परतीसाठी १५८ गाड्या मुंबईकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 05:12 AM2018-09-18T05:12:58+5:302018-09-18T05:13:25+5:30

सर्वाधिक गाड्या मंगळवारी; ग्रुप बुकिंग केलेल्यांसाठी ६६६ गाड्या सोडण्यात येणार

158 trains to Mumbai return to Mumbai | परतीसाठी १५८ गाड्या मुंबईकडे रवाना

परतीसाठी १५८ गाड्या मुंबईकडे रवाना

Next

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी बहुसंख्येने आलेले भाविक आता गणेशविसर्जनानंतर परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. सोमवारी रत्नागिरी विभागातून १५८ गाड्या सोमवारी मुंबईकडे रवाना झाल्या. दि.२४ सप्टेंबर पर्यत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून मंगळवारी सर्वाधिक ६६६ गाड्या परतीसाठी सोडण्यात येणार आहेत.
गौरी गणपतीसाठी मुंबई व उपविभागातून २२२५ गाड्यांमधून भाविक रत्नागिरी जिल्ह्यात आले. आता मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभाग सज्ज झाला असून सोमवारपासूनच जादा गाड्या सुरू झाल्या आहेत. एकूण १३६६ जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले असून ग्रुप बु कींगच्या २४४ गाड्यांचा त्यामध्ये समावेश आहे.मुंबई व उपनगरातील आगारातून जादा एसटी बसेस जिल्ह्यात आल्या होत्या.
रत्नागिरी विभागातून देखील मुंबई, उपनगरांसाठी परतीकरिता जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. सोमवारी मुंबईसाठी ३८, बोरीवली ५०, कल्याण ८, ठाणे २२, भांडुप ७, विठ्ठलवाडी ३, नालासोपारा १०, विरार ३, पुणे १६, मिळून १५७ आरक्षित व एक गु्रप बुकींग अशा एकूण १५८ जादा गाड्या रवाना झाल्या. मंगळवारी कामावर जाण्यासाठी अनेक मंडळींनी आधीच आरक्षण करून ठेवल्याने गौरी गणपतींचे विसर्जन करून लगेचच मुंबईकडे निघाले आहेत.परतीच्या प्रवासासाठी दि. २४ पर्यत नियोजन केले असले तरी सर्वाधिक गाड्या मंगळवार दि. १८ रोजी रवाना होणार आहेत. मुंबईसाठी ११५, परेल ९, बोरीवली १८९, कल्याण २२, ठाणे ६२, भांडुप १७, विठ्ठलवाडी २२, नालासोपारा ४१, भार्इंदर १, विरार ११, पुणे ३२ व इतर २ मिळून ५२३ गाड्यांचे आरक्षण प्रवाशांनी केले आहे.
ग्रुप बुकींगसाठी १४३ गाड्यांचे आरक्षण केल्यामुळे एकूण ६६६ गाड्या सोडण्यात येणार आहेत.बुधवार दि. १९ रोजी मुंबईसाठी ७५, परेल ३, बोरीवली १२०, कल्याण १०, ठाणे ४०, भांडुप १२, विठ्ठलवाडी १३, नालासोपारा २९, विरार ९, पुणे १८ एकूण ३२९ जादा गाड्यांचे आरक्षण व ग्रुप बुकींगच्या ९८ गाड्यांचे आरक्षण केले असून एकूण ४२७ गाड्या सोडण्यात येणार आहेत.

सुरुवातीच्या तीन दिवसांत एसटीला चांगला प्रतिसाद आहे. त्यानंतर, दि.२० रोजी ९५, दि.२१ रोजी ११, दि.२२ रोजी ५, दि.२३ रोजी ४ जादा गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. आरक्षण सुरू असून, प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Web Title: 158 trains to Mumbai return to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.