शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत ई-व्हेइकलचा कारखाना उभारणार, उद्याेगमंत्री उदय सामंतांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 14:32 IST

रत्नागिरीतील औद्याेगिक विकासासाठी ८८ काेटींचा निधी मंजूर

रत्नागिरी : रत्नागिरीतील औद्याेगिक विकासासाठी ८८ काेटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, दावाेस येथे रत्नागिरीसाठी एक सामंजस्य करार झाला आहे. त्यानुसार ईव्ही व्हेइकलचा अमेरिकन बेस कारखाना रत्नागिरीत हाेणार असल्याची माहिती राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली, तसेच रायगड येथे स्किल इंडस्ट्रीज होत असून, रत्नागिरीतील उपकेंद्राला तत्त्वत: मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.रत्नागिरी औद्योगिक क्षेत्र (मिरजोळे ब्लॉक) अनिवासी इमारतअंतर्गत नवीन अतिथिगृहाचे बांधकाम करणे आणि जुन्या अतिथिगृह इमारतीचे नूतनीकरण करणे या कामाचे भूमिपूजन रविवारी (२ एप्रिल) मंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते. लोटे एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग येत असून, अभियांत्रिकी महाविद्यालयाचीही इमारत होत आहे. वैद्यकीय महाविद्यालयही रत्नागिरीमध्ये होत आहे. यामुळे रत्नागिरीतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याची गरज भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, एमआयडीसीचे मुख्य अभियंता सुभाष तुपे, कार्यकारी अभियंता राक्षे, ज्येष्ठ उद्योजक दिलीप भाटकर, फेडरेशन ऑफ रत्नागिरी डी स्टीक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन, उपअभियंता बी.एन. पाटील, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश म्हाप उपस्थित होते.सामंत म्हणाले की, रत्नागिरीमध्ये महाराष्ट्रातील सुंदर, सर्व सोयींनी सुसज्ज असे एमआयडीसीचे विश्रामगृह होत आहे. लोटे एमआयडीसीसाठी ७ कोटी, वॉटर सोर्स टाकीसाठी १२ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. एमआयडीसीमधील ८८ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला असून, त्यांना कायम केल्याचा आदेश येत्या दोन दिवसांत येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.ते म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्याच्या उद्योग जगताला ताकद देण्यासाठी ८८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये एमआयडीसीला जोडणारे शिरगाव, नाचणे, निवसर, निवळी, मिरजोळे, टिके या ग्रामपंचायतीतील रस्त्यांसाठी ३१ कोटी मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. इतर काही एमआयडीसीसाठी आवश्यक रस्त्यांसाठीही १३ कोटी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले.

उद्याेजकांना जे-जे लागेल ते-ते देऊरत्नागिरी इंडस्ट्रीज डी प्लसपेक्षा चांगल्या सोयी-सुविधा देण्यात येतील. उद्योजकांसाठी जे-जे लागेल ते-ते देण्याची हमी शासनातर्फे आम्ही देतो; परंतु उद्योजकांनीही रत्नागिरीमध्ये उद्योग करताना येथील स्थानिकांना रोजगारामध्ये प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत