शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

कृषी विद्यापीठाला सरकारचे आर्थिक पाठबळ गरजेचे : निरंजन डावखरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 1:08 PM

कोकणच्या कृषि विकासाला गती देण्यासाठी कोकण कृषि विद्यापीठाला सरकारने आर्थिक पाठबळ देणे गरजेचे असल्याचे मत पदवीधर आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकृषी विद्यापीठाला सरकारचे आर्थिक पाठबळ गरजेचे : निरंजन डावखरेसमन्वयक म्हणून डावखरे यांची दापोली कोकण कृषी विद्यापीठाला भेट

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाला हक्काचा कुलगुरु नसल्याने प्रशासकीय कामात काही अडथळे निर्माण होऊन, गतिमान प्रशासनाला थोडा ब्रेक लागल्याचे बोलले जात आहे. परंतु, कोकण कृषि विद्यापीठाच्या प्रशासकीय कामाला गती देण्यासाठी समन्वयक या नात्याने प्रयत्न केले जाईल.

कोकणच्या कृषि विकासाला गती देण्यासाठी कोकण कृषि विद्यापीठाला सरकारने आर्थिक पाठबळ देणे गरजेचे असल्याचे मत पदवीधर आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केले.कोकण कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेवर निरंजन डावखरे यांची निवड झाली आहे. कृषी विद्यापीठाचे समन्वयक म्हणून त्यांनी दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. त्यावर लवकरच उपाय योजना केल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले. या भेटीदरम्याने त्यांनी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी केली.

शेतकऱ्यांच्या हिताचे संशोधन करीत आहेत आपण आजपर्यंत आंबा, काजू, नारळ, सुपारी, भात एवढेच संशोधन विद्यापीठाचे असल्याचे बोलले जात होते. मात्र विद्यापीठाने याही पुढे जाऊन कोकणच्या लाल मातीत उत्कृष्ट स्टॉबेरी भाजीपाला विविध फळ पिकाचे संशोधन केले आहे. विद्यापीठाचे हे संशोधन कौतुकास्पद आहे. विद्यापीठाचे कामाला सरकारची जोड मिळावी यासाठी आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.कोकण कृषि विद्यापीठाला सरकारची सर्वतोपरी मद्त मिळावी कोकणातील शेतकºयांचा व कृषि क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण, संशोधन, विस्तार या विविध उपक्रमाचा आढावा घेतला असता, काही बाबींना सरकारकडून आर्थिक मदतीची गरज असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.कोकण कृषि विद्यापीठाचे संशोधन आता केवळ कोकणापुरते मर्यादित राहु नये, त्याची व्याप्ती देश पातळीवर असायला हवी. कोकणातील भात, मासे, नारळ, सुपारी, आंबा, काजू या पुढे जावून संशोधन होने गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.सरकाने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यातील कृषि विद्यापीठे शिक्षण, संशोधन, विस्तार, या विविध स्तरावर काम सुरु आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारण्यासाठी कृषि विद्यपिठाचे संशोधन व आधुनिक तंत्रज्ञान फार महत्वाचे आहे.

टॅग्स :Niranjan Davkhareनिरंजन डावखरेRatnagiriरत्नागिरी