शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
3
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
4
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
6
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
7
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
8
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
9
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
10
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
11
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
12
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
13
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
14
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
15
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
16
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
17
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
18
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
19
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
20
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग

आंबा बागायतदारांना दिलासा, निर्यातीसाठीचा माल प्रथमच जागेवर विकला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 13:25 IST

आंबा विक्रीसाठी स्थानिक पातळीवर मोठी यंत्रणा नाही. बागायतदार आंबा मुंबईला पाठवतात आणि तेथील दलाल तो परदेशात पाठवतात.

रत्नागिरी : देशाच्या कानाकोपऱ्यात आंबा पोहोचवण्याबरोबरच विविध देशांमध्ये आंब्याची निर्यात करण्यासाठी एक कंपनी पुढे आली आहे. रत्नागिरीमध्येचआंबा खरेदी करण्याची तयारी या कंपनीने दाखवली असल्याने आंबा बागायतदारांचा निर्यातीसाठीचा माल प्रथमच जागेवर विकला जाणार आहे.  

आंबा विक्रीसाठी स्थानिक पातळीवर मोठी यंत्रणा नाही. बागायतदार आंबा मुंबईला पाठवतात आणि तेथील दलाल तो परदेशात पाठवतात. त्याला किती दर मिळेल, किती दर मिळाला, नेमका किती आंबा परदेशात गेला, याची माहिती बागायतदारांना मिळत नाही. यात त्यांचे नुकसान होते. त्यामुळेच स्थानिक पातळीवर निर्यातीसाठीचा आंबा खरेदी केला जाणे, ही बागायदारांसाठी सुवर्णसंधीच ठरणार आहे.

या कंपनीच्या प्रतिनिधीने स्थानिक बागायतदारांशी चर्चा केली. यावेळी तुकाराम घवाळी, राजेंद्र कदम, राजू पावसकर यांच्यासह बहुसंख्य बागायतदार उपस्थित होते. बागायतदारांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यासाठी आता इच्छुक विक्रेत्यांची नावनोंदणी होणार आहे. वाशी, अहमदाबाद, पुणे, सुरत अशा बाजारपेठांमध्ये असलेल्या दराप्रमाणे रत्नागिरीतील केंद्रांवर हापूस खरेदी करण्यात येणार आहे. या कंपनीने जागेवरच आंबा खरेदी करून रोखीत व्यवहार करण्याची तयारी दर्शवली आहे. दिनांक १० मार्चपासून रत्नागिरीत ही खरेदी सुरु होईल.

आंबा खरेदीसाठी रत्नागिरी तालुक्यात तीन, तर अन्य ठिकाणी सहा केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. दराबाबत एक दिवस आधी सूचना देण्यात येणार आहे. जास्त माल असेल तर तो संबंधित शेतकऱ्याच्या बागेमध्ये जाऊन आणण्याची तयारीही कंपनीने दर्शवली आहे. मात्र, कमी पेट्या असतील तर बागायतदाराला केंद्रापर्यंत आणून द्याव्या लागणार आहेत. दर्जाप्रमाणे दर आणि जागेवरच पैसे मिळणार आहेत.

डागाळलेला आंबा

डाग पडलेला आंबा दलालांकडून फेकून दिला जातो. त्याची विक्री होत नसल्याने तो दलालांकडे पाठवलाच जात नाही. अशा मालाबाबत बागायतदार राजेंद्र कदम यांनी प्रश्न केला असता, कंपनीने तोही आंबा किलोच्या दराने खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे.

खर्च वाचेल

 

 

आंब्याची जागेवरच खरेदी केली गेली तर आंबापेटी आणि वाहतूक हे बागायदारांचे दोन मोठे खर्च वाचतील. त्यामुळे बागायतदारांसाठी ते अधिक फायदेशीर ठरणार आहे. हे दोन खर्च सोसून वाशीला पाठवलेल्या आंब्याला दर किती मिळेल, याची खात्री नसल्याने बागायदार या नव्या पर्याबाबत अधिक सकारात्मक आहेत.

आंबा बागायतदारांची संस्था तयार करण्याचे काम चालू असून मॅगोनेट जीआय मानांकन असेल तर उपयुक्त ठरणार आहे. या व्यतिरिक्त सर्व प्रकारचा आंबा कंपनी खरेदी करणार आहे. बागायतदारांचे नुकसान होणार नाही, याबाबतही काळजी घेण्यात येणार आहे. - दीपक बन्सल, प्रतिनिधी 

वाशी मार्केटप्रमाणे जागेवर दर देण्यात आला तर वाहतुकीचा खर्च वाचणार आहे. तसेच कंपनीला पाहिजे त्या वर्गवारीचा आंबा देण्यात येणार आहे. मात्र कंपनीने दरात फरक करुन बागायतदारांचे नुकसान टाळावे - राजन कदम, आंबा बागायतदार

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबा