शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

Ambedkar Jayanti: पुढील वर्षापासून आंबडवेत राज्य शासनाच्या माध्यमातून भव्यदिव्य कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 18:41 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे या मूळ गावी स्थानिक ग्रामस्थांतर्फे जयंती साजरी केली जाते.

मंडणगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे या मूळ गावी दरवर्षी स्थानिक ग्रामस्थांतर्फे जयंती साजरी केली जाते. मात्र, पुढील वर्षीपासून राज्य शासनाच्या माध्यमातून भव्यदिव्य स्वरूपात साजरी केली जाईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी आंबडवे (ता. मंडणगड) येथे केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयाेजन केले हाेते, यावेळी सामंत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित हाेते. मंत्री सामंत पुढे म्हणाले की, बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या आधारावर या देशाचा कारभार चालत आहे. त्यामुळे आंबडवे गावाचा बहुआयामी विकास करणे हे राज्य शासनाचे पहिले कर्तव्य मानतो. त्याकरिता सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्या विकासासह येथील शैक्षणिक सोयी-सुविधांच्या विकासाकरिता मी आग्रही राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, घटनाकारांचे गाव रत्नागिरी जिल्ह्यात आहे, ही बाब जिल्ह्याचा लौकिक वाढविणारी आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे आंबडवे येथे जगभरातील अभ्यासक व पर्यटकांना आकर्षणाचे केंद्र ठरेल, असे स्मारक व पुतळा उभा करू, असे आश्वासन त्यांनी दिले. डॉ. आंबेडकर यांचे अप्रकाशित चरित्र खंडाचे प्रकाशन आंबडवे येथे करणार असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी आमदार योगेश कदम, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम, माजी सदस्य संतोष गोवळे, अण्णा कदम, माजी सभापती स्नेहल सकपाळ, भाई पोस्टुरे, प्रकाश शिगवण, जिल्हा बँकेचे संचालक रमेश दळवी, प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, पोलीस निरीक्षक शैलेजा सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुनील सकपाळ यांनी भूषविले, तर नरेंद्र सकपाळ यांनी सूत्रसंचालन केले.

सहाजणांना शासकीय सेवेत घेवू

अर्धवट राहिलेल्या महाविद्यालयाच्या इमारतीसाठी चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. महाविद्यालयासाठी जमीन देणाऱ्या कुटुंबातील एका व्यक्तीला रोजगार देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी दिलेल्या यादीनुसार सहाजणांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या वेतनाची समस्याही मार्गी लावली जाणार आहे.

नवा अभ्यासक्रम

राज्यातील विद्यार्थ्यांना भारतीय संविधान कळावे याकरिता राज्य शासन पंधरा तासांचा शिक्षणक्रम अभ्यासक्रमात आणणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. लवकरच याबाबतचा शासननिर्णय जाहीर हाेणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीUday Samantउदय सामंत