शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

Rajasthan Exit Poll: राजस्थानात काँग्रेस ट्रेंड बदलणार की भाजपा शतक ठोकणार? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 18:37 IST

विधानसभेच्या १९९ जागांसाठी १ हजार ८६३ उमेदवार रिंगणात आहेत. राजस्थानच्या दिग्गजांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे

जयपूर - राजस्थानात २५ नोव्हेंबरला १९९ जागांसाठी मतदान झाले. यावेळी मतदानाची टक्केवारी ७५.४५ टक्के होती. राजस्थानच्या सत्तेच्या चाव्या कुणाकडे जाणार याचा निर्णय ३ डिसेंबरला लागणार आहे. परंतु विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल समोर आला आहे. २०१३ मध्ये भाजपाला १६३ जागा मिळाल्या होत्या तर २०१८ च्या निवडणुकीत भाजपाला ७३ जागांवर समाधान मानावे लागले होते. यंदाच्या निवडणुकीत इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला चांगली बढत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर सत्ताधारी काँग्रेसनंही कडवी झुंज दिल्याचं पाहायला मिळत आहे. 

या एक्झिट पोलमध्ये राजस्थानच्या एकूण १९९ मतदारसंघात ३८ हजार ६५६ लोकांचा सर्व्हे करण्यात आला होता.या सर्व्हेनुसार हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हडौती विभागात भाजपाला ११ तर काँग्रेसला ६ जागा मिळण्याची शक्यता आहे.अहिरवाल विभागात भाजपाला ९ जागा तर काँग्रेस १० जागांवर विजयी होण्याचा अंदाज आहे. शेखावटी भागात भाजपाला ७, काँग्रेसला १२ तर इतर २ जागांवर विजयी होण्याचा अंदाज आहे. मेवाड-गोडवाड भागात काँग्रेस-भाजपात अटीतटीची लढत आहे. एकूण मतदानानुसार, भाजपाला ४१ टक्के तर काँग्रेसला ४२ टक्के मते मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

इंडिया टुडे एक्झिट पोलनुसार राजस्थानचा अंदाज काय सांगतो?भाजपा - ८०-१०० काँग्रेस -८०-१०६इतर - ९-१८

जन की बात एक्झिट पोलमधील अंदाजभाजपा - १००-१२२काँग्रेस ६२-८५इतर - १४-१५

TV9 पोलस्ट्रेटचा अंदाजभाजपा - १००-११०काँग्रेस - ९०-१००इतर - ०-१५ 

निवडणुकीत 'हे' मुद्दे ठरले निर्णायकहिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून कन्हैया लालची हत्या, हिंदू सणांवरील रॅलीत दगडफेक, स्फोटातील आरोपी मुक्त होणे, पीएफआयची रॅली, भाजपानं पेपर लीक प्रकरण, गहलोत सरकारच्या काळात बेरोजगारी, महागाई यासारखे अनेक मुद्दे निवडणूक प्रचारात चर्चेत आले.

विधानसभेच्या १९९ जागांसाठी १ हजार ८६३ उमेदवार रिंगणात आहेत. राजस्थानच्या दिग्गजांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, सचिन पायलट, राज्यवर्धन सिंह राठोड आणि दिया कुमारी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतपेटीत (ईव्हीएम) बंद झालं असून या सर्वांचा फैसला ३ डिसेंबरला होणार आहे.राजस्थानच्या राजकीय इतिहासात गेल्या अनेक दशकांचा असा ट्रेंड आहे की, या राज्यात दर ५ वर्षांनी सत्ता परिवर्तन होते. परंतु यंदा जनतेचा कौल काय आहे हे पाहण्यासाठी ३ डिसेंबरची वाट पाहावी लागेल. 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस