शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
2
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
3
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
4
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
5
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
6
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
7
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
8
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
9
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
10
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
11
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
12
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
14
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
15
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
16
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
17
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
18
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
19
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
20
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

पावसाळ्यात सापांपासून सावधान, रत्नागिरीत विषारी केवळ चारच प्रजाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 4:22 AM

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यात आता पावसाळा सुरू झाल्याने साप दिसण्याचे प्रकार वाढणार आहेत. मात्र, प्रत्येक साप विषारी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्ह्यात आता पावसाळा सुरू झाल्याने साप दिसण्याचे प्रकार वाढणार आहेत. मात्र, प्रत्येक साप विषारी असतोच असे नाही. त्यामुळे साप दिसताच घाबरून न जाता त्याच्यावर लक्ष ठेऊन सर्पमित्रांना बोलावून त्याला पकडल्यास सापांच्या प्रजाती वाचण्यास मदत होईल.

महाराष्ट्रात सुमारे ५२ प्रजाती आढळतात. त्यापैकी किंग कोब्रा आणि पट्टेरी मण्यार वगळता उर्वरित बहुतांशी साप कमी-अधिक प्रमाणात दिसतात. विषारी प्रजातींपैकी नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे या चारच प्रजाती रत्नागिरी जिल्ह्यात आढळतात. फुरसे तर केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोनच जिल्ह्यांत आढळते. उर्वरित बिनविषारी सापांपैकी सुमारे १६ ते १७ प्रजाती रत्नागिरीत बहुतांशी सापडतात. त्यात मोठ्या प्रमाणावर सापडणारी धामण, कवड्या आदी प्रजाती होत. धामण तर उंदीर या भक्ष्याच्या शोधात शेतात किंवा घरानजिक वावरत असते. पावसाळ्यात बिळात पाणी गेल्याने हे साप आसऱ्यासाठी घराजवळ येतात. त्यामुळे ये-जा करताना सावधगिरी बाळगा, त्यांना घाबरून मारू नका, असा सल्ला सर्पमित्र देतात.

जिल्ह्यात आढळणारे विषारी साप

नाग हा साप पाच ते साडेपाच फूट लांबीचा असतो. त्याच्या डोक्यावर मोडी लिपीतील दहा आकडा असतो. त्याला एकाक्ष नाग (स्पेक्टॅकल कोब्रा) असेही म्हणतात.

मण्यार हा एक विषारी साप आहे. हा जंगलात राहतो. संपूर्ण काळ्या रंगाचा असून, त्यावर पांढरे गोल पट्टे असतात. त्याची साडेतीन ते चार फूट लांबी असते.

घोणस या विषारी सापाची लांबी चार ते साडेचार फूट असते. अजगरासारखा जाडजूड व चिडल्यावर कुकरसारखी शिटी देतो.

फुरसे हे केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोनच जिल्ह्यांत आढळते. इतर विषारी सापांच्या तुलनेने हा साप कमी विषारी असतो. याने दंश केल्यास दगावण्याचे प्रमाण कमी असते.

जिल्ह्यात आढळणारे बिनविषारी साप

साप आढळला तर

जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी बिनविषारी साप आढळतात. त्यांची लक्षणे ओळखता येणे गरजेचे.

बिनविषारी साप हे विषारी सापापेक्षा चपळ असतात. मात्र, लगेचच दंश करतात.

अचानक साप आढळला तर स्तब्ध उभे रहा. आपण हलल्यावर साप दंश करण्याचा धोका अधिक.

घराशेजारी साप दिसल्यास, कुठे आहे, त्यावर लक्ष ठेवा आणि सर्पमित्राला पकडण्यासाठी बोलवा.

साप चावला तर

आपल्याकडे बहुतांशी बिनविषारी साप आढळतात. त्यामुळे एखाद्या सापाने दंश केल्यास प्रथमत: घाबरू नये.

सापाला न मारता सर्पमित्राच्या सहाय्याने पकडून आणल्यास निदानाला मदत होते.

दंश केलेला भाग स्वच्छ धुवून घ्यावा. त्यावर थोडीशी आवळलेली अशी पट्टी बांधावी.

सर्पदंश झालेल्या व्यक्तीला शासकीय दवाखान्यात दाखल केल्यास वेळेवर उपचार होऊन प्राण वाचेल.

सापांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. बिनविषारी साप ओळखता आला तर मनात भीती राहणार नाही आणि सापांनाही जीवदान मिळेल. विषारी आहे, असे वाटल्यास लागलीच सर्पमित्राला बोलवा, तोपर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवा.

- ज्ञानेश म्हात्रे, सर्पमित्र, रत्नागिरी