शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
5
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
8
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
9
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
10
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
11
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
12
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
13
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
14
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
15
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

वाईटपणा आला तरी बेहत्तर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 4:22 AM

७३व्या घटना दुरुस्तीने ग्रामपंचायतींना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य भारतीय राज्य घटनेच्या लोकप्रतिनिधित्व कायद्यान्वये निवडणुकीद्वारे निवडून ...

७३व्या घटना दुरुस्तीने ग्रामपंचायतींना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य भारतीय राज्य घटनेच्या लोकप्रतिनिधित्व कायद्यान्वये निवडणुकीद्वारे निवडून आलेले असतात. ग्रामपंचायत देशातील लोकशाहीचा मूळ पाया आहे. तसेच ग्रामपंचायतीला विकासाचा कणा मानले जाते. आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल, तर कठपुतळी बाहुलीसारखे आपण कुणाच्या तरी दोराला बांधले नसल्याचे स्मरण व्हावे. आपली सावली आपणच निर्माण करायला हवी. निसर्गाच्या नियमानुसार मोठ्या वृक्षाच्या खाली लहान झाडे कधीच मोठी होत नाहीत. समाजात आपल्या ज्ञानानुसार किंमत ठरविली जाते. शासकीय कामकाजात प्रशासकीय अधिकारी समोरच्या व्यक्तीच्या ज्ञानाच्या औकातीप्रमाणे सहकार्य करण्यास तत्परता दाखवितात. पक्ष, पार्टी, नेता म्हणून नव्हे. कदाचित दाखवत असतील तर तो क्षणिक फार्स समजावा. कोणतेही सार्वजनिक अथवा वैयक्तिक काम करून घेण्यासाठी कोणत्याही नेत्याच्या अथवा पुढाऱ्याची आवश्यकता नसते. प्रशासनाला कायद्यानुसार काम करणे अनिवार्य असतं. कोरोनाच्या परिस्थितीत प्रशासन आपली जबाबदारी चोख बजावत आहे. आता केवळ प्रत्येकाने प्रशासनाला साथ देण्याची गरज आहे. मग अशा कामासाठी समाजात किंवा गावात वाईटपणा आला तरी चालेल. पण गप्प बसून राहिलो, तर त्याचे परिणाम सहन करावे लागतील. प्रत्येकानेच याचे भान ठेवून पुढाकार घेण्याची गरज आहे. ग्राम कृती दलाच्या साथीने सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीसपाटील, ग्रामसेवक, ग्राम कमिटी, देवस्थान व अन्य संस्थांनी जबाबदारी स्वीकारण्याची हीच खरी वेळ आहे. केवळ कोरोनाला हरवण्यासाठी नव्हे, तर गावातून हद्दपार करण्यासाठी एक पाऊल प्रत्येकाने टाकण्याची गरज आहे. त्यासाठी गावातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले, तर त्याच्या घरातील सदस्यांची वेळीच कोरोना चाचणी करून घ्यावी. दशक्रिया व उत्तरकार्य विधी गाव व समाज जमवून न करता घरगुती पध्दतीने पूर्ण करावेत. तसेच या विधीसाठी गावागावातून येणाऱ्यांना आता थांबवायला हवे. तरच गावागावातून होणारा प्रादुर्भाव नियंत्रणात येऊ शकतो. चिपळुणात नुकत्याच झालेल्या एका आढावा बैठकीत पहिल्या लॉकडाऊनमध्ये ग्रामस्थांचे जसे सहकार्य मिळाले, तसे आता मिळत नाही. गावात कोणी वाईटपणा घेण्यास तयार नाही, असे सांगितले गेले. यावर आमदार भास्कर जाधव यांनी जिथे जिथे वाईटपणा आडवा येत आहे, तिथे मला सांगा, वाईटपणा आला तरी बेहत्तर अशी भूमिका स्पष्ट केली. याच पद्धतीने प्रत्येकाने पुढाकार घेण्याची वेळ आली आहे.

- संदीप बांद्रे