शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

Rajasthan Exit Poll: राजस्थानात काँग्रेस ट्रेंड बदलणार की भाजपा शतक ठोकणार? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 18:37 IST

विधानसभेच्या १९९ जागांसाठी १ हजार ८६३ उमेदवार रिंगणात आहेत. राजस्थानच्या दिग्गजांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे

जयपूर - राजस्थानात २५ नोव्हेंबरला १९९ जागांसाठी मतदान झाले. यावेळी मतदानाची टक्केवारी ७५.४५ टक्के होती. राजस्थानच्या सत्तेच्या चाव्या कुणाकडे जाणार याचा निर्णय ३ डिसेंबरला लागणार आहे. परंतु विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल समोर आला आहे. २०१३ मध्ये भाजपाला १६३ जागा मिळाल्या होत्या तर २०१८ च्या निवडणुकीत भाजपाला ७३ जागांवर समाधान मानावे लागले होते. यंदाच्या निवडणुकीत इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला चांगली बढत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर सत्ताधारी काँग्रेसनंही कडवी झुंज दिल्याचं पाहायला मिळत आहे. 

या एक्झिट पोलमध्ये राजस्थानच्या एकूण १९९ मतदारसंघात ३८ हजार ६५६ लोकांचा सर्व्हे करण्यात आला होता.या सर्व्हेनुसार हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हडौती विभागात भाजपाला ११ तर काँग्रेसला ६ जागा मिळण्याची शक्यता आहे.अहिरवाल विभागात भाजपाला ९ जागा तर काँग्रेस १० जागांवर विजयी होण्याचा अंदाज आहे. शेखावटी भागात भाजपाला ७, काँग्रेसला १२ तर इतर २ जागांवर विजयी होण्याचा अंदाज आहे. मेवाड-गोडवाड भागात काँग्रेस-भाजपात अटीतटीची लढत आहे. एकूण मतदानानुसार, भाजपाला ४१ टक्के तर काँग्रेसला ४२ टक्के मते मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

इंडिया टुडे एक्झिट पोलनुसार राजस्थानचा अंदाज काय सांगतो?भाजपा - ८०-१०० काँग्रेस -८०-१०६इतर - ९-१८

जन की बात एक्झिट पोलमधील अंदाजभाजपा - १००-१२२काँग्रेस ६२-८५इतर - १४-१५

TV9 पोलस्ट्रेटचा अंदाजभाजपा - १००-११०काँग्रेस - ९०-१००इतर - ०-१५ 

निवडणुकीत 'हे' मुद्दे ठरले निर्णायकहिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून कन्हैया लालची हत्या, हिंदू सणांवरील रॅलीत दगडफेक, स्फोटातील आरोपी मुक्त होणे, पीएफआयची रॅली, भाजपानं पेपर लीक प्रकरण, गहलोत सरकारच्या काळात बेरोजगारी, महागाई यासारखे अनेक मुद्दे निवडणूक प्रचारात चर्चेत आले.

विधानसभेच्या १९९ जागांसाठी १ हजार ८६३ उमेदवार रिंगणात आहेत. राजस्थानच्या दिग्गजांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, सचिन पायलट, राज्यवर्धन सिंह राठोड आणि दिया कुमारी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतपेटीत (ईव्हीएम) बंद झालं असून या सर्वांचा फैसला ३ डिसेंबरला होणार आहे.राजस्थानच्या राजकीय इतिहासात गेल्या अनेक दशकांचा असा ट्रेंड आहे की, या राज्यात दर ५ वर्षांनी सत्ता परिवर्तन होते. परंतु यंदा जनतेचा कौल काय आहे हे पाहण्यासाठी ३ डिसेंबरची वाट पाहावी लागेल. 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस