शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

निसर्ग शक्तीचा अनोखा चमत्कार, कोकणात आढळतात गरम पाण्याचे झरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 6:33 PM

- महेश कदम, रत्नागिरी कोकण भूमीत आढळणारे गरम पाण्याचे झरे म्हणजे, निसर्ग शक्तीचा अनोखा चमत्कार आहे. याची निर्मिती हजारो ...

- महेश कदम,रत्नागिरीकोकण भूमीत आढळणारे गरम पाण्याचे झरे म्हणजे, निसर्ग शक्तीचा अनोखा चमत्कार आहे. याची निर्मिती हजारो वर्षांपूर्वी झाली. यात स्नान केल्याने त्वचारोग बरे होणे अथवा पाप नष्ट होते अशी लोकांची श्रद्धा आहे. सुमारे सातशे वर्षांपूर्वी या स्थळी मंदिराची उभारणी झाल्याचे दिसते. त्यामुळे तीर्थक्षेत्राचे महत्त्व प्राप्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यात आरवली, राजवाडी, तुरळ, उन्हाळे याठिकाणी अशा प्रकारचे गरम पाण्याचे झरे आहेत. आजच्या युगातही मोठ्या संख्येने पर्यटक व भाविक येथे भेट देऊन, स्नानाचा आनंद लुटतात.सन १६६८ यावर्षी राजापुरात फ्रेंच वखार स्थापन झाली. डेलाॅन नावाचा फ्रेंच प्रवासी सन १६७० मध्ये राजापुरात आला होता. तो आपल्या प्रवास वृत्तात म्हणतो, ‘‘फ्रेंचांनी नुकतीच येथे वखार घातली असून, जवळच एक सुंदर घर बांधले आहे. तेथे मोठ्या कारंजाशेजारी मोठी बाग आहे. त्या कारंज्यातून गरम पाण्याचा झरा वाहतो. युरोपातील कुठल्याही कारंजापेक्षा तो कमी प्रतीचा नाही.’’ यात डेलाॅनने उल्लेखिला गरम पाण्याचा झरा ‘उन्हाळे’ येथील आहे. अर्जुना नदीच्या मुख्य प्रवाहातिरी, फ्रेंचांची वखार होती. परंतु, सध्या ती पूर्णपणे नष्ट झाली असून, तिचे काहीच अवशेष शिल्लक नाहीत.दुसरी नोंद ‘बार्थलेमी ॲबे कॅरे’ या फ्रेंच प्रवाशाने आपल्या ‘The Travel Of In India And The Near East १६७२ To १६७४’ म्हणजे ‘भारत आणि पूर्वेकडील देशातील प्रवास’ या ग्रंथात नोंदवली आहे. सुरत ते गोवा असा कॅरेचा प्रवास, बहुतांशी हिंदवी स्वराज्याच्या मुलूखातून झाला. त्याच्याजवळ मराठ्यांची दस्तके म्हणजे परवाना असल्याने, मार्गात कुठेच अडचण भासली नाही. तो लिहितो, ‘‘१३ डिसेंबर १६७२ रोजी दुपारी, आम्ही एका टेकडीच्या पायथ्याशी पोहोचलो. येथे लोकांची गर्दी असून, यात स्त्रियाही होत्या, माझ्या एका सहकाऱ्याने सांगितलं की, हे एक हिंदूंचे पवित्र धार्मिक क्षेत्र आहे. याठिकाणी असणाऱ्या गरम पाण्याच्या कुंडात स्नान करण्यासाठी अनेक भाविक येत असतात. यात स्नान केल्याने, सर्व पाप आणि असाध्य आजार बरे होतात. माझ्या सोबत असलेले मजूर व भोई श्रद्धाळू होते. त्यांनाही तेथे स्थान करण्याची इच्छा झाल्याने, मी त्यांना तशी परवानगी दिली. याठिकाणी पाण्याची दोन कुंडे असून, एकातील पाणी उकळल्यासारख गरम होत, तर दुसऱ्यातील पाणी अगदीच थंड आहे.’’वर उल्लेख केलेला गरम पाण्याचा झरा, संगमेश्वर जवळ असल्याचे ॲबे कॅरे सांगतो. संगमेश्वरापासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटर अंतरावर, राजवाडी गावाजवळील रामेश्वर मंदिराजवळ गरम पाण्याचा झरा आहे. या मंदिराचे बांधकाम व रचना पाहता, सुमारे तीन शतकापूर्वी याची निर्मिती झाल्याचे अनुमान होते. तसेच तुरळ गावाजवळ अजून एक गरम पाण्याचा झरा असून, लगतच हेमाडपंथी रचनेचे एक प्राचीन शिवमंदिर, सध्याही पडझड झालेल्या अवस्थेत आहे. कॅरेने आपल्या प्रवास वृत्तात वर्णीत केलेला गरम पाण्याचा झरा, वर सांगितलेल्या दोन ठिकाणातील एक असावा असे वाटते.

  • गरम पाण्याच्या झऱ्या संदर्भात, ऐतद्देशीय साधनात जास्त उल्लेख सापडत नाही, परंतु काही परकीय प्रवाशांच्या, भारतातील प्रवास वर्णनात अशी नोंद आढळते.
  • शिवकालात कोकणातील सागरी व्यापार हा भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया होता. परकीय सत्तांनी समुद्रकिनारी व अंतर्गत भागात खाडीवर आपली व्यापारी केंद्रे म्हणजेच ‘वखारी’ उघडल्या.
  • याचे प्रमुख कारण म्हणजे सुरतेपेक्षा, कोकणातील बंदरात माल स्वस्त मिळत असे. हे परकीय प्रवासी आपल्या सोबत वखारींची पत्रेही ने-आण करीत, त्यामुळे त्यांचा मुक्काम वखारीत होई. अशाच काही फ्रेंच प्रवाशांनी आपल्या कोकण प्रवासात गरम पाण्याच्या झऱ्याविषयी लिहून ठेवले आहे.
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी