शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

Rajasthan Exit Poll: राजस्थानात काँग्रेस ट्रेंड बदलणार की भाजपा शतक ठोकणार? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 18:37 IST

विधानसभेच्या १९९ जागांसाठी १ हजार ८६३ उमेदवार रिंगणात आहेत. राजस्थानच्या दिग्गजांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे

जयपूर - राजस्थानात २५ नोव्हेंबरला १९९ जागांसाठी मतदान झाले. यावेळी मतदानाची टक्केवारी ७५.४५ टक्के होती. राजस्थानच्या सत्तेच्या चाव्या कुणाकडे जाणार याचा निर्णय ३ डिसेंबरला लागणार आहे. परंतु विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल समोर आला आहे. २०१३ मध्ये भाजपाला १६३ जागा मिळाल्या होत्या तर २०१८ च्या निवडणुकीत भाजपाला ७३ जागांवर समाधान मानावे लागले होते. यंदाच्या निवडणुकीत इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला चांगली बढत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर सत्ताधारी काँग्रेसनंही कडवी झुंज दिल्याचं पाहायला मिळत आहे. 

या एक्झिट पोलमध्ये राजस्थानच्या एकूण १९९ मतदारसंघात ३८ हजार ६५६ लोकांचा सर्व्हे करण्यात आला होता.या सर्व्हेनुसार हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हडौती विभागात भाजपाला ११ तर काँग्रेसला ६ जागा मिळण्याची शक्यता आहे.अहिरवाल विभागात भाजपाला ९ जागा तर काँग्रेस १० जागांवर विजयी होण्याचा अंदाज आहे. शेखावटी भागात भाजपाला ७, काँग्रेसला १२ तर इतर २ जागांवर विजयी होण्याचा अंदाज आहे. मेवाड-गोडवाड भागात काँग्रेस-भाजपात अटीतटीची लढत आहे. एकूण मतदानानुसार, भाजपाला ४१ टक्के तर काँग्रेसला ४२ टक्के मते मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

इंडिया टुडे एक्झिट पोलनुसार राजस्थानचा अंदाज काय सांगतो?भाजपा - ८०-१०० काँग्रेस -८०-१०६इतर - ९-१८

जन की बात एक्झिट पोलमधील अंदाजभाजपा - १००-१२२काँग्रेस ६२-८५इतर - १४-१५

TV9 पोलस्ट्रेटचा अंदाजभाजपा - १००-११०काँग्रेस - ९०-१००इतर - ०-१५ 

निवडणुकीत 'हे' मुद्दे ठरले निर्णायकहिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून कन्हैया लालची हत्या, हिंदू सणांवरील रॅलीत दगडफेक, स्फोटातील आरोपी मुक्त होणे, पीएफआयची रॅली, भाजपानं पेपर लीक प्रकरण, गहलोत सरकारच्या काळात बेरोजगारी, महागाई यासारखे अनेक मुद्दे निवडणूक प्रचारात चर्चेत आले.

विधानसभेच्या १९९ जागांसाठी १ हजार ८६३ उमेदवार रिंगणात आहेत. राजस्थानच्या दिग्गजांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, सचिन पायलट, राज्यवर्धन सिंह राठोड आणि दिया कुमारी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतपेटीत (ईव्हीएम) बंद झालं असून या सर्वांचा फैसला ३ डिसेंबरला होणार आहे.राजस्थानच्या राजकीय इतिहासात गेल्या अनेक दशकांचा असा ट्रेंड आहे की, या राज्यात दर ५ वर्षांनी सत्ता परिवर्तन होते. परंतु यंदा जनतेचा कौल काय आहे हे पाहण्यासाठी ३ डिसेंबरची वाट पाहावी लागेल. 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस