शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

नाणार रिफायनरी प्रकल्पाचा सेनेला फायदा आणि तोटाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 2:42 PM

नाणार रिफायनरी प्रकल्पविरोधी समितीने प्रकल्प रद्द झाल्यानंतर स्वतंत्र पक्ष आणि आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा जाहीर करून शिवसेनेला धोबीपछाड देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातूनही आपला मार्ग मोकळा करण्याची किमया शिवसेनेने साधली आहे

ठळक मुद्देपरिसरातील १४ गावांमध्ये नेमके काय होणार, याकडे साºयांचे लक्ष लागले आहे. प्रकल्प समर्थकांचेही आणि विरोधकांचेही!

-मनोज मुळ्ये

नाणार रिफायनरी प्रकल्पविरोधी समितीने प्रकल्प रद्द झाल्यानंतर स्वतंत्र पक्ष आणि आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा जाहीर करून शिवसेनेला धोबीपछाड देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातूनही आपला मार्ग मोकळा करण्याची किमया शिवसेनेने साधली आहे. त्यामुळे प्रकल्प विरोधकांमधील एक मोठा गट बाजूला झाल्याचे चित्र दिसत आहे. प्रकल्प विरोधी आंदोलनाचे नेते अशोक वालम यांनी आपली राजकारणात पडण्याची सुप्त इच्छा जाहीर केल्यामुळे या पुढच्या घडामोडी घडत असल्याचा अंदाज लावला जात आहे. एका बाजूला अशोक वालम शिवसेनेच्या विरोधात उभे राहात असताना प्रकल्प विरोधातील एका गटाने शिवसेनेच्या कामाचे कौतुक केले आहे.

नाणार रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला आणि भाजपशी युती करताना हा प्रकल्प रद्दही करून घेतला. हा प्रकल्प जे रद्द करतील, त्यांच्यासोबत आम्ही राहू, असे नाणार प्रकल्पग्रस्तांच्यावतीने जाहीर करण्यात आले होते. प्रकल्प रद्द होईपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे नेते अशोक वालम शिवसेनेच्या नेत्यांसोबत होते. सुकथनकर समितीच्या रत्नागिरीतील बैठकीप्रसंगी तर ते शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून उभे होते. जातानाही ते शिवसेनेच्या शिष्टमंडळासोबतच गेले. प्रकल्प रद्द झाल्यानंतर मात्र त्यांनी आपली भाषा बदलली. आधी प्रकल्प रद्द करणाºयांच्या सोबत राहू, असे म्हणणाऱ्यांनी नंतर विधानसभेच्या निवडणुकीला आपण रिंगणात उभे राहू, असे स्पष्ट केले. जो पक्ष आपल्याला विधानसभेला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर करेल, त्या पक्षाला लोकसभेसाठी नाणारवासीय पाठिंबा देतील, अशी भूमिका त्यांनी जाहीरपणे मांडली.

कदाचित ही महत्त्वाकांक्षाच नाणारवासियांना काही विशेष माहिती देऊन गेली असावी. म्हणूनच काही दिवसात नाणारमधील रिफायनरीविरोधी शेतकरी-मच्छीमार संघटनेचे सचिव अरविंद सामंत यांनी शिवसेनेच्या व्यासपीठावर उपस्थित राहून नाणारवासियांच्यावतीने शिवसेनेचे आभार मानले. जे प्रकल्प रद्द करतील, त्यांच्या पाठीशी उभी राहण्याचा शब्द नाणार प्रकल्पग्रस्तांनी दिला होता. प्रकल्प रद्द करण्याचा शब्द शिवसेनेने पाळला आहे. आता आम्ही आमचा शब्द पाळायला हवा, असे विधान सामंत यांनी व्यासपीठावरूनच केले होते. त्यामुळे नाणार प्रकल्पग्रस्तांमधील एक गट वालम यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला खतपाणी घालणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

प्रकल्प प्रस्तावित असलेल्या १४ गावांपैकी बहुतांश गावात शिवसेनेचे प्राबल्य आहे. हे शिवसैनिक आतापर्यंत प्रकल्पग्रस्त म्हणून वालम यांच्यासोबत होते. मात्र, निवडणुकीच्या पातळीवर ते वालम यांना साथ देणार नाहीत, हे खरं आहे. शिवसेना आपल्या पाठीशी उभी राहिली आणि त्यामुळेच आपला प्रश्न सुटला, ही गोष्ट सर्वसामान्य प्रकल्पग्रस्तांनाही चांगलीच माहिती आहे. त्यामुळे त्यांची आता राजकीयदृष्ट्या दिशाभूल करणे शक्य होणार नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा फायदा होणार आहे.

स्वाभिमानच्यावतीने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीही प्रकल्पाला विरोध केला होता. मात्र, प्रकल्प रद्द होण्यासाठी शिवसेनेने अधिक आक्रमकता दाखवली. नाणार आणि परिसरातील १४ गावांमधील लोकांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी शिवसेनेने आपली ताकद किंबहुना प्रतिष्ठा पणाला लावली. त्यामुळे प्रकल्प रद्द झाल्याच्या फायदा स्वाभिमानपेक्षा शिवसेनेला अधिक होईल.

मात्र, त्याचवेळी रिफायनरी रद्द झाल्याचा तोटाही शिवसेनेला होणार आहे. प्रकल्पाला समर्थन देणाºयांची संख्याही दुर्लक्षून चालणार नाही. प्रकल्प हवाय, असे वाटणारेही लोक आहेत आणि आजच्या घडीला या लोकांचा सर्वाधिक राग शिवसेनेवर आहे. शिवसेनेमुळे प्रकल्प रद्द झाला, असे अशोक वालम यांना ठाम वाटत नसले तरी प्रकल्प समर्थकांची मात्र तीच ठाम भूमिका आहे. शिवसेनेमुळे प्रकल्प गेला. त्यामुळे प्रकल्प समर्थकांनी आपला उमेदवारही उभा केला आहे. ही लढाई राजकीय कारणांसाठी नाही तर कोकणातील तरूणांना रोजगार देण्यासाठीची आहे, अशी भूमिका घेत प्रकल्प समर्थकांनी रिंगणात पाय ठेवला आहे. त्यांना मिळणारी मते हे प्रकल्प समर्थनार्थ मिळालेली मते असतील. हा शिवसेनेसाठी तोटा आहे. शिवसेनेला याची गांभीर्याने दखल घ्यावी लागेल. कदाचित ही मते खूप नसतील. पण ती दुर्लक्षून चालणार नाहीत, हे नक्की. प्रकल्प समर्थकांमुळे शिवसेनेची किती मते कमी होतात आणि प्रकल्प विरोधकांमुळे किती वाढतात, हे निवडणुकीच्या निकालानंतर कळेलच.

राजकीय महत्वांकाक्षाही आली पुढे

नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द होण्यासाठी शिवसेनेने आपली सगळी ताकद किंबहुना प्रतिष्ठा पणाला लावली. प्रकल्प रद्द झाला. या निर्णयाचा शिवसेनेला फायदाही होेईल आणि तोटाही होेईल. ज्यांचा प्रकल्पाला विरोध आहे, त्यांच्याकडून फायदा आणि ज्यांना प्रकल्प हवा होता, त्यांच्याकडून तोटा अशा कात्रीला शिवसेनेला सामोरे जावेच लागणार आहे. अशोक वालम यांची राजकीय महत्त्वाकांक्षाही त्यानिमित्ताने पुढे आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत नाणार आणि परिसरातील १४ गावांमध्ये नेमके काय होणार, याकडे साºयांचे लक्ष लागले आहे. प्रकल्प समर्थकांचेही आणि विरोधकांचेही!

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीnanar refinery projectनाणार प्रकल्प