शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

“पुलवामाचा तपास केला असता तर राजनाथ सिंह यांना राजीनामा द्यावा लागला असता”: सत्यपाल मलिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 17:01 IST

Satyapal Malik: सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा पुलवामा हल्ल्याबाबत भाष्य करताना केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.

Satyapal Malik: काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात मोठे गौप्यस्फोट केले. तसेच यासाठी केंद्रातील मोदी सरकारला जबाबदार धरले. मात्र, आता पुन्हा एकदा सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात भाष्य केले आहे. पुलवामा हल्ल्याचा तपास केला असता तर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना राजीनामा द्यावा लागला असता, असा दावा सत्यपाल मलिक यांनी केला आहे. 

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलताना सत्यपाल मलिक म्हणाले की, २०१९ ची लोकसभा निवडणूक आमच्या सैनिकांच्या मृतदेहांवर लढली गेली. कोणतीही चौकशी झाली नाही. चौकशी झाली असती तर तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांना राजीनामा द्यावा लागला असता. अनेक अधिकारी तुरुंगात गेले असते आणि मोठा वाद निर्माण झाला असता. संबंधितांचा तपास करण्यात आला नाही, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. 

तीन वर्षांत तुमची संपत्ती एवढी वाढली असेल तर मला सांगा

उद्योगपती आणि अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्यासंदर्भात बोलताना सत्यपाल मलिक यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. त्याच्यासोबतचे लोक म्हणजे अदानी, ज्यांनी तीन वर्षात इतकी संपत्ती जमा केली की ते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. तीन वर्षांत तुमच्यापैकी कुणाची संपत्ती एवढी वाढली असेल तर मला सांगा, असा खोचक सवाल सत्यपाल मलिक यांनी केला. संसदेत राहुल गांधींनी अदानीकडे २० हजार कोटी रुपये कुठून आले, असा सवाल केला होता. परंतु, पंतप्रधानांना त्याचे उत्तर देता आले नाही, अशी टीका सत्यपाल मलिक यांनी केली. 

दरम्यान, गोव्याचा राज्यपाल असताना मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची तक्रार पंतप्रधानांकडे केली होती. त्याचा परिणाम असा झाला की, मलाच हटवण्यात आले. त्यांना हटवले नाही. म्हणूनच मला खात्री आहे की, ते भ्रष्टाचार करतात. त्यात त्यांचा वाटा आहे. त्याची संपूर्ण रक्कम अदानीकडे जाते, असा मोठा आरोप सत्यपाल मलिकांनी केला. तसेच या सरकारला जनताच हटवू शकते, माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही ही वेळ चुकवली तर यानंतर पुन्हा संधी मिळणार नाही, असे आवाहन सत्यपाल मलिक यांनी केले. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाRajnath Singhराजनाथ सिंहCentral Governmentकेंद्र सरकार