शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
4
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
5
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
6
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
7
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
8
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
9
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
10
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
11
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
12
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
13
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
14
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
15
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
16
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
17
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
18
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
19
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
20
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?

राज्यातील तब्बल ५९७ परिचारिकांच्या नोकरीवर गदा, रत्नागिरीतील १९ जणांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 16:23 IST

ऐन दिवाळीत शासनाने हा निर्णय घेतल्याने उडाली खळबळ

रत्नागिरी : राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नेमलेल्या परिचारिकांना कमी करण्याचे आदेश केंद्र शासनाने घेतला आहे. ३१ ऑक्टोबरपासून त्यांना काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील तब्बल ५९७ परिचारिकांच्या नोकरीवर गदा आली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील १९ परिचारिकांना नाेकरी साेडावी लागणार आहे. ऐन दिवाळीत शासनाने हा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सध्या बिगर आदिवासी क्षेत्रात ३२०७ एएनएम पदे २०२२-२३ मध्ये प्रस्तावित करण्यात आली होती. त्याबाबतचा महाराष्ट्राच्या आरोग्य सेवा आयुक्त स्तरावरून तेवढीच पदे प्रस्तावित करणारा अंमलबजावणीचा आराखडा मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविला होता. त्यातील २ हजार ६१० पदांना मंजुरी मिळाली होती. त्यानुसार परिचारिकांना आरोग्य विभागाकडून नियुक्त्याही देण्यात आल्या आहेत.

मागील वर्षांत एकही बाळंतपण न झालेल्या उपकेंद्रातील परिचारिका पदे रद्द करावीत, ज्यांचे काम असमाधानकारक आहे, अशांना कमी करावे. ज्यांची सेवा कमी झाली आहे (सेवा ज्येष्ठतेनुसार) त्यांना कमी करावे, असे केंद्र शासनाने म्हटले आहे. मागील वर्षीही परिचारिका सेवा समाप्त करण्याची कार्यवाही करण्यात आली होती; परंतु अचानक दिलेले आदेश रद्द करून त्यांची सेवा समाप्त करू नये असे नव्याने आदेश काढण्यात आले होते.

पण यावर्षी केंद्राकडून राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तब्बल ५९७ परिचारिकांची नोकरी ३१ ऑक्टोबरपासून समाप्तीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिले आहेत. या आदेशामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या १९ परिचारिकांना कमी करण्यात येणार आहे. परिचारिकांना कमी करण्याच्या आदेशामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य