शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

४४ दिवसांनी श्रमिक मुक्ती दलाचे आंदोलन मागे : तिढा सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:30 AM

निवडणुकीनंतर आचारसंहिता संपताच पुनर्वसनाचे काम करण्याचे आश्वासन अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी मंगळवारी श्रमिक मुक्ती दलाच्या पदाधिकाऱ्यांना

ठळक मुद्देआचारसंहितेनंतर पुनर्वसनाचे काम करण्याचे आश्वासन

रत्नागिरी : निवडणुकीनंतर आचारसंहिता संपताच पुनर्वसनाचे काम करण्याचे आश्वासन अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी मंगळवारी श्रमिक मुक्ती दलाच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीत दिले. या आश्वासनानंतर १२ फेब्रुवारी २०१९पासून सुरू असलेले आंदोलन अखेर ४४ दिवसानंतर मागे घेण्यात आले.

जिल्ह्यातील गडनदी, कोयना प्रकल्प, चांदोली अभयारण्यासह विविध प्रकल्प बाधित प्रकल्पग्रस्तांचे गेले ४४ दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू होते. त्यातील गडनदी, कोयना प्रकल्पासह अन्य प्रकल्पासंदर्भातील जिल्हा प्रशासनाशी संबंधित सर्व मागण्या यापूर्वीच मान्य झाल्या आहेत. प्रशासकीय पातळीवर कार्यवाहीही सुरू झाली आहे. ज्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पातळीवर सोडवणे अपेक्षित होते, त्यासंदर्भातही मंत्रालयात २० मार्च २०१९ रोजी बैठक होऊन प्रकल्पग्रस्तांबाबतचे समाधानकारक निर्णयही झाले. हे निर्णय आचारसंहिता झाल्यानंतर एका मेळाव्यामध्ये श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून घोषित केले जाणार आहेत. त्यामुळे शनिवारी (२३ मार्च रोजी) हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र, या प्रकल्पग्रस्तांमध्ये जे चांदोली अभयारण्याशी संबंधित प्रकल्पग्रस्त होते त्यांची संकलन यादी अद्याप जिल्हा प्रशासनाकडून पूर्णच झालेली नाही. आंदोलनानंतर नव्याने यादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. या यादीवर सही होत नाही तोपर्यंत किंवा यादी मिळण्याची निश्चित मुदत असलेले पत्र प्रशासनाकडून मिळेत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घ्यायचे नाही, असा निर्णय घेण्यात आला.

याबाबत सोमवारी आंदोलनकर्त्यांची संबंधित अधिकाऱ्यांशी दुपारी बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार आंदोलनकर्ते बैठकीच्या प्रतीक्षेत होते. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत ही बैठकच होऊ न शकल्याने आंदोलनकर्त्यांना कोणताच निर्णय देण्यात आलेला नाही. त्यामुळे सोमवारीदेखील हे आंदोलन सुरू होते. दरम्यान, मंगळवारी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्या दालनात सकाळी बैठक घेण्यात आली. या बैठकीला दलाचे जिल्हाध्यक्ष दिलीप गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीStrikeसंप