शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

Maharashtra Political Crisis: सांगा राव, रत्नागिरी नगर परिषदेतील नगरसेवक नेमके कोणाच्या बाजूने?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 12:06 IST

आमदार उदय सामंत शिंदे गटात सामील झाल्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेतील नगरसेवक काेणाच्या बाजूने जाणार हे अजूनही ठरलेले नाही.

अरुण आडिवरेकररत्नागिरी : राज्यातील शिवसेनेत पडलेल्या फुटीचे परिणाम रत्नागिरीतही जाणवू लागले आहेत. रत्नागिरी नगर परिषदेचे २० नगरसेवक आपल्या साेबत आहेत, असे आमदार उदय सामंत सांगत आहेत. तर आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेचे नगरसेवक शिवसेनेसाेबतच असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हे नगरसेवक नेमके कुणीकडे, असाच प्रश्न पडला आहे.आमदार उदय सामंत शिंदे गटात सामील झाल्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेतील नगरसेवक काेणाच्या बाजूने जाणार हे अजूनही ठरलेले नाही. आमदार सामंत रत्नागिरी दाैऱ्यावर आले असता नगरसेवक त्यांना भेटण्यासाठी गेल्याने राजकीय वादळ उठले. त्यानंतर शिवसेनेने प्रतिज्ञापत्र करून घेत ९ नगरसेवक पक्षातच असल्याचे जाहीर केले. पण, २५ जुलै राेजी पुन्हा आमदार सामंत रत्नागिरीत आले असता शासकीय विश्रामगृह येथे आजी - माजी नगरसेवकांनी भेट घेतली. या भेटीनंतर नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल्याचा फाेटाे व्हायरल झाला.इतक्या घडामोडींनंतर शिवसेनेचे नगरसेवक बाबा नागवेकर आणि बंटी कीर यांनी विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रमाेद शेरे यांची भेट घेऊन आमदार राजन साळवी यांचे घर गाठले. त्यांनी आपण शिवसेनेतच असल्याचे सांगितले. रत्नागिरीतील नगरसेवक सध्या इकडे आणि तिकडे नाचत असून, हे नेमके काेठे आहेत, यावरच शिक्कामाेर्तब झालेले नाही. त्यामुळे सध्या ‘गेले नगरसेवक कुणीकडे’ नाट्य पाहायला मिळत आहे. सध्या फेसबुक आणि व्हॉटस्ॲपवर या विषयावरुन खिल्लीही उडवली जात असल्याचे दिसत आहे.

एकाच रात्रीत तिकडेआमदार सामंत यांना भेटलेले बाबा नागवेकर व बंटी कीर हे दाेन नगरसेवक त्याच रात्री आमदार साळवींना जाऊन भेटले. त्यामुळे शिवसेनेतील नगरसेवकांना नेमके काय वाटते, त्यांचे नेमके काय चालले आहे, याचेच काेडे साऱ्यांना पडले आहे. सोशल मीडियावरही त्याची जोरदार चर्चा आहे.आमदार उदय सामंत म्हणतात...

मतदार संघात जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात आहे. रत्नागिरी नगर परिषदेतील शिवसेनेचे नगरसेवक हे माझ्यासाेबत म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाेबत आहेत. आम्ही सर्वजण शिवसेनेतच असून, शिवसेनेत राहूनच मुख्यमंत्री शिंदे यांचे समर्थन करणार आहाेत. हे सर्व मुख्यमंत्र्यांची भेट घेतील. शिवसेना बळकट करणे हेच आमचे ध्येय आहे.

आमदार राजन साळवी म्हणतात...

शिवसेनेचे १७ नगरसेवक अधिकृत चिन्हावर निवडून आले हाेते. ९ नगरसेवक आजही शिवसेनेसाेबतच आहेत. आमदार उदय सामंत यांनी बैठक घेतली. विकासाच्या कामाबाबत त्यांनी ही बैठक घेतती असल्याने बंटी कीर, बाबा नागवेकर हे तेथे गेले हाेते. त्यानंतर ते माझ्या घरी आले आणि त्यांनी आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतच काम करणार असल्याचे सांगितले. ते दोघेही शिंदे गटात गेलेले नाहीत, शिवसेनेतच आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाUday Samantउदय सामंतRajan Salviराजन साळवी