शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नारायण राणेंपाठोपाठ किरण सामंत सागर बंगल्यावर, रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेबाबत महायुतीतील संभ्रम कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 11:46 IST

रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीतील कोणता पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार, याबाबत शुक्रवारीही काहीच निर्णय झाला नाही. ज्यांच्या ...

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीतील कोणता पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार, याबाबत शुक्रवारीही काहीच निर्णय झाला नाही. ज्यांच्या नावाची अधिक चर्चा आहे, त्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यापाठोपाठ शुक्रवारी शिवसेनेचे इच्छुक उमेदवार किरण सामंत यांनीही फडणवीस यांची भेट घेतली. मात्र रात्रीपर्यंत उमेदवारीबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता.रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीकडून कोणता पक्ष लढणार, हेच अजून निश्चित नाही. २०१९ साली या जागेवर शिवसेनेचा खासदार निवडून आला असल्याने शिवसेनेने या जागेसाठी आग्रह धरला आहे. शिवसेनेकडून एकमेव किरण सामंत यांचे नाव पुढे आहे. मात्र येथे विद्यमान खासदार हे ठाकरे शिवसेनेचे आहेत, असा मुद्दा धरून भाजपने या जागेसाठी आपला आग्रह कायम ठेवला आहे. स्थानिक भाजपच्या या भूमिकेमुळे ही जागा काेणाला जाणार, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.गुरुवारी भाजप नेते नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील सागर बंगल्यावर भेट घेतली. त्यामुळे राणे यांची उमेदवारी अंतिम झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली. भाजपकडून राणे यांचे, तर शिवसेनेकडून किरण सामंत यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान, गुरुवारी रात्रीच किरण सामंत यांनी मुंबईकडे प्रयाण केले. शुक्रवारी त्यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेत फडणवीस यांची भेट घेतली.या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतरही हा मतदारसंघ भाजपकडे राहणार की शिवसेना लढवणार, हे स्पष्ट झालेले नाही. महायुतीमधील हा संभ्रम अजून कायम आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्गlok sabhaलोकसभाNarayan Raneनारायण राणे Shiv Senaशिवसेना