शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बदल्यांमध्ये ३० कोटींचा भ्रष्टाचार, आमदार भास्कर जाधव यांचा खळबळजनक आरोप

By मनोज मुळ्ये | Updated: July 29, 2023 19:16 IST

शिक्षकांनी मंत्रालयातून अध्यादेश बदलून आणला

रत्नागिरी : शिक्षकांनी बदल्यांसाठी मंत्रालयातून शासकीय अध्यादेश काढून आणला. त्यातील एका वाक्याचा आधार घेत बदल्या थांबवण्यात आल्या होत्या. मात्र शिक्षकांनी मंत्रालयातून हा अध्यादेश बदलून आणला. या बदल्यांमध्ये ३० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे शिवसेनेचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. त्याचवेळी त्यांनी शिक्षक बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप केला. ज्यावेळी आपला मुलगा विक्रांत जाधव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, तेव्हा शिक्षकांनी मंत्रालयातून एक शासकीय अध्यादेश आणला. बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करावे, असा हा आदेश होता. मात्र त्यात शेवटी एक वाक्य होते की पर्यायी व्यवस्था झाल्याखेरीज या शिक्षकांना सोडू नये. त्यामुळे त्यावेळी बदली झालेल्या शिक्षकांना सोडण्यात आले नाही.त्यानंतर या शिक्षकांनी मंत्रालयात जाऊन शासकीय अध्यादेश बदलून आणला. त्यात हे वाक्य नव्हते. त्यामुळे या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले. त्यात ३० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे, अशी चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे, असे ते म्हणाले.

महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून आपल्याला काहीही निधी मिळालेला नाही. आता ती अपेक्षाही नाही. मात्र उद्धव ठाकरे सरकारने मंजूर केलेल्या कामांना या सरकारने स्थगिती दिली आहे. ज्या कामांना प्रशासकीय, वित्तीय मंजुरी आहे, अशी कामे थांबवता येत नाहीत. मात्र हे सरकार कायदा, नियम पायदळीच तुडवत आहे, असा आरोपही त्यांनी केला.सामंत यांचे नाव न घेता टीकाजिल्ह्यातील प्रशासनावर वचक राहिलेला नाही. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला काही महत्त्वाच्या खात्यांचे अधिकारी उपस्थित नव्हते. याआधी अधिकारी सभेला गैरहजर राहायला घाबरायचे. मात्र आता कोणाला फरक पडत नाही, अशी स्थिती असल्याची टीका आमदार जाधव यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे नाव न घेता केली.सामंत यांचे कौतुकही

महिला बचत गटांच्या बैठकीसाठी वर्षातून एकदा निधी देणे, त्यांना उत्पादनासाठी जागा देणे, त्यांच्या तयारी मालाच्या विक्रीसाठी जागा देणे, त्यांना मोबाईल देणे या आपण गतबैठकीत केलेल्या मागण्यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यानुसार तरतूदही झाली. त्यामुळे आपण सामंत यांचे कौतुक केले असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBhaskar Jadhavभास्कर जाधवTeacherशिक्षकTransferबदलीCorruptionभ्रष्टाचार