शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

रत्नागिरी जिल्ह्यातील तीन बंदरे अत्याधुनिक बनविणार : पालकमंत्री उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 12:10 IST

राजापुरातील साखरीनाटे बंदराचे भूमिपूजन

राजापूर : साखरीनाटे, मिरकरवाडा, हर्णे ही तीनही बंदरे जिल्ह्यातील मच्छीमारांना ताकद देणारी आहेत. या बंदरांचा विकास करून कर्नाटक राज्यामधील मल्पी बंदरापेक्षाही अत्याधुनिक बनविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.राजापूर तालुक्यातील साखरीनाटे बंदराचे भूमिपूजन मंत्री सामंत यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला सिंधुरत्न योजनेचे निमंत्रित सदस्य किरण सामंत, सरपंच गुलजार ठाकूर, सरपंच संदीप बानकर, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संदीप भुजबळ, मेरीटाईम बोर्डचे कार्यकारी अभियंता मनीष मेतकर, तहसीलदार विकास गंबरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री सामंत पुढे म्हणाले की, राजापुरातील साखरीनाटे, रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदर, दापाेलीतील हर्णे बंदर ही तीन बंदरे जिल्ह्यातील मच्छीमारांना ताकद देणारी बंदरे आहेत. हर्णे बंदराच्या विकासासाठी २०० कोटी याआधी मंजूर करण्यात आले आहेत. आता साखरीनाटे बंदरासाठी १५३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच मिरकरवाडा बंदराच्या विकासासाठी दुसऱ्या टप्प्यात शंभर कोटी रुपये देण्यात येतील. पुढच्या आराखड्यामध्ये येथील जोड रस्त्यासाठी निधी मंजूर केला जाईल. मच्छीमार महिलांना मच्छी सुकवण्यासाठी दोन्ही ओटे त्यांच्या मागणीनुसार मंजूर केल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.मंत्री सामंत म्हणाले की, विकासकामे करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. गडकिल्ले संवर्धनासाठी ३ कोटी, रस्त्यांसाठी ४ कोटी, मुख्यमंत्री सडक योजनेतून ५० किलोमीटरचे रस्ते राजापुरात मंजूर केले आहेत. राजापूर तालुक्यातील धरणाला पैसे देण्याचा आणि जामदा धरण डागडुजीचा निर्णयही घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

डिझेल काेटाबाबत निर्णय घेऊमच्छीमारांच्या डिझेल कोटा बंदसंदर्भात आपण स्वत: सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन चर्चा करेन. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असा शब्दही मंत्री सामंत यांनी दिला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajapurराजापुरUday Samantउदय सामंत