शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार - खासदार नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 12:42 IST

रत्नागिरी : कोकणातील तरुणांना कोकणातच रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी रिफायनरी प्रकल्प गरजेचा आहे. हा प्रकल्प होण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यावर ...

रत्नागिरी : कोकणातील तरुणांना कोकणातच रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी रिफायनरी प्रकल्प गरजेचा आहे. हा प्रकल्प होण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यावर आपला भर असेल आणि त्यासाठी रिफायनरीच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढणार असल्याचे भाजपा खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.ते पुढे म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यात अनेक उद्योग येतील. एमआयडीसी होणार तसेच येथील मुलांसाठी इंजिनिअरिंगबरोबरच वेगवेगळे ट्रेड आणण्यात येणार आहेत. इथल्या मुलांना आधुनिक पद्धतीने मार्गदर्शन मिळावे, यासाठी तजवीज करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोकणात विवध प्रकारचे उद्योग सुरू व्हावेत, यासाठी आपले प्रयत्न असतील. कृषी उद्योगांना अधिक चालना आपण देऊ. उद्योगासाठी दळणवळण सुविधा गरजेच्या आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बोलावून महामार्गाचा ठेकेदार कोण आहे, ते काम किती दिवसांत करणार आहात, याची कालमर्यादा मागणार आहे. २० दिवसांनी आपण याबाबतची बैठक लावणार असल्याचे ते म्हणाले.कोळशापासून वीज बनवणाऱ्या पन्नास कंपन्यांचे मालक उद्धव ठाकरे यांना भेटले. जैतापूर प्रकल्प सुरू न करण्यासाठी ते उद्योजक मातोश्रीवर गेले होते. कारण जैतापूर सुरू झाल्यास कोळशावर चालणारे वीज प्रकल्प बंद होतील. त्यांच्याशी उद्धव ठाकरे यांची आर्थिक तडजोड झाली असल्याचा गंभीर आरोप राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.

आयएएस, आयपीएसमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांची संख्या वाढावी, यासाठी स्पर्धा परीक्षेसाठी वेगवेगळे मार्गदर्शन वर्ग सुरू करू, असेही राणे यांनी सांगितले.उद्योगांवर भरयेथील लोकांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी प्रक्रियेवर आधारित उद्योगधंदे सुरू केले पाहिजेत. स्थानिकांना त्यासाठी माध्यम उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. स्थानिक तरुणांना येथेच नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळतील तेव्हाच त्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडेल. त्यासाठी येथे वेगवेगळे प्रकारचे क्लासेस घेऊन तरुणांना प्रवृत्त करण्यात येईल, असे राणे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पNarayan Raneनारायण राणे