शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

ईडी आता निवडणुकीची टोळ बनली आहे; अशोक गहलोत यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 15:31 IST

उद्या आणखी पाच आश्वसनं दिल्यावर ते काय करतील कुणास ठाऊक?, अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केली आहे. 

केंद्रीय यंत्रणा ईडी भाजपाच्या इशाऱ्यावर काम करत आहे. काल आम्ही राजस्थानमधील जनतेला दोन आश्वसन दिल्यानंतर आज ईडीने काँग्रेसच्या काही नेत्यांच्या घरांवर छापे टाकले. उद्या आणखी पाच आश्वसनं दिल्यावर ते काय करतील कुणास ठाऊक?, अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केली आहे. 

भाजपा जितका ईडीचा दुरुपयोग करेल, तितक्या काँग्रेसच्या जागा वाढतील, असं अशोक गहलोत म्हणाले. भाजपाच्या हातातील बाहुले बनलेली ईडी आता निवडणुकीची टोळ बनली आहे. भाजपा आमच्या मदत योजना बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यांचे लोक यासाठी प्रयत्नशील आहेत. ईडीच्या लोकांनी राजस्थानमध्येच भाड्याने घरे घेतली असतील आणि त्यांच्या कुटुंबियांना येथे स्थलांतरित केले असेल कारण त्यांना आता २५ नोव्हेंबरपर्यंत येथे राहावे लागेल, असा टोलाही ईडीने मारलेल्या छाप्यांवर लगावला आहे.

दरम्यान, राज्यात काँग्रेसचे सरकार येताच राज्यातील १.०५ कोटी कुटुंबांना ५०० रुपयांना एलपीजी सिलिंडर देण्यात येईल, असे अशोक गहलोत म्हणाले. तसेच गृह लक्ष्मी हमी अंतर्गत, कुटुंबातील महिला प्रमुखाला वर्षाला १०,००० रुपये दिले जातील. ही रक्कम दोन ते तीन हप्त्यांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल.  झुंझुनू येथील काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात अशोक गहलोत यांनी ही घोषणा केली. काँग्रेस पक्षाच्या या घोषणेवर राजस्थानचे विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड यांनी निवडणुका जाहीर झाल्यानंतर काँग्रेसला अशा घोषणा करून कोणताही फायदा होणार नसल्याचे म्हटले आहे. त्यांना (काँग्रेस) खरोखरच महिलांना फायदा व्हावा असे वाटत असेल तर तशी घोषणा आधी करता आली असती.

२५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार-

राजस्थानच्या २०० विधानसभा जागांसाठी २५ नोव्हेंबरला मतदान होणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यापूर्वी २३ नोव्हेंबर ही मतदानाची तारीख निश्चित करण्यात आली होती. २३ नोव्हेंबर रोजी देवोत्थान एकादशी असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे आणि शुभ व धार्मिक उत्सव होणार आहेत. ही बाब लक्षात घेऊन मतदानाची तारीख बदलण्याची मागणी करण्यात आली. आयोगाने याचा विचार करून मतदानाची तारीख २३ नोव्हेंबर ऐवजी २५ नोव्हेंबर अशी केली.

राजस्थानमध्ये ५.२५ कोटी मतदार-

निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील ५.२५ कोटी मतदार आपले सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. राज्यात २.७३ कोटी पुरुष आणि २.५२ कोटी महिला मतदार आहेत. राजस्थानमध्ये सरकार कोण बनवणार हे ठरवण्यासाठी पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या २२.०४ लाख मतदारांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयBJPभाजपा