शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

“पुलवामाचा तपास केला असता तर राजनाथ सिंह यांना राजीनामा द्यावा लागला असता”: सत्यपाल मलिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 17:01 IST

Satyapal Malik: सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा पुलवामा हल्ल्याबाबत भाष्य करताना केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.

Satyapal Malik: काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात मोठे गौप्यस्फोट केले. तसेच यासाठी केंद्रातील मोदी सरकारला जबाबदार धरले. मात्र, आता पुन्हा एकदा सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात भाष्य केले आहे. पुलवामा हल्ल्याचा तपास केला असता तर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना राजीनामा द्यावा लागला असता, असा दावा सत्यपाल मलिक यांनी केला आहे. 

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलताना सत्यपाल मलिक म्हणाले की, २०१९ ची लोकसभा निवडणूक आमच्या सैनिकांच्या मृतदेहांवर लढली गेली. कोणतीही चौकशी झाली नाही. चौकशी झाली असती तर तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांना राजीनामा द्यावा लागला असता. अनेक अधिकारी तुरुंगात गेले असते आणि मोठा वाद निर्माण झाला असता. संबंधितांचा तपास करण्यात आला नाही, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. 

तीन वर्षांत तुमची संपत्ती एवढी वाढली असेल तर मला सांगा

उद्योगपती आणि अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्यासंदर्भात बोलताना सत्यपाल मलिक यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. त्याच्यासोबतचे लोक म्हणजे अदानी, ज्यांनी तीन वर्षात इतकी संपत्ती जमा केली की ते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. तीन वर्षांत तुमच्यापैकी कुणाची संपत्ती एवढी वाढली असेल तर मला सांगा, असा खोचक सवाल सत्यपाल मलिक यांनी केला. संसदेत राहुल गांधींनी अदानीकडे २० हजार कोटी रुपये कुठून आले, असा सवाल केला होता. परंतु, पंतप्रधानांना त्याचे उत्तर देता आले नाही, अशी टीका सत्यपाल मलिक यांनी केली. 

दरम्यान, गोव्याचा राज्यपाल असताना मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची तक्रार पंतप्रधानांकडे केली होती. त्याचा परिणाम असा झाला की, मलाच हटवण्यात आले. त्यांना हटवले नाही. म्हणूनच मला खात्री आहे की, ते भ्रष्टाचार करतात. त्यात त्यांचा वाटा आहे. त्याची संपूर्ण रक्कम अदानीकडे जाते, असा मोठा आरोप सत्यपाल मलिकांनी केला. तसेच या सरकारला जनताच हटवू शकते, माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही ही वेळ चुकवली तर यानंतर पुन्हा संधी मिळणार नाही, असे आवाहन सत्यपाल मलिक यांनी केले. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाRajnath Singhराजनाथ सिंहCentral Governmentकेंद्र सरकार