शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ८० कोटींचे नुकसान; नद्यांना पूर आल्याने लांजा, राजापुरात पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 12:58 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात बुधवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. सध्या जिल्ह्याला २० जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गेल्या ...

रत्नागिरी : जिल्ह्यात बुधवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. सध्या जिल्ह्याला २० जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोर धरल्याने प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून काही ठिकाणी नद्यांना पूर आल्याने काही ठिकाणी पाणी भरण्याच्या घटना घडल्या. आतापर्यंत जिल्ह्यात अंदाजे एकूण ८२ कोटींचे नुकसान झाले असून ४७२ दुकानांचे ८० कोटींचे नुकसान झाले आहे.यंदा पावसाने जून महिन्यापासून सातत्य राखले आहे. गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून तर पावसाने मुसळधारेने पडण्यास सुरुवात केली आहे. जुलै महिन्यात तर पावसाने एकही दिवस खंड पाडलेला नाही. बुधवारी दिवसभर पावसाने संततधार धरली होती. रात्रभर पाऊस सुरू होता. गुरुवारी सकाळीही जोर कायम होता. ३ वाजण्याच्या सुमारास पावसाने तासभर विश्रांती घेतली. मध्येच काहीकाळ सूर्यदर्शनही झाले. मात्र, त्यानंतर पुन्हा पावसाच्या जोरदार सरी पडू लागल्या.मध्यंतरी पावसाचा जोर कमी झाल्याने खेडमधील जगबुडी नदीचे पाणी ओसरल्याने धोका पातळीहून इशारा पातळीच्या वर आले होते. पण बुधवारपासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने गुरुवारी या नदीबरोबरच काजळी नदीची पाणीपातळीही इशारा पातळीच्यावर पोहोचली आहे. तसेच पावसाबरोबर वादळी वारेही असल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरे, गोठे, संरक्षक भिंती आदींच्या पडझडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पावसाचा जोर अजूनही कायम आहे. त्यामुळे नद्यांचे पाणी वाढल्याने लांजा, राजापूरमध्ये पाणी भरले. सायंकाळनंतर पावसाचा जोर अधिकच वाढला.

१ जून ते १८ जुलै या कालावधीत जिल्ह्यात झालेले नुकसान

  • मृत्युची संख्या : ४
  • जखमी व्यक्ती : ७
  • घरे : ३३६
  • गोठे : ५२
  • सार्वजनिक मालमत्ता : ५८
  • खासगी मालमत्ता : ४०
  • मृत जनावरे : ११
  • दुकाने : ४७२
  • पुरामुळे स्थलांतर : ७३ कुटुंबातील ३०७ व्यक्ती
  • दरडीमुळे स्थलांतर : ४ कुटुंबातील ११ व्यक्ती
  • अंदाजे एकूण नुकसान : ८२,०५,७३,१८९ रुपये
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसfloodपूर