शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Ratnagiri News: पत्रकार अपघातप्रकरणी चालकावर खुनाचा गुन्हा, संशयाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 18:32 IST

वारिशे यांच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण

राजापूर : पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी अटकेत असलेले महिंद्रा थारचे चालक पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी या अपघातप्रकरणी आंबेरकर याच्यावर भारतीय दंड विधान कलम ३०८ व सदोष मनुष्यवधाचा कायदा कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्यात कलम ३०२ ही जोडण्यात आले आहे.राजापूर शहराजवळच्या कोदवली येथील पेट्रोलपंपाजवळ सोमवारी दुपारी हा अपघात झाला होता. त्यामध्ये पत्रकार शशिकांत वारिशे गंभीर जखमी झाले होते. कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले होते. वारिशे यांचे मेहुणे अरविंद दामोदर नागले यानी राजापूर पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार राजापूर पोलिसांनी थार गाडीचा चालक पंढरीनाथ विद्याधर आंबेरकर याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन अटक केली होती. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.दरम्यान, वारिशे यांच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण पसरले होते. त्यामुळे अपघातास कारणीभूत ठरलेल्या पंढरीनाथ आंबेरकर याच्याविरुद्धच्या कलमांमध्ये बुधवारी कलम ३०२ वाढविण्यात आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारी