शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

उत्तर प्रदेशमधील कुटुंबाच्या गाडीला राजापुरात अपघात, महिलेचा मृत्यू

By मनोज मुळ्ये | Updated: April 5, 2024 19:05 IST

राजापूर : पुण्यातील कार्यक्रम आटोपून गोव्याला फिरायला जाणाऱ्या उत्तर प्रदेशमधील चौरसिया कुटुंबाच्या गाडीला अणुस्कुरा-ओणी मार्गावरील येळवण-बागवे (ता. राजापूर) येथे ...

राजापूर : पुण्यातील कार्यक्रम आटोपून गोव्याला फिरायला जाणाऱ्या उत्तर प्रदेशमधील चौरसिया कुटुंबाच्या गाडीला अणुस्कुरा-ओणी मार्गावरील येळवण-बागवे (ता. राजापूर) येथे आज, शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात राजरानी चौरसिया (वय-६८) या महिलेचा मृत्यू झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी झाडावर आदळून हा अपघात झाला.उत्तर प्रदेश येथील चौरसिया कुटुंब काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमासाठी उत्तरप्रदेशहून पुण्याला आले होते. त्या ठिकाणचा कार्यक्रम आटोपून ते गोव्याला फिरण्यासाठी निघाले हाेते. शक्ती राजाराम चाैरसिया (२६, रा. पुणे) हे चारचाकी गाडी (युपी ५३, डीएम ८०९०) घेऊन पुण्यावरून ओणी-विटा महामार्गाने अणुस्कुरा-पाचल-ओणी असा प्रवास करत होते. या गाडीतून पाचजण प्रवास करत हाेते. ही गाडी शुक्रवारी सकाळी ७:३० वाजता अणुस्कुरा-ओणी मार्गावरील येळवण-बागवे येथे आली असता शक्ती चाैरसिया यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या जुनाट झाडावर आदळली.

ही धडक एवढी जबरदस्त हाेती की, राजरानी चौरसिया यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच राजरानी चाैरसिया यांचा माेठा मुलगा चालक शक्ती चौरासिया, संजयकुमार चौरासिया (४७), सरिता संजय कुमार चौरासिया (४२) आणि चार वर्षाची लहान मुलगी किमाया चौरासिया किरकाेळ जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती रायपाटण पोलिस स्थानकाचे पाेलिस काॅन्स्टेबल नीलेश कात्रे, स्वप्निल घाडगे, भीम कोळी तसेच राजापूर दक्षता कमिटीच्या धनश्री मोरे यांना कळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी पाेहाेचून मदत केली. मृत महिलेचा मृतदेह रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आला हाेता. राजापूरचे पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन कुटुंबाची चौकशी केली. पुढील तपास राजापूरचे पोलिस उपनिरीक्षक सुधीर उबाळे आणि त्यांचे सहकारी करत आहेत

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेश