शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

Ambedkar Jayanti: पुढील वर्षापासून आंबडवेत राज्य शासनाच्या माध्यमातून भव्यदिव्य कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 18:41 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे या मूळ गावी स्थानिक ग्रामस्थांतर्फे जयंती साजरी केली जाते.

मंडणगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे या मूळ गावी दरवर्षी स्थानिक ग्रामस्थांतर्फे जयंती साजरी केली जाते. मात्र, पुढील वर्षीपासून राज्य शासनाच्या माध्यमातून भव्यदिव्य स्वरूपात साजरी केली जाईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी आंबडवे (ता. मंडणगड) येथे केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयाेजन केले हाेते, यावेळी सामंत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित हाेते. मंत्री सामंत पुढे म्हणाले की, बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या आधारावर या देशाचा कारभार चालत आहे. त्यामुळे आंबडवे गावाचा बहुआयामी विकास करणे हे राज्य शासनाचे पहिले कर्तव्य मानतो. त्याकरिता सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्या विकासासह येथील शैक्षणिक सोयी-सुविधांच्या विकासाकरिता मी आग्रही राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, घटनाकारांचे गाव रत्नागिरी जिल्ह्यात आहे, ही बाब जिल्ह्याचा लौकिक वाढविणारी आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे आंबडवे येथे जगभरातील अभ्यासक व पर्यटकांना आकर्षणाचे केंद्र ठरेल, असे स्मारक व पुतळा उभा करू, असे आश्वासन त्यांनी दिले. डॉ. आंबेडकर यांचे अप्रकाशित चरित्र खंडाचे प्रकाशन आंबडवे येथे करणार असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी आमदार योगेश कदम, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम, माजी सदस्य संतोष गोवळे, अण्णा कदम, माजी सभापती स्नेहल सकपाळ, भाई पोस्टुरे, प्रकाश शिगवण, जिल्हा बँकेचे संचालक रमेश दळवी, प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, पोलीस निरीक्षक शैलेजा सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुनील सकपाळ यांनी भूषविले, तर नरेंद्र सकपाळ यांनी सूत्रसंचालन केले.

सहाजणांना शासकीय सेवेत घेवू

अर्धवट राहिलेल्या महाविद्यालयाच्या इमारतीसाठी चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. महाविद्यालयासाठी जमीन देणाऱ्या कुटुंबातील एका व्यक्तीला रोजगार देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी दिलेल्या यादीनुसार सहाजणांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या वेतनाची समस्याही मार्गी लावली जाणार आहे.

नवा अभ्यासक्रम

राज्यातील विद्यार्थ्यांना भारतीय संविधान कळावे याकरिता राज्य शासन पंधरा तासांचा शिक्षणक्रम अभ्यासक्रमात आणणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. लवकरच याबाबतचा शासननिर्णय जाहीर हाेणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीUday Samantउदय सामंत