शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

मुंबई-गोवा महामार्गाने घेतले १०३ बळी, २०१७ वर्ष : ‘हायवे’चा ‘डायवे’ कायम, मात्र अपघातांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 18:12 IST

सतत वर्दळ असलेला परंतु काही ठिकाणी राज्य मार्गाएवढाही रुंद नसलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे सत्र काही अद्यापही सुटलेले नाही. मात्र दिलासादायक बाब म्हणजे अपघातांचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. सध्या महामार्ग चौपदरीकरणाच्या गप्पा रंगलेल्या असताना मावळलेल्या २०१७मध्येही महामार्गावरील खड्ड्यांनी आणि अरुंदपणाने १०३ प्रवाशांचे बळी घेतले. ​​​​​​​

ठळक मुद्देमुंबई-गोवा महामार्ग बनला सततच्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा पनवेल ते कसाल या ४५० किमीच्या महामार्गावर ८७८ अपघातांची नोंद अपघातामध्ये १२८३ प्रवासी जखमी झाले, तर १०३ प्रवाशांचा बळी गेल्या वर्षभरात १ लाख १ हजार ५०४ वाहनचालकांवर कारवाई २ कोटी ३ लाख ४७ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल

विहार तेंडुलकर रत्नागिरी : सतत वर्दळ असलेला परंतु काही ठिकाणी राज्य मार्गाएवढाही रुंद नसलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे सत्र काही अद्यापही सुटलेले नाही. मात्र दिलासादायक बाब म्हणजे अपघातांचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. सध्या महामार्ग चौपदरीकरणाच्या गप्पा रंगलेल्या असताना मावळलेल्या २०१७मध्येही महामार्गावरील खड्ड्यांनी आणि अरुंदपणाने १०३ प्रवाशांचे बळी घेतले.मुंबई-गोवा महामार्ग हा अरुंद, वाहनांची वाढती वर्दळ, खड्डे अशा अनेक कारणांनी चर्चेत आहे. या चर्चेत राहणाºया कारणांमुळेच महामार्गावर अपघात वाढत आहेत. मुंबई-गोवा महामार्ग हा सततच्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. २०१७या वर्षात पनवेल ते कसाल या ४५० किमीच्या महामार्गावर ८७८ अपघातांची नोंद झाली आहे. या अपघातामध्ये १२८३ प्रवासी जखमी झाले, तर १०३ प्रवाशांचा बळी गेला.

मागील काही वर्षांच्या तुलनेत ही आकडेवारी कमी असली तरी अपघातांचे प्रमाण अजूनही म्हणावे तेवढे कमी झालेले नाही, हेच या आकडेवारीवरून दिसून येत आहे. सर्वसाधारणपणे प्रतिवर्षी या महामार्गावर सरासरी एक हजार व्यक्तींचा अपघाती मृत्यू होतो, ते प्रमाण आता काहीसे कमी आले आहे.मात्र महामार्गावर मद्यपान करून गाडी चालवणे, कायद्याचे उल्लंघन होईल, अशा पध्दतीने वाहन हाकणे अशा विविध कारणांमुळे महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अशा वाहनांची महामार्गावर कसून तपासणी करण्यात येते. मात्र तरीही हे प्रमाण कमी झालेले नाही. गेल्या वर्षभरात १ लाख १ हजार ५०४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यातून २ कोटी ३ लाख ४७ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.सध्या पर्यटन हंगाम असल्याने त्यातच गेल्या दहा दिवसात जोडून आलेल्या सुट्ट्या आणि नववर्ष स्वागत यामुळे महामार्गावर वाहनांची रेलचेल होती. मात्र तरीही वर्षभरात या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यात संबंधित यंत्रणेला यश आले आहे. गेल्या वर्षभरात हे प्रमाण कमी आल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.वर्ष          अपघातांची संख्या         मृत२०१३                 ११८६                २०१२०१४                 १०८४                २०५२०१५                 १०८८                १७४२०१६                १०५७                 १६३२०१७                  ८७८                १०३ 

सध्या या महामार्गाचे चौपदरीकरण सुरु आहे तर दुसरीकडे अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. वळणदार रस्ते, वाढती अवजड वाहतूक, मद्यपान करून वाहन चालवणे, दुपदरी असलेल्या महामार्गावर रस्ता दुभाजकही नसणे अशा विविध कारणांमुळे हे अपघात होत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातhighwayमहामार्ग