शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

सत्तेचा सारीपाट: कोकणातील जुन्या संघर्षाचा नवा अध्याय सुरू

By मनोज मुळ्ये | Updated: April 19, 2024 13:50 IST

मनोज मुळ्ये  रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीची उमेदवारी भाजपकडे राहणार, हे निश्चित झाले आणि त्यासाठी उमेदवार म्हणून खासदार ...

मनोज मुळ्ये रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीची उमेदवारी भाजपकडे राहणार, हे निश्चित झाले आणि त्यासाठी उमेदवार म्हणून खासदार नारायण राणे यांचे नाव घोषित झाले. गेला महिनाभर रोज नव्या चर्चा, रोज नवी नावे, रोज नवे तर्क असे संभ्रमाचे वातावरण होते. आता मंत्री उदय सामंत म्हणतात, त्याप्रमाणे तिढा, पेच, गुंता सुटला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किरण सामंत यांचा महायुतीमध्ये सन्मान होईल, असा शब्द दिला आहे आणि हा गुंता सोडवण्यासाठी आम्ही एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे नाव भाजपने उमेदवार म्हणून जाहीर केल्यास महायुती म्हणून आम्ही त्यांच्यासोबत उभे राहू, असे घोषित करून उदय सामंत यांनी या निवडणुकीतील चित्र स्पष्ट केले आहे. आता महायुतीकडून नारायण राणे आणि महाविकास आघाडीकडून विनायक राऊत यांच्यामध्ये प्रमुख लढत होईल, असे चित्र आता तरी दिसत आहे. अर्थात राणे यांच्यासमोर विनायक राऊत उमेदवार असले तरी हा राणे विरुद्ध ठाकरे हा साधारण १९ वर्षे सुरू असलेल्या संघर्षाचा नवा अध्याय ठरू शकेल.

१९९० पूर्वी नारायण राणे मुंबईमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या सूचनेनुसार ते १९९० साली कोकणात आले. पहिलीच विधानसभा निवडणूक ते जिंकले आणि तेव्हापासून सातत्याने २००४ पर्यंत सलग चार विधानसभा निवडणुका शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजयी झाले. २००५ साली त्यांनी शिवसेना सोडली आणि ते काँग्रेसमध्ये गेले. त्यावेळेच्या पोटनिवडणुकीत आणि त्यानंतर २००९च्या विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले. त्यांनी २००५मध्ये शिवसेना सोडल्यापासून ठाकरे विरूद्ध राणे असा मोठा संघर्ष सुरू झाला. राजकीय आरोप - प्रत्यारोप हा भाग नित्याचा झालाच, पण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेले शिवसेनेचे प्राबल्यही कमी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना संपणार की काय, अशी चर्चा असतानाच २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी राणे यांचा पराभव केला. अर्थात तरीही ठाकरे विरूद्ध राणे हा संघर्ष या-ना त्या पद्धतीने सुरू होता. राणे यांच्यावर टीका करण्याला शिवसेनेत (आताच्या उद्धवसेनेत) खूप महत्त्व आहे.आता लोकसभेच्या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा हा संघर्ष समोर येण्याची शक्यता आहे. ही निवडणूक महायुतीविरूद्ध महाविकास आघाडी अशी होण्यापेक्षा राणे विरूद्ध ठाकरे अशीच होण्याची शक्यता आहे. राणे यांच्यावर टीका केल्यानंतर दिले जाणारे प्रत्युत्तर राजकीय खळबळ उडवून देणारे असते. आजवर असे प्रत्युत्तर राणे यांच्या परिवाराला एक पाऊल मागे नेणारे ठरले आहे. हे उद्धवसेनेला माहिती असल्याने मुद्दामहून त्यांना डिवचण्याचा प्रकारही केला जाण्याची शक्यता आहे.

विनायक राऊत २०१४ साली प्रथमच लोकसभेच्या रिंगणात उतरले आणि त्यांनी मोठा विजय मिळवला. नीलेश राणे यांच्याविरोधात त्यांनी दोनदा विजय मिळवला आहे. आता त्यांच्यासमोर नारायण राणे उभे आहेत. राऊत यांचा स्वभाव आक्रमक पद्धतीचा नाही. जशी आक्रमक शैली भास्कर जाधव यांच्याकडे आहे, तशी आक्रमकता राऊत यांच्याकडे नाही. त्यामुळे राणे यांना थोपवण्यासाठी उद्धवसेनेकडून आक्रमक पद्धत वापरली जाण्याची शक्यता आहे.उद्धवसेनेकडून भाजपपेक्षा राणे यांना टार्गेट केले जाण्याची शक्यता आहे. म्हणूनच ही लढाई राणे विरूद्ध राऊत अशी न होता, राणे विरूद्ध ठाकरे अशी होण्याची शक्यता अधिक आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narayan Raneनारायण राणेVinayak Rautविनायक राऊत