शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: अर्जुना धरणावर अपघात; दोघांना गमवावा लागला जीव, चालकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 12:24 IST

वाहन धरणात कोसळले, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

राजापूर : अर्जुना धरणातील कमी झालेली पाण्याची पातळी आणि धरणाच्या पहिल्या टप्प्यावर अपघातग्रस्त गाडी अडकून पडल्याने बुधवारी मोठी जीवितहानी टळली. या अपघातात दोघांना जीव गमवावा लागला असून, आठजण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त वाहनाचा चालक राहुल गणेशवाडे (मिरज) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तोही या अपघातात जखमी झाला आहे.अर्जुना प्रकल्प क्षेत्रात बुधवारी झालेल्या अपघातानंतर जोरदार टीकेची झोड उठली आहे. यापूर्वी काहीजण त्या धरणात बुडून मृत्युमुखी पडले आहेत. धरण क्षेत्रात वाहने जातातच कशी, असा प्रश्नही केला जात आहे.अर्जुना धरण प्रकल्पाअंतर्गत लांजा तालुक्यातील आरगाव येथे सुरू असलेल्या पाइपलाइनच्या कामावरील दहा कामगार बुधवारी सायंकाळी उशिरा अर्जुना धरणावर फिरण्यासाठी गेले होते. अर्जुना धरणाकडे जाणारा मार्ग यापूर्वीच वाहनांसाठी बंद ठेवण्यात आलेला असल्याने धरण पाहण्यासाठी येणारे लोक तेथे आपली वाहने घेऊन जाऊ शकत नाहीत; मात्र तेथे जाणारा वेगळा मार्ग माहीत असल्याने ते दहा कामगार वाहन घेऊन धरण क्षेत्रावर गेले.सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांचे वाहन धरणात कोसळले. वाहनात बसलेले कामगार बाहेर फेकले गेले. धरणाची भिंत दगडाची असल्याने गंभीर मार बसून, दोघांचा मृत्यू, तर उर्वरित जखमी झाले असावेत, असे बोलले जात आहे.

अपघातग्रस्त वाहन हे धरणाच्या पहिल्या टप्प्यावरच अडकून थांबल्याने व आतील कामगार बाहेर फेकले गेल्याने वाहनासह सर्व कामगार खाली पाण्यात पडले नाहीत अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती, अशीही शक्यता व्यक्त होत आहे.ग्रामस्थ धावलेअपघातानंतर झालेला मोठा आवाज ऐकून आजूबाजूची मंडळी धरणाच्या दिशेने धावून गेली. त्यावेळी हा प्रकार समजला. सर्व जखमींसह दोन मृत कामगारांना रायपाटण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही कामगारांचे विच्छेदन झाल्यानंतर त्यांचे मृतदेह बिहारला रवाना झाले.

चौघे कोल्हापूरला

जखमींपैकी चार कामगारांची प्रकृती गंभीर असल्याने बुधवारी रात्रीच त्यांना कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात हलविण्यात आले. अन्य चौघांची स्थिती धोक्याबाहेर असल्याने रायपाटण ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार आता आठही कामगारांची प्रकृती स्थिर आहे. दहापैकी आठ कामगार हे यूपी, बिहारमधील असून ते एकमेकांचे नातेवाईक असल्याचे समजते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरणAccidentअपघात