शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

वाशिष्ठीत बुडालेल्या दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले, तब्बल २४ तासांनी शोधमोहीम संपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 17:20 IST

तटरक्षक दलाच्या पाणबुड्यांनी राबवलेल्या शोध मोहिमेत हे मृतदेह तळाशी खडकात अडकलेले आढळले

चिपळूण : वाशिष्ठी नदीत अंघोळीसाठी पाण्यात उतरलेल्या आणि रविवारी सायंकाळपासून बेपत्ता असलेल्या अब्दुल कादीर नोशाद लासने आणि आतिर इरफान बेबल या दोन्ही मुलांचे मृतदेह तब्बल २४ तासांनी हाती लागले. तटरक्षक दलाच्या पाणबुड्यांनी राबवलेल्या शोध मोहिमेत हे मृतदेह तळाशी खडकात अडकलेले आढळले.शहरालगतच्या मिरजोळीलगतच्या एका हायस्कूलमधील दहावीच्या वर्गात शिकणारे आठ विद्यार्थी कुंभार्ली गणेशवाडी येथील वजहर या ठिकाणी वाशिष्ठी नदीपात्रातील डोहात अंघोळीसाठी गेले. काही वेळातच जोरदार पाऊस सुरू होताच सहा जण तातडीने पात्राबाहेर येऊन कातळावर उभे राहिले. मात्र, लासने आणि बेबल हे दोघेही डोहातच होते. पावसामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला. डोहातील भोवऱ्यात आतिक (बेबल मोहल्ला, चिपळूण) व अब्दुल कादीर नोशाद लासने (रा. जिव्हाळा सुपर बाझार शेजारी, चिपळूण) हे दोघेही सापडले व काही क्षणात ते दोघेही गायब झाले.रविवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून सोमवारी सायंकाळी सहापर्यंत या दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न केले. काही जाणकारांच्या मदतीने हूक टाकून व त्यानंतर बांबूच्या सहाय्याने शोध घेण्यात आला. याशिवाय एका धाडसी तरुणाने डोहात उतरून त्या दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीच हाती लागले नाही.महाड येथील एसआरटी पथकाचा प्रयत्नही असफल ठरला. अखेर तटरक्षक दलाचे पथक मागवून दोन पाणबुडे डोहात उतरले. डोहात चार तास शोध मोहीम राबवल्यानंतर त्यांना एकाचा मृतदेह सापडला. त्याआधी घटनास्थळापासून काही अंतरावर वाशिष्ठी नदीपात्रात अब्दुल कादीर नोशाद लासने याचा मृतदेह सापडला.या शोध मोहिमेसाठी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे व पोलिस घटनास्थळी तळ ठोकून आहेत. सोमवारी दुपारी आमदार भास्कर जाधव यांच्यासह काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, शहराध्यक्ष लियाकत शाह, सामाजिक कार्यकर्ते नाजिम अफवारे यांच्यासह मुस्लीम समाजबांधव मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित होते.

डोहातील पाणी पातळी कमी केलीकुंभार्ली येथील डोहाकडे जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाशिष्ठी नदीच्या दुसऱ्या बाजूने वळविण्यात आला. त्यासाठी दोन पोकलेनच्या सहाय्याने नदीपात्रात बंधारा घालून पाणी दुसऱ्या बाजूने वळविण्यात आले. सोमवारी सकाळपासून ही प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे डोहाच्या ठिकाणी असलेला पाण्याचा प्रवाह बहुतांशी कमी झाला. त्यामुळे शोध कार्यास काहीसा वेग आला.एकूण १५ मुलांचा होता ‘प्लॅन’?दहावीच्या वर्गातील १५ मुले एकत्रित कुंभार्ली येथे दुचाकीने जाण्याचा प्लॅन होता. त्याप्रमाणे सायंकाळी खासगी क्लास लवकरच आटोपून फुटबॉल खेळायला जातो, असे घरच्यांना सांगून काही जण घराबाहेर पडले. परंतु काहींना दुचाकी उपलब्ध न झाल्याने अखेर आठ जण तीन दुचाकीने घटनास्थळी पोहोचले होते. या घटनेचा उर्वरित विद्यार्थ्यांनी मोठा धसका घेतला असल्याचे समजते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू