शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

Ambedkar Jayanti: पुढील वर्षापासून आंबडवेत राज्य शासनाच्या माध्यमातून भव्यदिव्य कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 18:41 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे या मूळ गावी स्थानिक ग्रामस्थांतर्फे जयंती साजरी केली जाते.

मंडणगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे या मूळ गावी दरवर्षी स्थानिक ग्रामस्थांतर्फे जयंती साजरी केली जाते. मात्र, पुढील वर्षीपासून राज्य शासनाच्या माध्यमातून भव्यदिव्य स्वरूपात साजरी केली जाईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी आंबडवे (ता. मंडणगड) येथे केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयाेजन केले हाेते, यावेळी सामंत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित हाेते. मंत्री सामंत पुढे म्हणाले की, बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या आधारावर या देशाचा कारभार चालत आहे. त्यामुळे आंबडवे गावाचा बहुआयामी विकास करणे हे राज्य शासनाचे पहिले कर्तव्य मानतो. त्याकरिता सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्या विकासासह येथील शैक्षणिक सोयी-सुविधांच्या विकासाकरिता मी आग्रही राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, घटनाकारांचे गाव रत्नागिरी जिल्ह्यात आहे, ही बाब जिल्ह्याचा लौकिक वाढविणारी आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे आंबडवे येथे जगभरातील अभ्यासक व पर्यटकांना आकर्षणाचे केंद्र ठरेल, असे स्मारक व पुतळा उभा करू, असे आश्वासन त्यांनी दिले. डॉ. आंबेडकर यांचे अप्रकाशित चरित्र खंडाचे प्रकाशन आंबडवे येथे करणार असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी आमदार योगेश कदम, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम, माजी सदस्य संतोष गोवळे, अण्णा कदम, माजी सभापती स्नेहल सकपाळ, भाई पोस्टुरे, प्रकाश शिगवण, जिल्हा बँकेचे संचालक रमेश दळवी, प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, पोलीस निरीक्षक शैलेजा सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुनील सकपाळ यांनी भूषविले, तर नरेंद्र सकपाळ यांनी सूत्रसंचालन केले.

सहाजणांना शासकीय सेवेत घेवू

अर्धवट राहिलेल्या महाविद्यालयाच्या इमारतीसाठी चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. महाविद्यालयासाठी जमीन देणाऱ्या कुटुंबातील एका व्यक्तीला रोजगार देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी दिलेल्या यादीनुसार सहाजणांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या वेतनाची समस्याही मार्गी लावली जाणार आहे.

नवा अभ्यासक्रम

राज्यातील विद्यार्थ्यांना भारतीय संविधान कळावे याकरिता राज्य शासन पंधरा तासांचा शिक्षणक्रम अभ्यासक्रमात आणणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. लवकरच याबाबतचा शासननिर्णय जाहीर हाेणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीUday Samantउदय सामंत