शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

धान्य आणून देऊ, पण घरातच थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:29 IST

अरुण आडिवरेकर लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : काेराेनाचा वाढता संसर्ग राेखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’ माेहीम हाती ...

अरुण आडिवरेकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : काेराेनाचा वाढता संसर्ग राेखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’ माेहीम हाती घेण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात नागरिकांची गैरसाेय हाेऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिकांना घरपाेच सेवा देण्याची सुविधा हाती घेतली आहे. जेणेकरून रस्त्यावर अनावश्यक हाेणारी गर्दी टाळता येऊ शकेल. नागरिकांना घरपाेच धान्य मिळेल; पण नागरिकांनी घरातच थांबावे, हा यामागचा उद्देश आहे.

जिल्ह्यात काेराेनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी आलेल्या अहवालानुसार तब्बल ५५५ नवे काेराेनाचे रुग्ण आढळले. आजवरच्या आकडेवारीतील हा उच्चांक आहे. त्याहीपेक्षा आता आढळणाऱ्या रुग्णांमध्ये ४५ वर्षांखालील तरुणांची संख्या अधिक आहे, तर सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात १० जणांचा काेराेनामुळे मृत्यू झाला. वाढती रुग्णसंख्या आणि वाढता मृतांचा आकडा ही चिंतेची बाब असून, काेराेना संसर्गाची ही साखळी ताेडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांची कडक अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात करण्यात येत आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना जरब बसावी यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी पाेलीस तैनात करण्यात आले आहेत. विनाकारण काेणी बाहेर फिरताना दिसल्यास त्यांची अँटिजन चाचणी करण्यात येत आहे. त्याचा धसका अनेकांनी घेतला आहे. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी काही प्रमाणात कमी झाली आहे.

जिल्हा प्रशासनाने आता सर्वच दुकाने बंद ठेवून घरपाेच सेवा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी दुकाने बंद राहणार आहेत. दुकाने बंद राहिल्याने नागरिकांना आवश्यक असणारे सामान मिळणे कठीण हाेणार आहे. नागरिकांची हाेणारी ही गैरसाेय लक्षात घेऊन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी नागरिकांना घरपाेच धान्य मिळण्यासाठी अत्यावश्यक सेवा पाेहाेचविण्यासाठी काही किराणा व्यापारी, स्वयंसेवक यांची यादी तयार केली आहे. ही यादी नगर परिषदनिहाय प्रत्येक तालुक्यात करण्यात आली आहे. त्याचे नियाेजन स्थानिक पातळीवर तहसीलदार व नगर परिषद प्रशासन यांच्याकडे देण्यात आले आहे. ही यादी तालुक्यातील सर्व घटकांपर्यंत पाेहाेचविण्याचे प्रयत्न प्रशासनाने केले आहेत. या यादीतील क्रमांकावर संपर्क साधून आवश्यक वस्तूंची यादी दिल्यास त्या घरपाेच देण्यात येणार आहेत.

नागरिकांनी घराबाहेर न पडता जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.

‘ब्रेक द चेन’मध्ये रत्नागिरीकरांनी प्रशासनाला चांगले सहकार्य केले आहे. असेच सहकार्य यापुढेही नागरिकांनी करावे. जेणेकरून काेराेनाची ही साखळी खंडित करता येईल. संचारबंदीच्या काळात नागरिकांची काेणतीही गैरसाेय हाेणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.

- लक्ष्मीनारायण मिश्रा,

जिल्हाधिकारी रत्नागिरी.

यादी तयार

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना घरपाेच सेवा देण्यासाठी किराणा व्यापारी व स्वयंसेवकांची यादी तयार केली आहे. घरपाेच सेवा देणाऱ्या जिल्ह्यातील १४० व्यापाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे.

सारेच सज्ज

काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासन, त्याचबराेबरच स्वयंसेवकही सज्ज झाले आहेत. नागरिकांनी घरात थांबून प्रशासनाला सहकार्य केल्यास ही साखळी ताेडण्यास मदत हाेणार आहे.