शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

“पुलवामाचा तपास केला असता तर राजनाथ सिंह यांना राजीनामा द्यावा लागला असता”: सत्यपाल मलिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 17:01 IST

Satyapal Malik: सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा पुलवामा हल्ल्याबाबत भाष्य करताना केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.

Satyapal Malik: काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात मोठे गौप्यस्फोट केले. तसेच यासाठी केंद्रातील मोदी सरकारला जबाबदार धरले. मात्र, आता पुन्हा एकदा सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात भाष्य केले आहे. पुलवामा हल्ल्याचा तपास केला असता तर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना राजीनामा द्यावा लागला असता, असा दावा सत्यपाल मलिक यांनी केला आहे. 

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलताना सत्यपाल मलिक म्हणाले की, २०१९ ची लोकसभा निवडणूक आमच्या सैनिकांच्या मृतदेहांवर लढली गेली. कोणतीही चौकशी झाली नाही. चौकशी झाली असती तर तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांना राजीनामा द्यावा लागला असता. अनेक अधिकारी तुरुंगात गेले असते आणि मोठा वाद निर्माण झाला असता. संबंधितांचा तपास करण्यात आला नाही, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. 

तीन वर्षांत तुमची संपत्ती एवढी वाढली असेल तर मला सांगा

उद्योगपती आणि अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्यासंदर्भात बोलताना सत्यपाल मलिक यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. त्याच्यासोबतचे लोक म्हणजे अदानी, ज्यांनी तीन वर्षात इतकी संपत्ती जमा केली की ते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. तीन वर्षांत तुमच्यापैकी कुणाची संपत्ती एवढी वाढली असेल तर मला सांगा, असा खोचक सवाल सत्यपाल मलिक यांनी केला. संसदेत राहुल गांधींनी अदानीकडे २० हजार कोटी रुपये कुठून आले, असा सवाल केला होता. परंतु, पंतप्रधानांना त्याचे उत्तर देता आले नाही, अशी टीका सत्यपाल मलिक यांनी केली. 

दरम्यान, गोव्याचा राज्यपाल असताना मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची तक्रार पंतप्रधानांकडे केली होती. त्याचा परिणाम असा झाला की, मलाच हटवण्यात आले. त्यांना हटवले नाही. म्हणूनच मला खात्री आहे की, ते भ्रष्टाचार करतात. त्यात त्यांचा वाटा आहे. त्याची संपूर्ण रक्कम अदानीकडे जाते, असा मोठा आरोप सत्यपाल मलिकांनी केला. तसेच या सरकारला जनताच हटवू शकते, माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही ही वेळ चुकवली तर यानंतर पुन्हा संधी मिळणार नाही, असे आवाहन सत्यपाल मलिक यांनी केले. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाRajnath Singhराजनाथ सिंहCentral Governmentकेंद्र सरकार