शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुक्या प्राण्यांमधील संवेदनशीलता! वाहून जाणाऱ्या गायीला म्हशींनी वाचवलं, रत्नागिरीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 13:35 IST

अनोखी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी अशी घटना

विनोद पवार राजापूर : प्राण्यांना बोलता येत नसले तरी त्यांच्याकडे भावना मात्र माणसासारख्याच असतात. बुडणाऱ्या, वाहून जाणाऱ्या गाय-म्हशीला, कुत्र्याला एखाद्या प्राणीप्रेमी तरुणाने वाचवल्याची घटना आपण ऐकतो, वाचतो, बघतो. पण वाहून जाणाऱ्या एका गायीला चक्क तीन म्हशींनी वाचवण्याची आश्चर्यकारक घटना राजापूर येथे घडली आहे. राजापूर नगर परिषदेचे कर्मचारी संदेश जाधव यांनी हा अनोखा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला आहे.आज, शुक्रवारी सकाळी राजापूर शहरात ही घटना घडली आहे. अर्जुना नदीच्या पात्रालगत असणाऱ्या मातीच्या ढिगाऱ्यावरुन एक गाय नदीपात्र पडून वाहून जात होती. जवळच असलेल्या तीन म्हशींनी नदीत उडी टाकत त्या गायीचे प्राण वाचवले आहेत.गुरुवारी आठवडा बाजार असल्यामुळे त्याठिकाणी जमा झालेला कचरा गोळा करण्याचे काम शुक्रवारी सकाळी सुरु राजापूर नगर परिषदेचे सफाई कामगार करत होते. या ठिकाणी राजापूर नगर परिषदेचे आरोग्य कर्मचारी संदेश जाधवही उपस्थित होते. साधारण सकाळी साडेआठच्या सुमारास राजापूर बंदर धक्क्यावर स्वच्छतेचे काम सुरु असताना ही गाय अचानक मातीच्या ढिगाऱ्यावरुन पाण्यात पडली.

अर्जुना नदीचा प्रवाह जोरदार असल्याने ती वाहून जाऊ लागली. याचवेळी त्याठिकाणी असणाऱ्या तीन म्हशींनीही लागलीच पाण्यात उड्या मारल्या व त्या बुडणाऱ्या गायीला तीनही बाजूंनी आधार देत, किंबहुना तीनही बाजूंनी कव्हर करून पलिकडच्या किनाऱ्यावर नेले.पलिकडे नदीपात्राच्या बाहेर गेल्यानंतर या गायीने मागे वळून अतिशय कृतज्ञतापूर्वक त्या तिन्ही म्हशींकडे एक कटाक्ष टाकला व ती गेली. त्यानंतर या तिन्ही म्हशी नदीपात्राच्या बाहेर आल्या. मुक्या प्राण्यांमधील संवेदनशीलता अनेकदा माणसांपेक्षा अधिक असल्याचे या घटनेवरून दिसून येते. राजापूरमधील ही घटनाही अशीच अनोखी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी.