शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

रत्नागिरीत ई-व्हेइकलचा कारखाना उभारणार, उद्याेगमंत्री उदय सामंतांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 14:32 IST

रत्नागिरीतील औद्याेगिक विकासासाठी ८८ काेटींचा निधी मंजूर

रत्नागिरी : रत्नागिरीतील औद्याेगिक विकासासाठी ८८ काेटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, दावाेस येथे रत्नागिरीसाठी एक सामंजस्य करार झाला आहे. त्यानुसार ईव्ही व्हेइकलचा अमेरिकन बेस कारखाना रत्नागिरीत हाेणार असल्याची माहिती राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली, तसेच रायगड येथे स्किल इंडस्ट्रीज होत असून, रत्नागिरीतील उपकेंद्राला तत्त्वत: मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.रत्नागिरी औद्योगिक क्षेत्र (मिरजोळे ब्लॉक) अनिवासी इमारतअंतर्गत नवीन अतिथिगृहाचे बांधकाम करणे आणि जुन्या अतिथिगृह इमारतीचे नूतनीकरण करणे या कामाचे भूमिपूजन रविवारी (२ एप्रिल) मंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते. लोटे एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग येत असून, अभियांत्रिकी महाविद्यालयाचीही इमारत होत आहे. वैद्यकीय महाविद्यालयही रत्नागिरीमध्ये होत आहे. यामुळे रत्नागिरीतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याची गरज भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, एमआयडीसीचे मुख्य अभियंता सुभाष तुपे, कार्यकारी अभियंता राक्षे, ज्येष्ठ उद्योजक दिलीप भाटकर, फेडरेशन ऑफ रत्नागिरी डी स्टीक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन, उपअभियंता बी.एन. पाटील, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश म्हाप उपस्थित होते.सामंत म्हणाले की, रत्नागिरीमध्ये महाराष्ट्रातील सुंदर, सर्व सोयींनी सुसज्ज असे एमआयडीसीचे विश्रामगृह होत आहे. लोटे एमआयडीसीसाठी ७ कोटी, वॉटर सोर्स टाकीसाठी १२ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. एमआयडीसीमधील ८८ कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला असून, त्यांना कायम केल्याचा आदेश येत्या दोन दिवसांत येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.ते म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्याच्या उद्योग जगताला ताकद देण्यासाठी ८८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये एमआयडीसीला जोडणारे शिरगाव, नाचणे, निवसर, निवळी, मिरजोळे, टिके या ग्रामपंचायतीतील रस्त्यांसाठी ३१ कोटी मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. इतर काही एमआयडीसीसाठी आवश्यक रस्त्यांसाठीही १३ कोटी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले.

उद्याेजकांना जे-जे लागेल ते-ते देऊरत्नागिरी इंडस्ट्रीज डी प्लसपेक्षा चांगल्या सोयी-सुविधा देण्यात येतील. उद्योजकांसाठी जे-जे लागेल ते-ते देण्याची हमी शासनातर्फे आम्ही देतो; परंतु उद्योजकांनीही रत्नागिरीमध्ये उद्योग करताना येथील स्थानिकांना रोजगारामध्ये प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत