाचेल

 

 

आंब्याची जागेवरच खरेदी केली गेली तर आंबापेटी आणि वाहतूक हे बागायदारांचे दोन मोठे खर्च वाचतील. त्यामुळे बागायतदारांसाठी ते अधिक फायदेशीर ठरणार आहे. हे दोन खर्च सोसून वाशीला पाठवलेल्या आंब्याला दर किती मिळेल, याची खात्री नसल्याने बागायदार या नव्या पर्याबाबत अधिक सकारात्मक आहेत.

आंबा बागायतदारांची संस्था तयार करण्याचे काम चालू असून मॅगोनेट जीआय मानांकन असेल तर उपयुक्त ठरणार आहे. या व्यतिरिक्त सर्व प्रकारचा आंबा कंपनी खरेदी करणार आहे. बागायतदारांचे नुकसान होणार नाही, याबाबतही काळजी घेण्यात येणार आहे. - दीपक बन्सल, प्रतिनिधी 

वाशी मार्केटप्रमाणे जागेवर दर देण्यात आला तर वाहतुकीचा खर्च वाचणार आहे. तसेच कंपनीला पाहिजे त्या वर्गवारीचा आंबा देण्यात येणार आहे. मात्र कंपनीने दरात फरक करुन बागायतदारांचे नुकसान टाळावे - राजन कदम, आंबा बागायतदार

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबा