शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती नेमणार, मंत्री उदय सामंत यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 13:35 IST

युतीसाठी उद्धवसेनेची धडपड

रत्नागिरी : शेतकरी कर्जमाफी करत असताना त्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल. या समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल. कुणाला कर्जमाफी द्यायची हे समितीचा अहवाल ठरवेल, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी पत्रकारांशी बाेलताना स्पष्ट केली.रत्नागिरीच्या दाैऱ्यावर आलेल्या मंत्री सामंत यांना शेतकरी कर्जमाफीबाबत पत्रकारांनी विचारले. त्यावेळी ते म्हणाले की, बाकीचे मंत्री काय बाेलले यापेक्षा मी शासनाच्या वतीने जे पत्र दिले आहे ते महत्त्वाचे आहे. शेतकरी कर्जमाफी करत असताना उच्चस्तरीय समिती नेमली जाईल. त्याचा अहवाल आल्यानंतर ताे निर्णय घेतला जाईल. ती समिती कशासाठी महत्त्वाची आहे, तर कर भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही आपण कर्जमाफी देणार आहाेत का?, छाेट्या शेतकऱ्यांना कर्जमाफी किती देणार आहाेत?, पूर्ण कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना आपण किती लाभ देणार आहाेत?, या सगळ्याचा उल्लेख त्या समितीकडे असेल. समिती शासनाकडे अहवाल देईल आणि त्यानंतर आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेणार आहाेत, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

महायुतीवर बोलण्याचा मंत्र्यांना अधिकार नाहीमाझ्यासकट कोणत्याही मंत्र्याला महायुतीवर बाेलण्याचा अधिकार नाही. पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार याच्यावर बाेलू शकतात. भरत गाेगावले यांना माहिती कुठून मिळाली हे मला माहीत नाही. याबाबत मी त्यांच्याशी चर्चा करेन आणि त्यांना ही माहिती कुठून मिळाली याचा अहवाल घेईन, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

युतीसाठी उद्धवसेनेची धडपडमनसे हा वेगळ्या विचारांचा पक्ष आहे, राज ठाकरे यांचा वेगळा विचार आहे. ते स्वाभिमानी आहेत. त्यांना सुरुवातीला ज्या काही अटी घातलेल्या आहेत त्या राज ठाकरे मान्य करतील, असे मला वाटत नाही. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी त्यांची दिशा स्पष्ट केलेली आहे. एखादा पक्ष दुसरा पक्ष आपल्यासाेबत युती करावी, यासाठी किती धडपड करताे हे उद्धवसेनेने जगाला दाखवून दिले आहे.