शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात ३४ हजार शेतकऱ्यांचा फळपीक विमा योजनेत सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 11:47 IST

विम्यामुळे नुकसानाची तीव्रता कमी, गतवर्षीपेक्षा दोन हजार शेतकरी वाढले

रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे गेली काही वर्षे आंबा, काजू शेतकऱ्यांच्या पदरी नुकसानच येत आहे. महागडी कीटकनाशके आणि खते वापरूनही हवामानातील बदलामुळे उत्पादनात घट होत आहे. अशावेळी फळपीक विमा योजनेमुळे नुकसानाची तीव्रता कमी होण्यास मदत होत असल्याने शेतकऱ्यांचा फळपीक विमा योजनेतील सहभाग वाढत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा दोन हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे.फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर अंतिम तारीख होती. जिल्ह्यातील एकूण ३० हजार २५१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. शेवटच्या तारखेला सर्व्हर डाऊन असल्याने अनेक शेतकरी वंचित राहिल्याने नोंदणीसाठी दि. ४ व ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे शेतकरी सहभाग वाढला असून, आता सहभागी शेतकऱ्यांची संख्या एकूण ३४ हजार ६०५ इतकी झाली आहे.

बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा, काजू पिकावर होत आहे. अशावेळी शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य मिळावे यासाठी फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील आंबा, काजू पिकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे.

  • आंबा पिकाचे शेतकरी - २८२६२
  • काजू पिकाचे शेतकरी - ६३४३
  • एकूण शेतकरी - ३४६०५
  • कर्जदार शेतकरी - २८४९९
  • बिगर कर्जदार - ६१०६ 
  • आंबा पिकाचे क्षेत्र - १५६४६.८८ (हेक्टर)
  • काजू पिकाचे क्षेत्र - ३९४५.८ (हेक्टर)
  • एकूण क्षेत्र - १९५९२.६८ (हेक्टर)

 

  • शेतकरी विमा हप्ता - २२७४४३१९३.१
  • विमा संरक्षित रक्कम - २५८०७३९०४०

फळपीक विमा योजनेत सहभागी शेतकरीतालुका - शेतकरी - क्षेत्रमंडणगड -३८९७ - १९०३.४१दापोली - २८२४ - १३७२.२८खेड - ३१४५ - १५५९.७चिपळूण - ३१८९ - १८७०.९गुहागर - १६९५ - ८९४.६५संगमेश्वर - ६६४३ - ३२८०.५५रत्नागिरी - ३४६४ - २५७६.०७लांजा - ३८५४ - ३०४४.७५राजापूर - ५८९४ - ३०९०.३७एकूण - ३४६०५ - १९५९२.६८

फळपीक विमा योजनेचे सर्व्हर डाऊन असल्याने इच्छुक असूनही अनेक शेतकरी सहभागापासून वंचित राहिले होते. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शासनाकडे सहभागासाठी मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती. मुदतवाढीचा शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला असून सहभागी शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. - सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी