शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

... आणि भैरीबुवा शपथांमधून सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 5:41 PM

रत्नागिरीतील बारा वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या भैरी देवस्थानच्या विश्वस्त समितीने आता मंदिरात शपथा घेण्याला मनाई केली आहे. तसा फलकच मंदिरात लावण्यात आला आहे. राजकीय वर्तुळात अनेकदा भैरीबुवाला वेठीस धरले जात असल्याने आता हा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्दे... आणि भैरीबुवा शपथांमधून सुटलाआता मंदिरात शपथा घेण्याला मनाई

रत्नागिरी : रत्नागिरीतील बारा वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या भैरी देवस्थानच्या विश्वस्त समितीने आता मंदिरात शपथा घेण्याला मनाई केली आहे. तसा फलकच मंदिरात लावण्यात आला आहे. राजकीय वर्तुळात अनेकदा भैरीबुवाला वेठीस धरले जात असल्याने आता हा निर्णय घेण्यात आला आहे.नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी नगराध्यक्षपदी बसताना भैरीबुवासमोर मुदतीत राजीनामा देण्याचे कबुल केले होते. त्यानुसार काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी भैरी बुवासमोर आपला राजीनामा ठेवला होता.त्यानंतर शिवसेनेने सारवासारव करून राहुल पंडित यांचे कार्य चांगले असल्याचे सांगून तेच यापुढेही नगराध्यक्ष राहतील असे म्हटले होते. मात्र त्यांनी राजीनामा न देते रजेवर जावे असे ठरवण्यात आले. त्यामुळे भैरी बुवासमोर शपथ घेण्याचा मुद्दा पुढे आला होता.भैरी देवस्थान हे रत्नागिरीतील सर्वाधिक मानाचे स्थान आहे. शिमग्यात येथील उत्सव पाहण्यासाठी, त्यात सहभागी होण्यासाठी लाखो भाविक हजेरी लावतात. सर्वसाधारपणे १९९५ पासून राजकीय पक्षांनी आपापले कार्यक्रम राबवताना भैरी मंदिरात नारळ ठेवण्याची पद्धत सुरू केली. हे देवस्थान मानाचे असल्याने भैरीबुवासमोर कोणीही खोटे बोलत नाहीत, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच पद सोडण्याच्या, विशिष्ट ठिकाणी मतदान करण्याच्या शपथा भैरीबुवासमोर घेतल्या जातात.केवळ राजकीयच नाही तर अराजकीय, कौटुंबिक शपथाही भैरीबुवासमोर घेतल्या जातात. गेल्या काही काळात त्याबाबतच्या चर्चा अधिक वाढल्या असल्याने आता देवस्थान विश्वस्त मंडळाने मंदिरात देवासमोर कोणालाही शपथ घेता येणार नाही, अशी सूचनाच एका फलकाद्वारे लावली आहे. या निर्णयाचे काहीजणांकडून स्वागत केले जात आहे, तर काहीजणांकडून त्याबाबत काहीशी नाराजीही व्यक्त केली जात आहे. भैरीबुवासमोर खोटेपणा केला जात नसल्याने तो धाक लोकांमध्ये राहण्यासाठी अशी मनाई केली जाऊ नये, अशी भावनाही काहीजण व्यक्त करत आहेत.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेRatnagiriरत्नागिरी