शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील १०५ ग्रामपंचायतीच्या इमारती धोकादायक, दुर्लक्षाने कोसळण्याच्या स्थितीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 11:38 IST

माेडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीबाबत अनास्था

रहिम दलालरत्नागिरी : गावाच्या विकासाचा गाढा हाकणाऱ्या जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचा कारभार आजही जुन्या इमारतीतून हाकला जात आहे. धाेकादायक बनलेल्या या इमारतींच्या छायेखाली धाेक्याची टांगती तलवार घेऊन कामकाज केले जात आहे. जिल्ह्यातील १०४ ग्रामपंचायतींच्या इमारती धाेकादायक बनल्या आहेत. माेडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीबाबत अनास्था पाहायला मिळते.जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती आहेत. ग्रामीण भागाचा विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या या ग्रामपंचायतींच्या धोकादायक बनलेल्या इमारतींकडे शासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नाही. या ग्रामपंचपायतींच्या माध्यमातून गावे, वाड्यांमध्ये विविध योजना राबवण्यात येत आहेत. त्यामध्ये पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना, ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष दुरुस्ती, यशवंत ग्रामसमृद्धी योजना, ग्रामसचिवालय योजना, घरकुल योजना व अन्य योजनांचा समावेश आहे.ग्रामपंचायतींच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजनांमुळे विविध विकासकामे करीत असतानाच ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आराखडा ग्रामपंचायतींमध्ये तयार करून शासनाकडून कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात येत आहेत. त्यातून स्थानिक मजुरांना रोजगारही उपलब्ध झालेला आहे.ग्रामीण भागात विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्ह्यातील १०४ ग्रामपंचायतींच्या इमारती अनेक वर्षांपूर्वीच्या आहेत. या इमारती वापरणे अतिधोकादायक असल्याचा निष्कर्ष संबंधित विभागाकडून काढण्यात आला आहे. धोकादायक असलेल्या काही ग्रामपंचायतींच्या इमारतींचे छत काेसळले आहे. तर, काहींचे छप्पर दुरुस्ती करणे, स्लॅबना गळती, भिंतींना तडे गेले आहेत. लादी बसविणे, खिडक्या, दरवाजे दुरुस्ती अशी स्थिती ग्रामपंचायतींच्या इमारतींची झाली आहे.बहुतांश ग्रामपंचायतींच्या छपरांची अवस्था फार बिकट झाली आहे. त्यामुळे पावसाळा तर कसाबसा तग धरून काढावा लागतो. मोडकळीस आलेल्या ग्रामपंचायतींच्या कार्यालयामध्ये पावसाळ्यात कागदपत्रे भिजल्याने जुनी आणि महत्त्वाची कागदपत्रे खराब होत आहेत. त्यासाठी नवीन इमारतींची मागणीही ग्रामपंचायतींकडून करण्यात आलेली आहे.मात्र, गावच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असतानाच नवीन इमारतींच्या बांधकामासाठी शासनाने निधी नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, ग्रामपंचायतींच्या इमारतींची दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

धोकादायक इमारतीतालुका - इमारतीमंडणगड        ६दापोली          ३१खेड              १०चिपळूण          ५गुहागर          १७संगमेश्वर       ९लांजा            ११राजापूर         १५

पालकमंत्र्यांच्या तालुक्यात सगळ्याच सुस्थितीतजिल्ह्यातील १०४ ग्रामपंचायतींच्या इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. विशेष बाब म्हणजे राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीची इमारत धोकादायक नाही. सर्वच ग्रामपंचायतींच्या इमारती सुस्थितीत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीgram panchayatग्राम पंचायत