शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

“पुलवामाचा तपास केला असता तर राजनाथ सिंह यांना राजीनामा द्यावा लागला असता”: सत्यपाल मलिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 17:01 IST

Satyapal Malik: सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा पुलवामा हल्ल्याबाबत भाष्य करताना केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.

Satyapal Malik: काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात मोठे गौप्यस्फोट केले. तसेच यासाठी केंद्रातील मोदी सरकारला जबाबदार धरले. मात्र, आता पुन्हा एकदा सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात भाष्य केले आहे. पुलवामा हल्ल्याचा तपास केला असता तर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना राजीनामा द्यावा लागला असता, असा दावा सत्यपाल मलिक यांनी केला आहे. 

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलताना सत्यपाल मलिक म्हणाले की, २०१९ ची लोकसभा निवडणूक आमच्या सैनिकांच्या मृतदेहांवर लढली गेली. कोणतीही चौकशी झाली नाही. चौकशी झाली असती तर तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांना राजीनामा द्यावा लागला असता. अनेक अधिकारी तुरुंगात गेले असते आणि मोठा वाद निर्माण झाला असता. संबंधितांचा तपास करण्यात आला नाही, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. 

तीन वर्षांत तुमची संपत्ती एवढी वाढली असेल तर मला सांगा

उद्योगपती आणि अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्यासंदर्भात बोलताना सत्यपाल मलिक यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. त्याच्यासोबतचे लोक म्हणजे अदानी, ज्यांनी तीन वर्षात इतकी संपत्ती जमा केली की ते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. तीन वर्षांत तुमच्यापैकी कुणाची संपत्ती एवढी वाढली असेल तर मला सांगा, असा खोचक सवाल सत्यपाल मलिक यांनी केला. संसदेत राहुल गांधींनी अदानीकडे २० हजार कोटी रुपये कुठून आले, असा सवाल केला होता. परंतु, पंतप्रधानांना त्याचे उत्तर देता आले नाही, अशी टीका सत्यपाल मलिक यांनी केली. 

दरम्यान, गोव्याचा राज्यपाल असताना मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची तक्रार पंतप्रधानांकडे केली होती. त्याचा परिणाम असा झाला की, मलाच हटवण्यात आले. त्यांना हटवले नाही. म्हणूनच मला खात्री आहे की, ते भ्रष्टाचार करतात. त्यात त्यांचा वाटा आहे. त्याची संपूर्ण रक्कम अदानीकडे जाते, असा मोठा आरोप सत्यपाल मलिकांनी केला. तसेच या सरकारला जनताच हटवू शकते, माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही ही वेळ चुकवली तर यानंतर पुन्हा संधी मिळणार नाही, असे आवाहन सत्यपाल मलिक यांनी केले. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाRajnath Singhराजनाथ सिंहCentral Governmentकेंद्र सरकार