शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
2
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
3
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
4
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
5
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
6
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
7
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
8
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
9
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
10
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
11
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
12
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
13
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
14
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
15
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
16
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
17
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
18
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
19
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
20
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस

मुंबई-गोवा महामार्गाने घेतले १०३ बळी, २०१७ वर्ष : ‘हायवे’चा ‘डायवे’ कायम, मात्र अपघातांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 18:12 IST

सतत वर्दळ असलेला परंतु काही ठिकाणी राज्य मार्गाएवढाही रुंद नसलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे सत्र काही अद्यापही सुटलेले नाही. मात्र दिलासादायक बाब म्हणजे अपघातांचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. सध्या महामार्ग चौपदरीकरणाच्या गप्पा रंगलेल्या असताना मावळलेल्या २०१७मध्येही महामार्गावरील खड्ड्यांनी आणि अरुंदपणाने १०३ प्रवाशांचे बळी घेतले. ​​​​​​​

ठळक मुद्देमुंबई-गोवा महामार्ग बनला सततच्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा पनवेल ते कसाल या ४५० किमीच्या महामार्गावर ८७८ अपघातांची नोंद अपघातामध्ये १२८३ प्रवासी जखमी झाले, तर १०३ प्रवाशांचा बळी गेल्या वर्षभरात १ लाख १ हजार ५०४ वाहनचालकांवर कारवाई २ कोटी ३ लाख ४७ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल

विहार तेंडुलकर रत्नागिरी : सतत वर्दळ असलेला परंतु काही ठिकाणी राज्य मार्गाएवढाही रुंद नसलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे सत्र काही अद्यापही सुटलेले नाही. मात्र दिलासादायक बाब म्हणजे अपघातांचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. सध्या महामार्ग चौपदरीकरणाच्या गप्पा रंगलेल्या असताना मावळलेल्या २०१७मध्येही महामार्गावरील खड्ड्यांनी आणि अरुंदपणाने १०३ प्रवाशांचे बळी घेतले.मुंबई-गोवा महामार्ग हा अरुंद, वाहनांची वाढती वर्दळ, खड्डे अशा अनेक कारणांनी चर्चेत आहे. या चर्चेत राहणाºया कारणांमुळेच महामार्गावर अपघात वाढत आहेत. मुंबई-गोवा महामार्ग हा सततच्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. २०१७या वर्षात पनवेल ते कसाल या ४५० किमीच्या महामार्गावर ८७८ अपघातांची नोंद झाली आहे. या अपघातामध्ये १२८३ प्रवासी जखमी झाले, तर १०३ प्रवाशांचा बळी गेला.

मागील काही वर्षांच्या तुलनेत ही आकडेवारी कमी असली तरी अपघातांचे प्रमाण अजूनही म्हणावे तेवढे कमी झालेले नाही, हेच या आकडेवारीवरून दिसून येत आहे. सर्वसाधारणपणे प्रतिवर्षी या महामार्गावर सरासरी एक हजार व्यक्तींचा अपघाती मृत्यू होतो, ते प्रमाण आता काहीसे कमी आले आहे.मात्र महामार्गावर मद्यपान करून गाडी चालवणे, कायद्याचे उल्लंघन होईल, अशा पध्दतीने वाहन हाकणे अशा विविध कारणांमुळे महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अशा वाहनांची महामार्गावर कसून तपासणी करण्यात येते. मात्र तरीही हे प्रमाण कमी झालेले नाही. गेल्या वर्षभरात १ लाख १ हजार ५०४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यातून २ कोटी ३ लाख ४७ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.सध्या पर्यटन हंगाम असल्याने त्यातच गेल्या दहा दिवसात जोडून आलेल्या सुट्ट्या आणि नववर्ष स्वागत यामुळे महामार्गावर वाहनांची रेलचेल होती. मात्र तरीही वर्षभरात या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यात संबंधित यंत्रणेला यश आले आहे. गेल्या वर्षभरात हे प्रमाण कमी आल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.वर्ष          अपघातांची संख्या         मृत२०१३                 ११८६                २०१२०१४                 १०८४                २०५२०१५                 १०८८                १७४२०१६                १०५७                 १६३२०१७                  ८७८                १०३ 

सध्या या महामार्गाचे चौपदरीकरण सुरु आहे तर दुसरीकडे अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. वळणदार रस्ते, वाढती अवजड वाहतूक, मद्यपान करून वाहन चालवणे, दुपदरी असलेल्या महामार्गावर रस्ता दुभाजकही नसणे अशा विविध कारणांमुळे हे अपघात होत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातhighwayमहामार्ग