शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

रत्नागिरी जिल्ह्यातील १०५ ग्रामपंचायतीच्या इमारती धोकादायक, दुर्लक्षाने कोसळण्याच्या स्थितीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 11:38 IST

माेडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीबाबत अनास्था

रहिम दलालरत्नागिरी : गावाच्या विकासाचा गाढा हाकणाऱ्या जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचा कारभार आजही जुन्या इमारतीतून हाकला जात आहे. धाेकादायक बनलेल्या या इमारतींच्या छायेखाली धाेक्याची टांगती तलवार घेऊन कामकाज केले जात आहे. जिल्ह्यातील १०४ ग्रामपंचायतींच्या इमारती धाेकादायक बनल्या आहेत. माेडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीबाबत अनास्था पाहायला मिळते.जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती आहेत. ग्रामीण भागाचा विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या या ग्रामपंचायतींच्या धोकादायक बनलेल्या इमारतींकडे शासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नाही. या ग्रामपंचपायतींच्या माध्यमातून गावे, वाड्यांमध्ये विविध योजना राबवण्यात येत आहेत. त्यामध्ये पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना, ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष दुरुस्ती, यशवंत ग्रामसमृद्धी योजना, ग्रामसचिवालय योजना, घरकुल योजना व अन्य योजनांचा समावेश आहे.ग्रामपंचायतींच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजनांमुळे विविध विकासकामे करीत असतानाच ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आराखडा ग्रामपंचायतींमध्ये तयार करून शासनाकडून कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात येत आहेत. त्यातून स्थानिक मजुरांना रोजगारही उपलब्ध झालेला आहे.ग्रामीण भागात विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्ह्यातील १०४ ग्रामपंचायतींच्या इमारती अनेक वर्षांपूर्वीच्या आहेत. या इमारती वापरणे अतिधोकादायक असल्याचा निष्कर्ष संबंधित विभागाकडून काढण्यात आला आहे. धोकादायक असलेल्या काही ग्रामपंचायतींच्या इमारतींचे छत काेसळले आहे. तर, काहींचे छप्पर दुरुस्ती करणे, स्लॅबना गळती, भिंतींना तडे गेले आहेत. लादी बसविणे, खिडक्या, दरवाजे दुरुस्ती अशी स्थिती ग्रामपंचायतींच्या इमारतींची झाली आहे.बहुतांश ग्रामपंचायतींच्या छपरांची अवस्था फार बिकट झाली आहे. त्यामुळे पावसाळा तर कसाबसा तग धरून काढावा लागतो. मोडकळीस आलेल्या ग्रामपंचायतींच्या कार्यालयामध्ये पावसाळ्यात कागदपत्रे भिजल्याने जुनी आणि महत्त्वाची कागदपत्रे खराब होत आहेत. त्यासाठी नवीन इमारतींची मागणीही ग्रामपंचायतींकडून करण्यात आलेली आहे.मात्र, गावच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असतानाच नवीन इमारतींच्या बांधकामासाठी शासनाने निधी नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, ग्रामपंचायतींच्या इमारतींची दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

धोकादायक इमारतीतालुका - इमारतीमंडणगड        ६दापोली          ३१खेड              १०चिपळूण          ५गुहागर          १७संगमेश्वर       ९लांजा            ११राजापूर         १५

पालकमंत्र्यांच्या तालुक्यात सगळ्याच सुस्थितीतजिल्ह्यातील १०४ ग्रामपंचायतींच्या इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. विशेष बाब म्हणजे राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीची इमारत धोकादायक नाही. सर्वच ग्रामपंचायतींच्या इमारती सुस्थितीत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीgram panchayatग्राम पंचायत