शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नारायण राणेंपाठोपाठ किरण सामंत सागर बंगल्यावर, रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेबाबत महायुतीतील संभ्रम कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 11:46 IST

रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीतील कोणता पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार, याबाबत शुक्रवारीही काहीच निर्णय झाला नाही. ज्यांच्या ...

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीतील कोणता पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार, याबाबत शुक्रवारीही काहीच निर्णय झाला नाही. ज्यांच्या नावाची अधिक चर्चा आहे, त्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यापाठोपाठ शुक्रवारी शिवसेनेचे इच्छुक उमेदवार किरण सामंत यांनीही फडणवीस यांची भेट घेतली. मात्र रात्रीपर्यंत उमेदवारीबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता.रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीकडून कोणता पक्ष लढणार, हेच अजून निश्चित नाही. २०१९ साली या जागेवर शिवसेनेचा खासदार निवडून आला असल्याने शिवसेनेने या जागेसाठी आग्रह धरला आहे. शिवसेनेकडून एकमेव किरण सामंत यांचे नाव पुढे आहे. मात्र येथे विद्यमान खासदार हे ठाकरे शिवसेनेचे आहेत, असा मुद्दा धरून भाजपने या जागेसाठी आपला आग्रह कायम ठेवला आहे. स्थानिक भाजपच्या या भूमिकेमुळे ही जागा काेणाला जाणार, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.गुरुवारी भाजप नेते नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील सागर बंगल्यावर भेट घेतली. त्यामुळे राणे यांची उमेदवारी अंतिम झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली. भाजपकडून राणे यांचे, तर शिवसेनेकडून किरण सामंत यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान, गुरुवारी रात्रीच किरण सामंत यांनी मुंबईकडे प्रयाण केले. शुक्रवारी त्यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेत फडणवीस यांची भेट घेतली.या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतरही हा मतदारसंघ भाजपकडे राहणार की शिवसेना लढवणार, हे स्पष्ट झालेले नाही. महायुतीमधील हा संभ्रम अजून कायम आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्गlok sabhaलोकसभाNarayan Raneनारायण राणे Shiv Senaशिवसेना