शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

एसआयटीमार्फत चौकशी करुन दोषींवर कारवाई - चार महिन्यांच्या आत बेघरांना पक्की घरे देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 00:47 IST

तिवरे येथे धरण फुटून २३ जणांचा मृत्यू झाला, ही घटना अतिशय दुदैर्वी घटना आहे. याबाबत एसआयटीमार्फत चौकशी करून संबंधित दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल. ज्यांची घरे वाहून गेली आहेत, त्यांना चार महिन्यांच्या आत घरे बांधून दिली जातील,

ठळक मुद्देजलसंपदामंत्री गिरीश महाजन : तिवरेला दिली भेट

रत्नागिरी : तिवरे येथे धरण फुटून २३ जणांचा मृत्यू झाला, ही घटना अतिशय दुदैर्वी घटना आहे. याबाबत एसआयटीमार्फत चौकशी करून संबंधित दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल. ज्यांची घरे वाहून गेली आहेत, त्यांना चार महिन्यांच्या आत घरे बांधून दिली जातील, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज कामथे येथे केले. सोबतच यातील मृत व्यक्तिच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे.

मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास चिपळूण तालुक्यात असणारे हे तिवरे धरण फुटले. समोरील बाजूस असणाऱ्या एका वाडीतील सुमारे पंधरा घरे वाहून गेली. यात २४ जण बेपत्ता असल्याचे सुरुवातीला कळाले होते. तथापी एनडीआरएफच्या बचाव पथकाने कृती करत एका व्यक्तिचा जीव वाचवला. त्याला उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि गृहनिर्माण राज्यमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणीदेखील केली. तत्पूर्वी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांनी नातेवाईकांशी चर्चा केली व माहिती जाणून घेतली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, यामध्ये ज्यांची घरे नष्ट झाली आहेत, अशा सर्वांची व्यवस्था सध्या एका शाळेत करण्यात आली आहे. त्यांना चांगल्या पद्धतीची मजबूत घरे चार महिन्यांच्या आत बांधून देण्याच्या सूचना मी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना दिल्या आहेत, असे ते म्हणाले.

मंगळवारी रात्री ही घटना घडल्यानंतर रात्रीपासूनच सर्व अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले होते. शक्य त्या पद्धतीने जीव वाचवता येईल, अशा वाहून गेलेल्या व्यक्ती शोधण्याचे काम चालू होते. त्यानंतर आज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील पथक या मदत कार्यात सहभागी झाले. त्यानंतर मदत कार्याने वेग घेतला. तथापि संपूर्ण खडकाळ व मोठ्या दगडांची नदी असणाºया या पात्रात होडी व इतर साधने जाणे शक्य नव्हते. त्यामुळे प्रत्यक्ष नदीपात्रात न फिरता मृतदेहांचा शोध सुरू झाला. हे धरण सुमारे वीस वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते. सातारा जिल्ह्यात भरण्याच्या धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने हे धरण फुटल्याचे सकृतदर्शनी दिसून आले.

याबाबत बोलताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, या धरणातील गळती होत आहे, अशी वारंवार तक्रार येत असताना त्याकडे दुर्लक्ष करणाºया संबंधित दोषी अधिकाऱ्यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. संबंधितांवर कारवाई निश्चितपणे केली जाईल. या कार्यात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल हे काल रात्रीपासूनच घटनास्थळावर पोहोचले होते. ज्यांचे जीव वाचवण्यात यश आले, अशा सर्वांची व्यवस्था याच गावालगत असणाºया एका शाळेत करण्यात आली आहे.

तक्रारी येऊनही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करणे चुकीचे.दोषी अधिकाऱ्यांची एसआयटीमार्फत चौकशी.सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील पथक मदत कार्यात सहभागी.प्रत्यक्ष नदीपात्रात न फिरता मृतदेहांचा शोध सुरू. धरण सुमारे वीस वर्षांपूर्वी बांधण्यात आले. धरणक्षेत्रात जास्त पाऊस?

तिवरे धरण : सद्यस्थितीतिवरे धरण २000 साली बांधून पूर्ण झाले.२.४५२ दशलक्ष घनमीटर इतकी त्याची पाणी साठवणुकीची क्षमता आहे.धरण बांधल्यानंतर आजतागायत त्याची दुरूस्ती झालेली नाही.दोन वर्षांपूर्वी २0१७मध्ये कालव्याच्या मुख्य दरवाजापाशी गळती सुरू झाली. त्याबाबत ग्रामस्थांनी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदने दिली.१२ मे २0१९ रोजी पाटबंधारे खात्याच्या दापोलीतील अधिकाऱ्यांनी तिवरे धरणाची पाहणी केली. चार दिवसात दुरूस्तीचे काम करण्याचे आश्वासन दिले.दि. ३0 मे रोजी कालव्याच्या दरवाजानजीक दुरूस्ती करण्यात आली. दगड आणि माती टाकून ही दुरूस्ती करण्यात आली.दुरूस्तीनंतर फक्त ३४ दिवसांनीच धरण फुटले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDamधरण