शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

रिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार - खासदार नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 12:42 IST

रत्नागिरी : कोकणातील तरुणांना कोकणातच रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी रिफायनरी प्रकल्प गरजेचा आहे. हा प्रकल्प होण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यावर ...

रत्नागिरी : कोकणातील तरुणांना कोकणातच रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी रिफायनरी प्रकल्प गरजेचा आहे. हा प्रकल्प होण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यावर आपला भर असेल आणि त्यासाठी रिफायनरीच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढणार असल्याचे भाजपा खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.ते पुढे म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यात अनेक उद्योग येतील. एमआयडीसी होणार तसेच येथील मुलांसाठी इंजिनिअरिंगबरोबरच वेगवेगळे ट्रेड आणण्यात येणार आहेत. इथल्या मुलांना आधुनिक पद्धतीने मार्गदर्शन मिळावे, यासाठी तजवीज करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोकणात विवध प्रकारचे उद्योग सुरू व्हावेत, यासाठी आपले प्रयत्न असतील. कृषी उद्योगांना अधिक चालना आपण देऊ. उद्योगासाठी दळणवळण सुविधा गरजेच्या आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बोलावून महामार्गाचा ठेकेदार कोण आहे, ते काम किती दिवसांत करणार आहात, याची कालमर्यादा मागणार आहे. २० दिवसांनी आपण याबाबतची बैठक लावणार असल्याचे ते म्हणाले.कोळशापासून वीज बनवणाऱ्या पन्नास कंपन्यांचे मालक उद्धव ठाकरे यांना भेटले. जैतापूर प्रकल्प सुरू न करण्यासाठी ते उद्योजक मातोश्रीवर गेले होते. कारण जैतापूर सुरू झाल्यास कोळशावर चालणारे वीज प्रकल्प बंद होतील. त्यांच्याशी उद्धव ठाकरे यांची आर्थिक तडजोड झाली असल्याचा गंभीर आरोप राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.

आयएएस, आयपीएसमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांची संख्या वाढावी, यासाठी स्पर्धा परीक्षेसाठी वेगवेगळे मार्गदर्शन वर्ग सुरू करू, असेही राणे यांनी सांगितले.उद्योगांवर भरयेथील लोकांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी प्रक्रियेवर आधारित उद्योगधंदे सुरू केले पाहिजेत. स्थानिकांना त्यासाठी माध्यम उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. स्थानिक तरुणांना येथेच नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळतील तेव्हाच त्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडेल. त्यासाठी येथे वेगवेगळे प्रकारचे क्लासेस घेऊन तरुणांना प्रवृत्त करण्यात येईल, असे राणे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पNarayan Raneनारायण राणे