शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

आंबा बागायतदारांना दिलासा, निर्यातीसाठीचा माल प्रथमच जागेवर विकला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 13:25 IST

आंबा विक्रीसाठी स्थानिक पातळीवर मोठी यंत्रणा नाही. बागायतदार आंबा मुंबईला पाठवतात आणि तेथील दलाल तो परदेशात पाठवतात.

रत्नागिरी : देशाच्या कानाकोपऱ्यात आंबा पोहोचवण्याबरोबरच विविध देशांमध्ये आंब्याची निर्यात करण्यासाठी एक कंपनी पुढे आली आहे. रत्नागिरीमध्येचआंबा खरेदी करण्याची तयारी या कंपनीने दाखवली असल्याने आंबा बागायतदारांचा निर्यातीसाठीचा माल प्रथमच जागेवर विकला जाणार आहे.  

आंबा विक्रीसाठी स्थानिक पातळीवर मोठी यंत्रणा नाही. बागायतदार आंबा मुंबईला पाठवतात आणि तेथील दलाल तो परदेशात पाठवतात. त्याला किती दर मिळेल, किती दर मिळाला, नेमका किती आंबा परदेशात गेला, याची माहिती बागायतदारांना मिळत नाही. यात त्यांचे नुकसान होते. त्यामुळेच स्थानिक पातळीवर निर्यातीसाठीचा आंबा खरेदी केला जाणे, ही बागायदारांसाठी सुवर्णसंधीच ठरणार आहे.

या कंपनीच्या प्रतिनिधीने स्थानिक बागायतदारांशी चर्चा केली. यावेळी तुकाराम घवाळी, राजेंद्र कदम, राजू पावसकर यांच्यासह बहुसंख्य बागायतदार उपस्थित होते. बागायतदारांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यासाठी आता इच्छुक विक्रेत्यांची नावनोंदणी होणार आहे. वाशी, अहमदाबाद, पुणे, सुरत अशा बाजारपेठांमध्ये असलेल्या दराप्रमाणे रत्नागिरीतील केंद्रांवर हापूस खरेदी करण्यात येणार आहे. या कंपनीने जागेवरच आंबा खरेदी करून रोखीत व्यवहार करण्याची तयारी दर्शवली आहे. दिनांक १० मार्चपासून रत्नागिरीत ही खरेदी सुरु होईल.

आंबा खरेदीसाठी रत्नागिरी तालुक्यात तीन, तर अन्य ठिकाणी सहा केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. दराबाबत एक दिवस आधी सूचना देण्यात येणार आहे. जास्त माल असेल तर तो संबंधित शेतकऱ्याच्या बागेमध्ये जाऊन आणण्याची तयारीही कंपनीने दर्शवली आहे. मात्र, कमी पेट्या असतील तर बागायतदाराला केंद्रापर्यंत आणून द्याव्या लागणार आहेत. दर्जाप्रमाणे दर आणि जागेवरच पैसे मिळणार आहेत.

डागाळलेला आंबा

डाग पडलेला आंबा दलालांकडून फेकून दिला जातो. त्याची विक्री होत नसल्याने तो दलालांकडे पाठवलाच जात नाही. अशा मालाबाबत बागायतदार राजेंद्र कदम यांनी प्रश्न केला असता, कंपनीने तोही आंबा किलोच्या दराने खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे.

खर्च वाचेल

 

 

आंब्याची जागेवरच खरेदी केली गेली तर आंबापेटी आणि वाहतूक हे बागायदारांचे दोन मोठे खर्च वाचतील. त्यामुळे बागायतदारांसाठी ते अधिक फायदेशीर ठरणार आहे. हे दोन खर्च सोसून वाशीला पाठवलेल्या आंब्याला दर किती मिळेल, याची खात्री नसल्याने बागायदार या नव्या पर्याबाबत अधिक सकारात्मक आहेत.

आंबा बागायतदारांची संस्था तयार करण्याचे काम चालू असून मॅगोनेट जीआय मानांकन असेल तर उपयुक्त ठरणार आहे. या व्यतिरिक्त सर्व प्रकारचा आंबा कंपनी खरेदी करणार आहे. बागायतदारांचे नुकसान होणार नाही, याबाबतही काळजी घेण्यात येणार आहे. - दीपक बन्सल, प्रतिनिधी 

वाशी मार्केटप्रमाणे जागेवर दर देण्यात आला तर वाहतुकीचा खर्च वाचणार आहे. तसेच कंपनीला पाहिजे त्या वर्गवारीचा आंबा देण्यात येणार आहे. मात्र कंपनीने दरात फरक करुन बागायतदारांचे नुकसान टाळावे - राजन कदम, आंबा बागायतदार

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबा