शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

Ratnagiri: प्रेमसंबंध तोडायला सांगितले; रिक्षाचालकाने जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 12:08 IST

लांजा : तालुक्यातील गवाणे येथील ३८ वर्षीय विवाहित रिक्षाचालकाने घराशेजारी असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ...

लांजा : तालुक्यातील गवाणे येथील ३८ वर्षीय विवाहित रिक्षाचालकाने घराशेजारी असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. लग्न झालेले असताना अन्य एका महिलेसोबत असलेले प्रेमसंबंध घरच्या सर्वांना कळल्याच्या नैराश्येतून त्याने हा प्रकार केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.गवाणे येथील विनायक आनंद कांबळे (३८) हा रात्र पाळीमध्ये लांजा येथे रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह चालवत होता. लग्न होऊन आठ वर्षे उलटूनही मुलबाळ होत नसल्याने तो निराश होता. त्याचे लांजा येथे राहणाऱ्या एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याची माहिती घरच्या मंडळींना मिळाली. मंगळवारी विनायकला घेऊन त्याचे आईवडील व त्याची पत्नी त्या महिलेकडे गेले. ती महिला व विनायकची एकत्र समजूत काढण्यात आली. यापुढे आम्हा दोघांमध्ये कोणताच संबंध राहणार नाही, असे आश्वासन विनायकने दिल्यानंतर या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला होता.रात्री जेवून सर्व कुटुंब झोपी गेले. सकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान पत्नी उठली, त्यावेळी विनायक झोपलेला होता. त्यानंतर तीही झोपली. नंतर विनायकने रिक्षाची केबल घेऊन घराशेजारी असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास लावून घेतला. ५:३० वाजता पत्नी उठली असता विनायक आपल्या जागेवर नसल्याने शोधाशोध करण्यात आली. तो आसपास प्रातविरधीसाठी गेला असेल असे सर्वांना वाटले. त्याची आई सकाळी अंगणात आली असता तिला आंब्याच्या झाडाला विनायक लटकत असल्याचे दिसले. तिने आरडाओरडा केल्यानंतर विनायकचे वडील, पत्नी धावत आली.विनायकने आत्महत्या केल्याची खबर वडील आनंद सयाजी कांबळे यांनी लांजा पोलिसांनी दिली आहे. आनंद यांना विवाहित तीन मुली आहेत. विनायक हा एकुलता मुलगा असल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अमोद सरगले अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस