शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: अर्जुना धरणावर अपघात; दोघांना गमवावा लागला जीव, चालकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 12:24 IST

वाहन धरणात कोसळले, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

राजापूर : अर्जुना धरणातील कमी झालेली पाण्याची पातळी आणि धरणाच्या पहिल्या टप्प्यावर अपघातग्रस्त गाडी अडकून पडल्याने बुधवारी मोठी जीवितहानी टळली. या अपघातात दोघांना जीव गमवावा लागला असून, आठजण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त वाहनाचा चालक राहुल गणेशवाडे (मिरज) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तोही या अपघातात जखमी झाला आहे.अर्जुना प्रकल्प क्षेत्रात बुधवारी झालेल्या अपघातानंतर जोरदार टीकेची झोड उठली आहे. यापूर्वी काहीजण त्या धरणात बुडून मृत्युमुखी पडले आहेत. धरण क्षेत्रात वाहने जातातच कशी, असा प्रश्नही केला जात आहे.अर्जुना धरण प्रकल्पाअंतर्गत लांजा तालुक्यातील आरगाव येथे सुरू असलेल्या पाइपलाइनच्या कामावरील दहा कामगार बुधवारी सायंकाळी उशिरा अर्जुना धरणावर फिरण्यासाठी गेले होते. अर्जुना धरणाकडे जाणारा मार्ग यापूर्वीच वाहनांसाठी बंद ठेवण्यात आलेला असल्याने धरण पाहण्यासाठी येणारे लोक तेथे आपली वाहने घेऊन जाऊ शकत नाहीत; मात्र तेथे जाणारा वेगळा मार्ग माहीत असल्याने ते दहा कामगार वाहन घेऊन धरण क्षेत्रावर गेले.सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांचे वाहन धरणात कोसळले. वाहनात बसलेले कामगार बाहेर फेकले गेले. धरणाची भिंत दगडाची असल्याने गंभीर मार बसून, दोघांचा मृत्यू, तर उर्वरित जखमी झाले असावेत, असे बोलले जात आहे.

अपघातग्रस्त वाहन हे धरणाच्या पहिल्या टप्प्यावरच अडकून थांबल्याने व आतील कामगार बाहेर फेकले गेल्याने वाहनासह सर्व कामगार खाली पाण्यात पडले नाहीत अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती, अशीही शक्यता व्यक्त होत आहे.ग्रामस्थ धावलेअपघातानंतर झालेला मोठा आवाज ऐकून आजूबाजूची मंडळी धरणाच्या दिशेने धावून गेली. त्यावेळी हा प्रकार समजला. सर्व जखमींसह दोन मृत कामगारांना रायपाटण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही कामगारांचे विच्छेदन झाल्यानंतर त्यांचे मृतदेह बिहारला रवाना झाले.

चौघे कोल्हापूरला

जखमींपैकी चार कामगारांची प्रकृती गंभीर असल्याने बुधवारी रात्रीच त्यांना कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात हलविण्यात आले. अन्य चौघांची स्थिती धोक्याबाहेर असल्याने रायपाटण ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार आता आठही कामगारांची प्रकृती स्थिर आहे. दहापैकी आठ कामगार हे यूपी, बिहारमधील असून ते एकमेकांचे नातेवाईक असल्याचे समजते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरणAccidentअपघात