शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात अपघातांची मालिका, २३ दिवसात तब्बल ३६ अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 17:23 IST

रत्नागिरी : कोरोनाचे निर्बंध हटल्यानंतर प्रथमच यंदा जिल्ह्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली खरी, मात्र त्याचबरोबर अपघातांचे प्रमाणही वाढले ...

रत्नागिरी : कोरोनाचे निर्बंध हटल्यानंतर प्रथमच यंदा जिल्ह्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली खरी, मात्र त्याचबरोबर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. केवळ मे महिन्याच्या २३ दिवसात जिल्ह्यात ३६ अपघात झाले असून, त्यात १८ जण ठार, तर ५५ जण जखमी झाले आहेत. यातील बहुतांश अपघात मुंबई - गोवा महामार्गावर झाले आहेत.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे लोक घराबाहेर पडणे टाळत होते. सरकारी निर्बंधांपेक्षा कोरोनाच्या भीतीने लोक आपले घर, गाव सोडून बाहेर जात नव्हते. मात्र, यंदा वातावरण निवळले आहे. कोरोना जवळजवळ हद्दपार झाल्यात जमा आहे. त्यामुळे यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यात बहुसंख्य पर्यटक आले आहेत. रत्नागिरी, गुहागर, दापोली यांसारख्या किनारपट्टीच्या भागात तर पर्यटकांची खूप वर्दळ आहे.

वाहनांची वाढलेली वर्दळ लक्षात घेता बहुतांश पर्यटक हे खासगी वाहनानेच आले असल्याचे दिसत आहे. सद्यस्थितीत मुंबई - गोवा महामार्गावर आणि शहरांतर्गतही वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळेच जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

रुंदीकरण झाले, पण...

मुंबई - गोवा महामार्ग अरुंद आणि वळणावळणांचा असल्याने अपघातांची संख्या अधिक आहे, असा आक्षेप घेतला जात होता. महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर अपघातांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा होती. सद्यस्थितीत खेड तसेच चिपळूण तालुक्यातील बऱ्याचशा महामार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाले आहे. तेथील वळणे कमी झाली आहेत. पण तेथील अपघात अजूनही कमी झालेले नाहीत.

चांगला रस्ता, वेग वाढला

चांगल्या रस्त्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. वळणे कमी झाली असली तरी आहेत त्या वळणात गाड्यांचा वेग कमी होत नाही. कोकणाबाहेरील वाहनचालकांना या वळणांचा अंदाज येत नाही. त्यामुळे गाड्या रस्त्याशेजारी कलंडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यात बेपर्वाई हेच प्रमुख कारण आहे.

मदतीमुळे मृत्यू कमी

महामार्गावर शासकीय तसेच खासगी रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध होतात. नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिका थोड्याच वेळात अपघातस्थळी पोहोचतात. त्यामुळे अपघातांची संख्या अधिक असली तरी वेळेत उपचार मिळत असल्याने मृत्यूचे प्रमाण मात्र सुदैवाने आटोक्यात राहिले आहे.

तालुकानिहाय अपघात

१ मेपासून खेड आणि चिपळूण तालुक्यात प्रत्येकी ९, रत्नागिरीत ८, संगमेश्वरमध्ये ४, लांजात ३, राजापुरात २, तर दापोलीत एक अपघात झाला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातtourismपर्यटन