शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तोतया पोलिसांची लुटारु टोळी; रत्नागिरी, चिपळूण येथे वृद्धांना लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 12:18 IST

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले

रत्नागिरी : पाेलिस असल्याचे सांगून रत्नागिरी आणि चिपळूण येथे दाेन वृद्धांना लुटल्याच्या घटना शनिवारी (२५ फेब्रुवारी) घडल्या. याप्रकरणी रत्नागिरीत तिघांविराेधात तर चिपळुणात दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भामट्यांनी वृद्धांच्या अंगावरील दागिने लुटले असून, दागिने लुटणारी टाेळी पुन्हा जिल्ह्यात कार्यरत झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.रत्नागिरीतील घटनेबाबत गिरीधर दत्तात्रय साखरकर (७३, रा. मारुती मंदिर, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. ते शनिवारी दुपारी १:३० वाजता श्रीदेव भैरी मंदिरातून देवदर्शन करून रस्त्याने चालत जात हाेते. त्यावेळी तीन अज्ञात व्यक्ती तिथे आल्या. त्यांनी आपण पाेलिस असल्याचे सांगत सुरक्षिततेसाठी बाेटातील अंगठ्या कागदाच्या पुडीत बांधून पिशवीत ठेवत असल्याचे भासवले. त्यानंतर त्यांना बाेलण्यात गुंतवून कागदाच्या पुडीतील अंगठ्या चाेरून पुडीत दगड ठेवून पाेबारा केला. याप्रकरणी रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.असाच प्रकार चिपळूण येथे घडला असून, दिवाकर गाेविंद नेने (७५, रा. प्रांत ऑफिससमाेर, चिपळूण) यांनी फिर्याद दिली आहे. ते शनिवारी सकाळी १० वाजता दूध आणण्यासाठी जात असताना दाेन अज्ञात व्यक्तींनी त्यांना ‘ओ काका जरा इकडे या,’ अशी हाक मारून बाेलावून घेतले. दाेघांनी काेराेनाचे कारण सांगून मास्क वगैरे विचारून तुमच्याकडील माेबाईल, घड्याळ, साेन्याचे दागिने रुमालात बांधून ठेवा. पुढे चाेऱ्या हाेत आहे, आम्ही पाेलिस आहाेत, आम्ही सगळ्यांना सांगत आहाेत, असे सांगितले. त्यानंतर नेने यांना गळ्यातील साेन्याची चेन व हातातील अंगठी, माेबाईल व घड्याळ रुमालात गाठी मारून खिशात ठेवण्यास सांगितले. या वस्तू खिशात ठेवून ते दूध आणण्यासाठी गेले. त्याचवेळी त्यांनी खिशातील रुमालात पाहिले असता दागिने, माेबाईल, घड्याळ नसल्याचे लक्षात आले. आपल्याकडील ऐवज चाेरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी चिपळूण पाेलिस स्थानकात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे. दाेन्ही घटनांमध्ये चाेरीला गेलेल्या ऐवजाचा तपशील पाेलिसांनी दिलेला नाही. त्यामुळे त्याचा तपशील मिळू शकलेला नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी