शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

राजस्थानात काँग्रेसमधील लाथाळ्या भाजपच्या पथ्यावर; हतबलताच अखेर पक्षाला भोवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 06:16 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता हा राज्यातील भाजपच्या विजयातील मोठा पैलू सिद्ध झाला.

रवी टालेभारतीय जनता पक्षाचा राजस्थानातील विजय, त्या राज्यातील मतदारांनी रूढ केलेल्या दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याच्या परंपरेला जागणारा असला तरी, काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्यांनी तो सुकर केल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले आहे. वस्तुतः निवडणुकीच्या तोंडावर राजस्थानात भाजप हा काँग्रेसपेक्षाही जास्त दुभंगलेला पक्ष होता; परंतु त्या पक्षाच्या नेतृत्वाने त्वरेने पावले उचलत, आवश्यक ती तटबंदी करून नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांना आवर घातला. दुसरीकडे काँग्रेस नेतृत्व मात्र त्या बाबतीत हतबल भासत होते आणि ती हतबलताच अखेर पक्षाला भोवल्याचे दिसत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता हा राज्यातील भाजपच्या विजयातील मोठा पैलू सिद्ध झाला. त्यांची हिंदुत्ववादी प्रतिमा आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दयांवरील भूमिका मतदारांना भावल्याचे जाणवत आहे. अंतर्गत लाथाळ्यांना आवर घातल्यानंतर, भाजपने मोदींचा चेहरा समोर करून, स्थानिक मुद्दयांवर भर देत अत्यंत परिणामकारक निवडणूक प्रचार यंत्रणा राबविली. अशोक गेहलोत सरकारच्या विरोधातील प्रस्थापितविरोधी लहरीनेही भाजपचे काम सोपे केले. शेतकरी, महिला आणि युवा वर्गात राज्य सरकारच्या विरोधात स्पष्ट रोष दिसत होता. त्याचा लाभ घेण्याचे काम भाजपच्या कुशल निवडणूक यंत्रणेने चोखपणे बजावले. दुसरीकडे काँग्रेसची प्रचार यंत्रणा मात्र अगदीच दिशाहीन भासत होती आणि त्याचेच प्रतिबिंब निकालात उमटल्याचे दिसत आहे. 

भाजपपुढे मुख्यमंत्री पदाचे आव्हानभाजपला निवडणुकीत विजय मिळाला असला तरी मुख्यमंत्री पदाचे अनेक दावेदार असल्याने पुन्हा मतभेद उफाळू न देण्याचे मोठे आव्हान पक्ष नेतृत्वाला पेलावे लागणार आहे. अंतर्गत मतभेद उफाळू न देण्यात भाजप नेतृत्व यशस्वी ठरल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला मागील यशाची पुनरावृत्ती करण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. कॉंग्रेसलाही अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यातील मतभेदांवर एकदाचा तोडगा काढावाच लागणार आहे. 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक