शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

रत्नागिरीकरांना दिलासा, तूर्तास पाणी कपात नाही

By मेहरून नाकाडे | Updated: April 16, 2024 13:59 IST

रत्नागिरी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणामध्ये १.१७६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. धरणात उपलब्ध असणारा पाणीसाठा दि.१५ जूनपर्यंत पुरेल, ...

रत्नागिरी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणामध्ये १.१७६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. धरणात उपलब्ध असणारा पाणीसाठा दि.१५ जूनपर्यंत पुरेल, असा विश्वास रत्नागिरी नगर परिषदेने व्यक्त केला आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे एक दिवस पाण्याचे संकट तूर्तास तरी निवारले आहे.रत्नागिरी शहरात ११ हजार २८८ नळजोडण्या आहेत. त्यांना दिवसाला २० दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा केला जातो. गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने यावर्षी तीन महिने आधीपासून पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात करून शहराला पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. त्यानुसार दर सोमवारी व गुरुवारी पाणी कपात केली जात आहे. गतवर्षी रत्नागिरी नगर परिषदेतर्फे दि. १५ एप्रिल (२०२३) पासून एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला होता. एकीकडे कडक उन्हामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. असे असले तरी रत्नागिरी नगर परिषदेतर्फे उपलब्ध पाणीसाठा दि.१५ जून पर्यत पुरेल असा दावा रत्नागिरी नगर परिषदेने केला आहे. त्यामुळे एक दिवसा आड पाणी कपातीचे संकट लांबले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरणWaterपाणी