शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

शिधापत्रिकेवरील ३७ टक्के सदस्यच आधारशी संलग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 1:15 PM

सार्वजनिक धान्य प्रणालीत पारदर्शकता यावी, बोगस शिधापत्रिकांना चाप बसावा यासाठी शासनाच्या पुरवठा विभागाने शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

ठळक मुद्देशिधापत्रिकेवरील ३७ टक्के सदस्यच आधारशी संलग्न जिल्ह्यातील ४ लाख ४१ हजार ०६८ सदस्यांचे आधारक्रमांक संलग्न

रत्नागिरी : सार्वजनिक धान्य प्रणालीत पारदर्शकता यावी, बोगस शिधापत्रिकांना चाप बसावा यासाठी शासनाच्या पुरवठा विभागाने शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील शिधापत्रिकेवरील सर्व सदस्यांचे आधारक्रमांक शिधापत्रिकेशी जोडण्यात येत आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील ११ लाख ८० हजार ३७८ लोकसंख्येपैकी ४ लाख ४१ हजार ०६८ सदस्यांचे आधारक्रमांक शिधापत्रिकेशी जोडण्यात आले आहेत. हे काम केवळ ३७ टक्के इतकेच झाले आहे.सार्वजनिक धान्य प्रणालीत पारदर्शकता यावी, बोगस शिधापत्रिकांना चाप बसावा, तसेच पात्र व्यक्तींनाच याचा लाभ व्हावा या उद्देशाने शासनाच्या पुरवठा विभागाकडून २०१२पासून शिधापत्रिकांचे संगणकीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेमुळे बनावट शिधापत्रिकांना चांगलाचा चाप बसला आहे. या मोहिमेनंतर शिधापत्रिकेवरील धान्य योग्य व्यक्तींनाच मिळावे, या हेतूने शासनाने शिधापत्रिकेवरील सदस्यांचे आधारक्रमांक शिधापत्रिकांशी जोडण्याची मोहीम सुरू केली आहे. सध्या अंत्योदय आणि प्राधान्य गटालाच सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीचा लाभ मिळत आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारकाला शिधापत्रिकेवर नमूद केल्याप्रमाणे धान्य वितरण केले जाते. तर राष्ट्रीय धान्य सुरक्षा योजनेत समावेश असलेल्या प्राधान्य गटाला शिधापत्रिकेवरील सदस्य संख्येनुसार प्रतिसदस्य धान्य देण्याचा निर्णय फेब्रुवारी २०१४पासून घेण्यात आला आहे.प्राधान्य गटातील शिधापत्रिकेवरील एका तरी सदस्याचे आधारकार्ड संलग्न करण्याची सवलत सुरूवातीच्या काळात देण्यात आली होती. हे काम सुमारे ९० टक्के इतके पूर्णही झाले होते. पण त्यानंतर प्रत्येक सदस्यांचे आधार संलग्न करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ७९ हजार २०३ शिधापत्रिकेवरील ४ लाख ४१ हजार ०६८ सदस्य आधार संलग्न करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत आधारशी संलग्न झालेल्या सदस्यांची संख्या कमी आहे. शिधापत्रिकेवरील सर्व सदस्य आधारशी संलग्न न झाल्यास त्या शिधापत्रिकेवरील धान्य वितरण थांबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.चौकटआधार मशीनची संख्या कमीआधारक्रमांक शिधापत्रिकेशी जोडण्याचे कामी हाती घेण्यात आले असले तरी १२ वर्षाखालील मुल आणि ६० वर्षावरील ज्येष्ठांचे ठसे घेण्यात अडचणी येत आहेत. त्यातच जिल्ह्यात मोजक्याच ठिकाणी आधार मशीन सुरू असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डRatnagiriरत्नागिरी