शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

ईडी आता निवडणुकीची टोळ बनली आहे; अशोक गहलोत यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 15:31 IST

उद्या आणखी पाच आश्वसनं दिल्यावर ते काय करतील कुणास ठाऊक?, अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केली आहे. 

केंद्रीय यंत्रणा ईडी भाजपाच्या इशाऱ्यावर काम करत आहे. काल आम्ही राजस्थानमधील जनतेला दोन आश्वसन दिल्यानंतर आज ईडीने काँग्रेसच्या काही नेत्यांच्या घरांवर छापे टाकले. उद्या आणखी पाच आश्वसनं दिल्यावर ते काय करतील कुणास ठाऊक?, अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केली आहे. 

भाजपा जितका ईडीचा दुरुपयोग करेल, तितक्या काँग्रेसच्या जागा वाढतील, असं अशोक गहलोत म्हणाले. भाजपाच्या हातातील बाहुले बनलेली ईडी आता निवडणुकीची टोळ बनली आहे. भाजपा आमच्या मदत योजना बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यांचे लोक यासाठी प्रयत्नशील आहेत. ईडीच्या लोकांनी राजस्थानमध्येच भाड्याने घरे घेतली असतील आणि त्यांच्या कुटुंबियांना येथे स्थलांतरित केले असेल कारण त्यांना आता २५ नोव्हेंबरपर्यंत येथे राहावे लागेल, असा टोलाही ईडीने मारलेल्या छाप्यांवर लगावला आहे.

दरम्यान, राज्यात काँग्रेसचे सरकार येताच राज्यातील १.०५ कोटी कुटुंबांना ५०० रुपयांना एलपीजी सिलिंडर देण्यात येईल, असे अशोक गहलोत म्हणाले. तसेच गृह लक्ष्मी हमी अंतर्गत, कुटुंबातील महिला प्रमुखाला वर्षाला १०,००० रुपये दिले जातील. ही रक्कम दोन ते तीन हप्त्यांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल.  झुंझुनू येथील काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात अशोक गहलोत यांनी ही घोषणा केली. काँग्रेस पक्षाच्या या घोषणेवर राजस्थानचे विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड यांनी निवडणुका जाहीर झाल्यानंतर काँग्रेसला अशा घोषणा करून कोणताही फायदा होणार नसल्याचे म्हटले आहे. त्यांना (काँग्रेस) खरोखरच महिलांना फायदा व्हावा असे वाटत असेल तर तशी घोषणा आधी करता आली असती.

२५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार-

राजस्थानच्या २०० विधानसभा जागांसाठी २५ नोव्हेंबरला मतदान होणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यापूर्वी २३ नोव्हेंबर ही मतदानाची तारीख निश्चित करण्यात आली होती. २३ नोव्हेंबर रोजी देवोत्थान एकादशी असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे आणि शुभ व धार्मिक उत्सव होणार आहेत. ही बाब लक्षात घेऊन मतदानाची तारीख बदलण्याची मागणी करण्यात आली. आयोगाने याचा विचार करून मतदानाची तारीख २३ नोव्हेंबर ऐवजी २५ नोव्हेंबर अशी केली.

राजस्थानमध्ये ५.२५ कोटी मतदार-

निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील ५.२५ कोटी मतदार आपले सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. राज्यात २.७३ कोटी पुरुष आणि २.५२ कोटी महिला मतदार आहेत. राजस्थानमध्ये सरकार कोण बनवणार हे ठरवण्यासाठी पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या २२.०४ लाख मतदारांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयBJPभाजपा