शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गंगा कालव्यातील पाण्याचा वाटा बनला कळीचा मुद्दा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 08:11 IST

पंजाबमधून येणारे पाणी पाकमध्ये वळविल्याचा आक्षेप; उमेदवारही देताहेत पाणी देण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कजयपूर : राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी चर्चेत असलेल्या प्रमुख मुद्द्यांपैकी श्री गंगा कालव्याचा विषय आघाडीवर आहे. या कालव्याच्या माध्यमातून पाण्याचे होणारे असमान वितरण हे शेतकरी मतदारांमध्ये प्रमुख मुद्दा आहे. येथील राज्यकर्त्यांनी पंजाबमधून येणारे पाणी पाकिस्तानकडे वळवल्याचा आरोप केला आहे.  

राजस्थानच्या ग्रामीण किसान मजदूर समितीचे प्रमुख रणजित सिंह राजू म्हणाले की, महाराजा गंगा सिंह यांनी कालव्याची निर्मिती केली, तेव्हा पंजाब आणि राजस्थानमध्ये पाण्याचे समान वितरणाकडे लक्ष दिले. कालांतराने राज्यात सत्तांतरे होत गेली, तशी कालव्याच्या पुनर्निर्मितीमध्ये भ्रष्टाचार झाला आणि आता पाण्याचे वितरण असमान होत आहे. त्यामुळे परिसरातील हजारो शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आगामी सरकारने पाण्यासाठी काम करावे, असे मतदारांनी म्हटले.

पाण्यासाठी आंदोलन; ३ दिवस रास्ता रोको

nअनेकदा कालवा बंद केला जातो. राजस्थान सरकारने या संदर्भात लक्ष घालून पाण्याच्या समान वितरणासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. 

nसप्टेंबर महिन्यात १० हजार शेतकरी पाण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. तीन दिवस रास्ता रोको करत तसेच ‘गंगनहर’ शहराचे सर्व प्रवेशद्वार बंद ठेवले होते.

२,५०० क्युसेकपाणी दररोज गंगा कालव्यातून   मिळावे, अशी मागणी जिल्ह्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली.

सर्व पक्षांकडून आश्वासनशेतकऱ्यांसह स्थानिक मतदारांच्या मागणीचा विचार करता, यंदाच्या निवडणुकीत गंगा कालव्यातील पाण्याच्या समान वितरणासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन ‘गंगनहर’ मतदारसंघातील कॉंग्रेस, भाजप तसेच अपक्ष उमेदवारांनी दिले.

टॅग्स :Rajasthanराजस्थानElectionनिवडणूक