शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

रत्नागिरी जिल्ह्यात ३४ हजार शेतकऱ्यांचा फळपीक विमा योजनेत सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 11:47 IST

विम्यामुळे नुकसानाची तीव्रता कमी, गतवर्षीपेक्षा दोन हजार शेतकरी वाढले

रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे गेली काही वर्षे आंबा, काजू शेतकऱ्यांच्या पदरी नुकसानच येत आहे. महागडी कीटकनाशके आणि खते वापरूनही हवामानातील बदलामुळे उत्पादनात घट होत आहे. अशावेळी फळपीक विमा योजनेमुळे नुकसानाची तीव्रता कमी होण्यास मदत होत असल्याने शेतकऱ्यांचा फळपीक विमा योजनेतील सहभाग वाढत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा दोन हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे.फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर अंतिम तारीख होती. जिल्ह्यातील एकूण ३० हजार २५१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. शेवटच्या तारखेला सर्व्हर डाऊन असल्याने अनेक शेतकरी वंचित राहिल्याने नोंदणीसाठी दि. ४ व ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे शेतकरी सहभाग वाढला असून, आता सहभागी शेतकऱ्यांची संख्या एकूण ३४ हजार ६०५ इतकी झाली आहे.

बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा, काजू पिकावर होत आहे. अशावेळी शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य मिळावे यासाठी फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील आंबा, काजू पिकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे.

  • आंबा पिकाचे शेतकरी - २८२६२
  • काजू पिकाचे शेतकरी - ६३४३
  • एकूण शेतकरी - ३४६०५
  • कर्जदार शेतकरी - २८४९९
  • बिगर कर्जदार - ६१०६ 
  • आंबा पिकाचे क्षेत्र - १५६४६.८८ (हेक्टर)
  • काजू पिकाचे क्षेत्र - ३९४५.८ (हेक्टर)
  • एकूण क्षेत्र - १९५९२.६८ (हेक्टर)

 

  • शेतकरी विमा हप्ता - २२७४४३१९३.१
  • विमा संरक्षित रक्कम - २५८०७३९०४०

फळपीक विमा योजनेत सहभागी शेतकरीतालुका - शेतकरी - क्षेत्रमंडणगड -३८९७ - १९०३.४१दापोली - २८२४ - १३७२.२८खेड - ३१४५ - १५५९.७चिपळूण - ३१८९ - १८७०.९गुहागर - १६९५ - ८९४.६५संगमेश्वर - ६६४३ - ३२८०.५५रत्नागिरी - ३४६४ - २५७६.०७लांजा - ३८५४ - ३०४४.७५राजापूर - ५८९४ - ३०९०.३७एकूण - ३४६०५ - १९५९२.६८

फळपीक विमा योजनेचे सर्व्हर डाऊन असल्याने इच्छुक असूनही अनेक शेतकरी सहभागापासून वंचित राहिले होते. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शासनाकडे सहभागासाठी मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती. मुदतवाढीचा शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला असून सहभागी शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. - सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी